शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

शेतकऱ्यांची पिळवणूक सुरूच...!

By admin | Updated: August 8, 2016 00:39 IST

जालना : कृषी उत्पन्न बाजार समितीतील काही व्यापारी भाजीपाला उत्पादकांची जादा भाव मिळवून देतो असे सांगून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात कमिशन उकळत असल्याचे चित्र आहे.

जालना : कृषी उत्पन्न बाजार समितीतील काही व्यापारी भाजीपाला उत्पादकांची जादा भाव मिळवून देतो असे सांगून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात कमिशन उकळत असल्याचे चित्र आहे.आडत पट्टी वसुलीवरून दहा ते बारा दिवस समितीतील खरेदी विक्री बंद होती. काही दिवस शेतकऱ्यांनी थेट भाजीपाल्याची विक्री केली. आता संप मिटल्याने भाजीपाला विक्री पूर्ववत झाली असली तरी कमिशन तसेच शेतकऱ्यांची पहिल्यासारखीच लूट होत आहे. दहा टक्के कमिशनपैकी हमालीचे दोन टक्के कमिशन घेतले जाते. मात्र, काही भाजीपाला व्यापारी शेतकरी व खरेदीदार यांच्याकडून जादा भाव देण्याचे आमिष दाखवून रक्कम उकाळत असल्याचे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. जालना बाजार समितीत परिसरातील ४० खेड्यातील शेतकरी भाजीपाला विक्रीसाठी आणतात. शेतकरीही जादा भाव मिळेल म्हणून व्यापाऱ्यांना काही रक्कम देण्याचे आश्वासन देतात. असे असले तरी काही व्यापारी तुमचा माल कच्चा आहे, दर्जा चांगला नाही म्हणून शेतकऱ्यांना भीती दाखवतात. जास्त भाव पाहिजे असेल तर एवढे कमिशन द्या, असा प्रकार सुरू असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. हमाली वगळता इतर कोणतेही पैसे देऊ नये असे असतानाही काही व्यापारी शेतकऱ्यांचा गैर फायदा घेत आहेत. व्यापारी प्रति शेतकऱ्यांनी शंभर ते पन्नास रूपये कमिशन उकळत असल्याचे शेतकऱ्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. दरम्यान, बुधवारी जवाहर बाग परिसरात तर रविवारी गांधी चमन भागात भाजीपाला बाजार भरत असल्याने शेतकरी थेट येथे मालाची विक्री करतात. त्यामुळे व्यापाऱ्यांना जादा कमिशन देण्याचा प्रयत्न नसल्याचे बाजार समितीतील अधिकाऱ्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी कमिशन देऊ नये, असे आवाहनही अधिकाऱ्यांनी केले. (प्रतिनिधी)