शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

शेतकऱ्यांची वीज तोडणार

By admin | Updated: July 30, 2014 01:17 IST

पैठण : ज्या प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी वापरण्यात येते त्या सर्व प्रकल्पातील पाणीसाठा संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने राखून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

पैठण : ज्या प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी वापरण्यात येते त्या सर्व प्रकल्पातील पाणीसाठा संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने राखून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पातील पाण्याचा उपसा होऊ नये म्हणून शेतकऱ्यांचे विद्युत कनेक्शन कट करण्याचे आदेश महावितरणला देण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयाने शेतकरी संतप्त झाले असून त्यांनी संघर्षाचा पवित्रा घेतला आहे.यावर्षी मोसमी पाऊस अद्याप समाधानकारक न झाल्याने पाणीटंचाई जाणवत आहे. ती तीव्र होण्याची चिन्हे लक्षात घेता सर्व प्रकल्पातील पाणी साठा पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. धरणाच्या पाण्यावर चालत असलेले कृषी पंप त्वरित बंद करून त्यांची विद्युत जोडणी खंडित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय मोठे, मध्यम, लघु प्रकल्प, लघु तलाव, नदीनाले, विहिरी इ. पाण्याचे उद्भवातून अनधिकृत पाण्याचा उपसा होत असल्यास तो बंद करण्यात यावा. अवैध उपसा करणाऱ्या विद्युत पंपाचा विद्युत पुरवठा खंडित करून संबंधितावर गुन्हे दाखल करावेत, असा आदेश तालुका प्रशासनास देण्यात आले आहेत. जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्रात पाईपलाईन टाकून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर फळ पिकांच्या बागा मेहनतीने उभ्या केल्या आहेत. गतवर्षी दुष्काळात पदरमोड करून, कर्ज काढून शेतकऱ्यांनी पाण्याची सोय करून मोसंबी, डाळिंब बागा जगवल्या त्या नंतर गारपिटीने या बागांना फटका दिला आहे व आता पाणीपुरवठा बंद होणार असल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यात अस्वस्थता पसरली आहे. काहीही झाले तरी यास आम्ही विरोध करू, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. (वार्ताहर)एमआयडीसीला फक्त २० टक्के कपात राज्य शासनाने पाण्याचा प्राधान्य क्रम ठरवताना पिणे, शेती व उद्योग असा ठरवला आहे. असे असताना एमआयडीसीची फक्त २० % पाणी कपात केली आहे. मग शेतकऱ्यांचा १०० % पाणीपुरवठा कोणत्या आधारावर बंद करता, अशी भूमिका शेतकऱ्यांचे नेते जयाजी सूर्यवंशी यांनी घेतली असून शेतकऱ्यांची सुद्धा २० % पाणी कपात करा नाहीतर शेतकरी तीव्र आंदोलन करतील, असा इशारा दिला आहे.