शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

पावणेदोन लाखांवर शेतकऱ्यांनी भरला पीक विमा

By admin | Updated: August 7, 2014 02:06 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊन पडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे

उस्मानाबाद : जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊन पडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे अनेक शेतकरी पीक विमा भरण्यासाठी अग्रही असल्याचे दिसूृन येत आहे. शेतकऱ्यांनी सर्वाधिक पिक विमा हा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १०१ शाखेत जिल्ह्यातील १ लाख ८६ हजार २८ शेतकऱ्यांनी १३ कोटीवर खरीपाचा पिक विमा भरला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात गतवर्षीही दुष्काळजन्य परिस्थिती होती. यंदा ही अत्यल्प पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी सुरू केली होती. आजघडीला जिल्हातील ८९ टक्के पेरणी उरकली आहे. आणखी ४० हजार हेक्टवरील पेरणी होणे बाकी आहे. कृषी विभागाने खरीप पेरणीसाठी ३ लाख ९० हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले होते. वेळेवर पेरणी उरकेल, अशी अपेक्षा असतानाच पावसाने ओढ दिली. अख्खा जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैच्या सुरूवातीला सलगत तीन-चार दिवस संततधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी चाढ्यावर मुठ धरली. आजघडील ३ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्रावरील पेरणी झाली आहे. ४० हजार हेक्टर क्षेत्र पेरणी अद्याप ही झालेली नाही. उस्मानाबाद तालुक्यातुन ३८ हजार ५६० शेतकऱ्यांनी २ कोटी ९३ लाख ९५ हजार रुपयांचा खरीपाचा पिक विमा भरला आहे. उमरगा तालुक्यातील ३३ हजार ३१८ शेतकऱ्यांनी २ कोटी ६१ लाख ६५ हजार रुपये, तुळजापूर तालुक्यातून २५ हजार ७२६ शेतकऱ्यांनी १ कोटी ८९ लाख ६१ हजार भरले, लोहारा तालुक्यातून १० हजार ३६९ शेतकऱ्यांनी ९२ लाख ९४ रुपयांचा पिक विमा भरला, कळंब तालुक्यातून २५ हजार ४८८ शेतकऱ्यांनी २ कोटी ८ लाख ४७ हजार रुपये भरले, भूम तालुक्यातून १८ हजार ८१० शेतकऱ्यांनी १ कोटी ३७ लाख ३९ हजार, वाशी तालुक्यातून ११ हजार ६१० शेतकऱ्यांनी १ कोटी ५ लाख ४७ हजार तर परंडा तालुक्यातून २२ हजार १४७ शेतकऱ्यांनी ९३ लाख २६ हजार रुपयांचा पिका विमा भरला असे जिल्ह्यातून १ लाख ८६ हजार २८ शेतकऱ्यांनी १३ ५० लाखावर पिक विमा जिल्हामध्यवर्तीच्या १०१ शाखेत भरला आहे. (प्रतिनिधी)