शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
3
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
4
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
5
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
6
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
7
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
8
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
9
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
10
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
11
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
13
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
14
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
15
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
16
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
17
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
18
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
19
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
20
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले

शेतकऱ्यांची वीज तोडणार

By admin | Updated: July 30, 2014 01:17 IST

पैठण : ज्या प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी वापरण्यात येते त्या सर्व प्रकल्पातील पाणीसाठा संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने राखून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

पैठण : ज्या प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी वापरण्यात येते त्या सर्व प्रकल्पातील पाणीसाठा संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने राखून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पातील पाण्याचा उपसा होऊ नये म्हणून शेतकऱ्यांचे विद्युत कनेक्शन कट करण्याचे आदेश महावितरणला देण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयाने शेतकरी संतप्त झाले असून त्यांनी संघर्षाचा पवित्रा घेतला आहे.यावर्षी मोसमी पाऊस अद्याप समाधानकारक न झाल्याने पाणीटंचाई जाणवत आहे. ती तीव्र होण्याची चिन्हे लक्षात घेता सर्व प्रकल्पातील पाणी साठा पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. धरणाच्या पाण्यावर चालत असलेले कृषी पंप त्वरित बंद करून त्यांची विद्युत जोडणी खंडित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय मोठे, मध्यम, लघु प्रकल्प, लघु तलाव, नदीनाले, विहिरी इ. पाण्याचे उद्भवातून अनधिकृत पाण्याचा उपसा होत असल्यास तो बंद करण्यात यावा. अवैध उपसा करणाऱ्या विद्युत पंपाचा विद्युत पुरवठा खंडित करून संबंधितावर गुन्हे दाखल करावेत, असा आदेश तालुका प्रशासनास देण्यात आले आहेत. जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्रात पाईपलाईन टाकून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर फळ पिकांच्या बागा मेहनतीने उभ्या केल्या आहेत. गतवर्षी दुष्काळात पदरमोड करून, कर्ज काढून शेतकऱ्यांनी पाण्याची सोय करून मोसंबी, डाळिंब बागा जगवल्या त्या नंतर गारपिटीने या बागांना फटका दिला आहे व आता पाणीपुरवठा बंद होणार असल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यात अस्वस्थता पसरली आहे. काहीही झाले तरी यास आम्ही विरोध करू, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. (वार्ताहर)एमआयडीसीला फक्त २० टक्के कपात राज्य शासनाने पाण्याचा प्राधान्य क्रम ठरवताना पिणे, शेती व उद्योग असा ठरवला आहे. असे असताना एमआयडीसीची फक्त २० % पाणी कपात केली आहे. मग शेतकऱ्यांचा १०० % पाणीपुरवठा कोणत्या आधारावर बंद करता, अशी भूमिका शेतकऱ्यांचे नेते जयाजी सूर्यवंशी यांनी घेतली असून शेतकऱ्यांची सुद्धा २० % पाणी कपात करा नाहीतर शेतकरी तीव्र आंदोलन करतील, असा इशारा दिला आहे.