शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

शेतकऱ्यांचा असंतोष रस्त्यावर

By admin | Updated: September 15, 2015 00:32 IST

उस्मानाबाद : जिल्हा तीव्र दुष्काळी झळांचा सामना करीत असताना शासन, प्रशासन आवश्यक उपाययोजना करण्यास अपयशी ठरत असल्याचा आरोप करीत

उस्मानाबाद : जिल्हा तीव्र दुष्काळी झळांचा सामना करीत असताना शासन, प्रशासन आवश्यक उपाययोजना करण्यास अपयशी ठरत असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंगळवारी जिल्ह्यातील दहा ठिकाणी जेलभरो आंदोलन करण्यात आले. पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने शेतकरी रस्त्यावर उतरल्याचे यानिमित्ताने दिसून आले. उस्मानाबाद शहरातील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयासमोरील चौकात माजी खा. डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. सकाळी साडेनऊ वाजल्यापासूनच आंदोलनस्थळी शेतकऱ्यांची गर्दी होत होती. अकराच्या सुमारास डॉ. पाटील यांचे तेथे आगमन झाले. यावेळी तेथे सुमारे तीन हजारावर आंदोलनकर्ते उपस्थित होते. डॉ. पाटील यांच्यासह नगराध्यक्ष नंदू राजेनिंबाळकर, अमोल पाटोदेकर, कैैलास पाटील, सत्यनारायण दंडनाईक व अन्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अर्ध्या तासानंतर सोडून दिले. तालुक्यातील ढोकी येथे आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. येथेही शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र होते. जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले असले तरी अडचणी कायम आहेत. चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर असून, एफआरपी प्रमाणे शेतकऱ्यांना पेमेंट झालेले नाही. सद्यस्थितीत एकच छावणी सुरू आहे. या सर्व परिस्थितीमुळे शेतकऱ्यांत असंतोष आहे. हाच संताप या गर्दीच्या उपस्थितीवरून स्पष्ट होत असल्याचे राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी सांगितले. कर्जमाफीबद्दल शासन मुग गिळून आहे. दुसरीकडे रोहयो कामेही सुरू नाहीत. ही कामे तात्काळ सुरू करून नागरिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. परंड्यात राज्यमार्ग रोखलापरंडा : येथील शिवाजी चौकात आ. राहुल मोटे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी परंडा-बार्शी, परंडा-करमाळा हे राज्यमार्ग रोखून धरले. आंदोलनावेळी आ. मोटे यांनी युतीचे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातील असल्याचा आरोप केला. आंदोलनानंतर आ. मोटेंसह शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी स्वत:ला अटक करून घेतली. आंदोलनात तालुकाध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील, गटनेते जाकीर सौदागर, रायुकाँचे तालुकाध्यक्ष धनंजय हांडे, शहराध्यक्ष वाजीद दखनी, माजी नगरसेवक राहुल बनसोडे, नसीर शहाबर्फीवाले, दादासाहेब सोनारीकर, राजकुमार पाटील, गणेश राशीनकर, नवनाथ जगताप, दीपकराजे भांडवलकर, बापू मिस्कीन, धनंजय मोरे, दत्तात्रय पाटील, महेश खुळे, बाळासाहेब पाटील, हणमंत धुमाळ, रवि मोरे, मलिक सय्यद, राजा माने, घन:श्याम शिंदे, जयंत शिंदे, जयपाल बगाडे, नंदकुमार शिंदे, श्रीहरी नाईकवाडे, बाबासाहेब जाधव, पंकज पाटील, वाहेद शहाबर्फीवाले, मकसूद पल्ला, आरीफ बागवान आदी सहभागी झाले होते. लोहारा : तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने येथील महात्मा फुले चौकातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयापासून रॅली काढण्यात आली. ही रॅली शिवाजी चौकात आल्यानंतर येथे जेलभरो आंदोलन झाले. या आंदोलनात उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष राहुल पाटील, तालुकाध्यक्ष किशोर साठे, अ‍ॅड. दादासाहेब जानकर, गोविंदराव साळुंके, दिनकरराव जावळे, दयानंद गिरी, जयदीप थिटे, जयश्री वाघमारे, शरीफा सय्यद, आयुब शेख, विजय लोमटे, मुख्तार चाऊस, नरदेव कदम, आप्पा देवकर, अमिन सुंबेकर, महादेव बंडगर, विठ्ठल साठे, शिवाजी इंगळे, भास्कर ढोणे, मुबारक गवंडी, बबन फुलसुंदर, प्रशांत गिराम, हणमंत दणाने, शाहुराज नेलवाडे, हेमंत माळवदकर, मिलिंद नागवंशी, लक्ष्मण रसाळ यांच्यासह शेतकरी, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनास तहसीलदार ज्योती चौहान, नायब तहसीलदार दत्ता कांबळे यांनी भेट दिली. माजी तालुकाध्यक्ष दिनकरराव जावळे यांनी आभार मानले. पोनि संतोष गायकवाड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.