शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी सीमा ओलांडली, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

By | Updated: December 5, 2020 04:03 IST

आंदोलनाला ममता बॅनर्जींचा पाठिंबा नवी दिल्ली : शेतकऱ्यांचे आंदोलन नवव्या दिवशीही सुरू आहे. तृणमूल कॉँग्रेसचे खा. डेरेक ओ ब्रायन ...

आंदोलनाला ममता बॅनर्जींचा पाठिंबा

नवी दिल्ली : शेतकऱ्यांचे आंदोलन नवव्या दिवशीही सुरू आहे. तृणमूल कॉँग्रेसचे खा. डेरेक ओ ब्रायन यांनी शुक्रवारी सीकरी सीमेवर शेतकऱ्यांची भेट घेऊन पं. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी फोनवर बोलणे करून देत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. शेतकऱ्यांच्या अधिकारांना उद्योगपती घरण्यांना भाजप विकत असल्याचा आरोप बॅनर्जी यांनी केला.

सीकरी सीमेवर पोलिसांनी शेतकऱ्यांना थोपवले आहे. बॅरिकेट्स आणि दगडांनी रस्ता बंद करण्यात आला आहे; परंतु शेतकऱ्यांना संधी मिळताच त्यांंनी सीमा ओलांडत दिल्लीकडे येण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा बलाचा वापर करून शेतकऱ्यांना थांबवावे लागले. बदरपूर सीमेवर शेतकरी रस्त्यावरच धरणे देऊन बसले आहेत.

शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी किमान आधारभूत मूल्यासाठी (एमएसपी) स्वतंत्र कायदा करण्यास आम्ही सरकारला भाग पाडणार असल्याची प्रतिक्रिया दिली. सरकारने ऐकले नाही तर २६ जानेवारी रोजी राजपथवर शेतकरी ट्रॅक्टर ट्रॉलीसह सहभागी होईल, असा इशाराही त्यांनी दिला.

शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी विविध वर्गांतील लोक स्वयंस्फूर्तीने येत आहेत. करनाल येथील एका नवरदेवाने शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आलिशान कारचा त्याग करीत ट्रॅक्टरवर मंडपात पोहोचला. नवरदेव म्हणाला, आम्ही आता शहरात स्थायी झालो असलो तरी आम्ही मूलत: शेतकरी आहोत. त्यांना पाठिंबा देण्यासाठीच ट्रॅक्टरवरून वरात काढली.

राष्ट्रीय राजधानी दिल्ली तसेच हरियाणाच्या सिंधू सीमेवरून शेतकऱ्यांना हटवण्याचे निर्देश देण्याची विनंती करणारी याचिका शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. शेती सुधारणा कायद्याविरोधात गेल्या नऊ दिवसांपासून शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी राज्याला उत्तर प्रदेश तसेच हरियाणा सोबत जोडणाऱ्या मार्गांना बंद केले आहे. कोरोनाचे संकट लक्षात घेता आंदोलक शेतकऱ्यांना सिंधू बॉर्डरवरून तात्काळ हटविण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. दिल्लीचे वकील ओम प्रकाश परिहार यांनी ही याचिका दाखल केली आहे. गुरुवारी उत्तर प्रदेशातील काही शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग २४ बंद केला होता. काही काळ या मार्गांवर वाहतूक कोंडी झाली होती.

..................