शहरं
Join us  
Trending Stories
1
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली!
2
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
3
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
4
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
5
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
6
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
7
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
8
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
9
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
10
Bombay HC: मुंबई उच्च न्यायालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, परिसरात खळबळ!
11
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
12
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
13
भेटण्याची वेळ द्या सर..; प्रियंका गांधींच्या विनंतीला गडकरींचा लगेच होकार, नेमकी काय चर्चा झाली?
14
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
15
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
16
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
17
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
18
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
19
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
20
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
Daily Top 2Weekly Top 5

रानडुकरांमुळे शेतकरी संकटात

By admin | Updated: February 20, 2015 00:08 IST

शिरुर अनंतपाळ : दुष्काळाच्या चक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांसमोर आता नवे संकट उभे टाकले आहे़ दिवसरात्र एक करुन जोपासलेल्या रबी पिकांवर रानडुकरांचे हल्ले सुरु झाले आहेत़

शिरुर अनंतपाळ : दुष्काळाच्या चक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांसमोर आता नवे संकट उभे टाकले आहे़ दिवसरात्र एक करुन जोपासलेल्या रबी पिकांवर रानडुकरांचे हल्ले सुरु झाले आहेत़ रात्रीतून उभी पिके फस्त होत असल्याने शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळीसुद्धा पिकांचे संरक्षण करण्यासाठी खडा पहारा देण्याची वेळ आली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे़यंदा अल्प पर्जन्यमान झाले आहे़ परिणामी, रबीची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली नाही़ एकुण ११ हजार हेक्टर्सपैकी ५ ते ६ हेक्टर्समध्ये रबी ज्वारी, गहू, हरभरा, करडई, सूर्यफुल, भूईमुग, मका अशी पिके घेण्यात आली आहेत़ ज्या शेतकऱ्यांना पाणी पुरवठ्याची सुविधा आहे, असे शेतकरी दिवसरात्र एक करुन रबी पिकांची जोपासना करीत आहेत़ या पिकांवर रान-पाखरांचे थवेच्या थवे उतरत असून, रान-पाखरे सुद्धा पिकांचे मोठे नुकसान करीत आहेत़ विशेषत: ज्वारी, गहू यांचे टपोरे दाणे फस्त करीत आहेत़ त्यातच आता या पिकांवर नवे संकट आले आहे़ रानडुकरे रात्रीच्यावेळी ज्वारी, गहू, भूईमूग आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत़ त्याचबरोबर उभे पिक फस्त करीत आहेत़ ज्वारीची कणसे, गव्हाच्या तोरंब्या, भूईमूगाच्या शेंगा खाऊन शेती ओसाड करीत आहेत़ त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत़ दिवसा येणाऱ्या रान-पाखरांचा बंदोबस्त करण्यासाठी दिवसभर शिवारात पाखरे हाकरण्याचा आवाज येत असून, गोफणी भराभर फिरत आहेत़ परंतु रानडुकरांचे हल्ले कसे थांबवावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे़ (वार्ताहर)