शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे

By admin | Updated: June 24, 2014 00:32 IST

उस्मानाबाद : सलग तीन वर्षाचा दुष्काऴ़़ भर उन्हाळ्यातील अवकाळी पावसाचे तांडव़़़ आणि आता पावसाने फिरविलेली पाठ ! यामुळे जिल्ह्यावर यंदाही भीषण दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे़

उस्मानाबाद : सलग तीन वर्षाचा दुष्काऴ़़ भर उन्हाळ्यातील अवकाळी पावसाचे तांडव़़़ आणि आता पावसाने फिरविलेली पाठ ! यामुळे जिल्ह्यावर यंदाही भीषण दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे़ शेतीमशागतीची कामे पूर्ण केलेल्या बळीराजाच्या नजरा आभाळाकडे लागल्या असून, पावसाअभावी कोणीच तिफणीवर हात ठेवलेला नाही़ खते, बी-बियाणांचे भाव वाढले असून, पावसाअभावी खरेदीकडे अनेकांनी दुर्लक्ष केले आहे़ परिणामी बाजारापेठेतील व्यवहारही मंदावल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात जवळपास चार लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी होते़ यात वाशी तालुक्यातील ५४ गावापैकी ३० गावे ही खरीप हंगामाची म्हणून ओळखली जातात. उमरगा तालुक्यात खरीपाचे एकूण ७२ हजार २०० हेक्टर, कळंब तालुक्यात जवळपास ७० हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर खरिपाचा पेरा केला जातो़ तुळजापूर तालुक्यात ८७ हजार हेक्टर तर उस्मानाबाद तालुक्यात ७३५०० वर खरिपाची पेरणी केली जाते़ परंडा तालुक्यात सरासरी १८ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावरील खरीपाच्या पेरण्या ठप्प असून, भूम, लोहारा तालुक्यातही अशीच परिस्थिती आहे़ एकेकाळी भुईमूग पिकासाठी प्रसिध्द असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उसापाठोपाठ, सोयाबीन, उडीद, मूग, कापूस आदी पिकांच्या पेऱ्यावर भर दिला आहे़ सलग तीन वर्षाचा दुष्काळ आणि यंदा रबीत झालेली गारपीट यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे़ प्रारंभी हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजामुळे शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे उरकून घेतली़ कृषी विभागाने घरगुती बियाणे वापरण्यावर भर दिल्याने अनेकांनी घरगुती बियाणेही पेरणीसाठी तयार करून ठेवली आहेत़ गतवर्षीपेक्षा खताचे भाव वाढले असले तरी पावसाअभावी कृषीकेंद्रात केवळ भावाची विचारणा करणाऱ्यांची संख्या दिसून येत आहे़ गत आठवड्यात तुळजापूर व उमरगा तालुक्यातील काही भागातच पाऊस झाला़ मृग नक्षत्र कोरडेठाक गेले असून, रविवारपासून सुरू झालेल्या आर्द्रा नक्षत्रावर शेतकऱ्यांच्या आशा कायम आहेत़ आठ-दहा दिवसात अपेक्षित पाऊस झाला नाही तर यंदाही भीषण दुष्काळाचा सामना जिल्हावासियांना करावा लागणार असून, शेतकऱ्यांची पूर्णत: आर्थिक कोंडी होण्याची भिती व्यक्त होत आहे़ (प्रतिनिधी)केवळ ४ टक्के पाऊसहवामान खात्याच्या अंदाजानुसार प्रतिवर्षी ७ जून पासून पावसास सुरूवात होणे अपेक्षित आहे़ मात्र, मान्सूनचे आगमन झाल्यानंतर मृग नक्षत्र कोरडेठाक गेले आहे़ रविवारपासून आर्द्रा नक्षत्रास प्रारंभ झाला आहे़ पावसाळा सुरू होवून निम्मा महिना लोटला तरी जिल्ह्यात केवळ ४़२९ टक्के पाऊस झाला आहे़ उस्मानाबाद तालुक्यात ३५़५ मिमी, तुळजापूर तालुक्यात ३४़१ मिमी, उमरगा-२५़८ मिमी, लोहारा-३६़४ मिमी, भूम- २७़६ मिमी, कळंब- २८़३ मिमी, परंडा- ४५ मिमी तर वाशी तालुक्यात ३४ मिमी पाऊस झाल्याची नोंद शासनदफ्तरी आहे़असे निघणार नक्षत्रयंदाच्या पावसाळ्यात सुरू होणारे नक्षत्र व त्याचे वाहन पुढील प्रमाणे राहणार आहे़ ८ जून रोजी मृग (हत्ती), २२ जून रोजी आर्द्रा (मोर), ६ जुलै रोजी पुर्नवसू (गाढव), २० जुलै पुष्य (मेंढा), ३ आॅगस्ट रोजी आश्लेषा (उंदीर), १६ आॅगस्ट रोजी माघ (कोल्हा), ३० आॅगस्ट रोजी पूर्वा (मोर), १३ सप्टेंबर रोजी उत्तरा (घोडा), २७ सप्टेंबर रोजी हस्त (बेडूक), १० आॅक्टोबर रोजी चित्रा (म्हैस) तर २४ आॅक्टोबर रोजी शेवटचे स्वाती हे नक्षत्र निघणार असून, याचे वाहन घोडा असल्याचे सांगण्यात येते़