शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

शेतकरी आत्महत्या सत्र सुरूच ; मराठवाड्यात एकाच दिवसात चार तरुण शेतक-यांनी संपवली जीवनयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 18:20 IST

शेतकरी कर्जमाफी मिळण्यास नुकतीच सुरुवात झाली आहे.मात्र, तरीही शेतक-यांच्या आत्महत्यांचे सत्र काही थांबले नसून आज मराठवाड्यातील चार वेगवेगळ्या जिल्ह्यातील तरुण शेतक-यांनी कर्जापायी आपली जीवनयात्रा संपवली. 

ठळक मुद्दे शेतक-यांच्या आत्महत्यांचे सत्र काही थांबले नसून आज मराठवाड्यातील चार वेगवेगळ्या जिल्ह्यातील तरुण शेतक-यांनी कर्जापायी आपली जीवनयात्रा संपवली. मराठवाड्यातील बीड, परभणी , उस्मानाबाद व नांदेड अशा चार वेगवेगळ्या जिल्ह्यातील तरुण शेतक-यांनी केल्या आत्महत्या

मराठवाडा : शेतकरी कर्जमाफी मिळण्यास नुकतीच सुरुवात झाली आहे.मात्र, तरीही शेतक-यांच्या आत्महत्यांचे सत्र काही थांबले नसून आज मराठवाड्यातील चार वेगवेगळ्या जिल्ह्यातील तरुण शेतक-यांनी कर्जापायी आपली जीवनयात्रा संपवली. 

पावसाचे प्रमाण जास्त असो कि कमी शेतक-यांच्या मागची कर्जाची आणि नापिकीचे चक्र काही सुटता सुटत नाही. याचीच प्रचीती सातत्याने होत असलेल्या शेतक-यांच्या आत्महत्येमुळे येत आहे. सरकारने नुकतीच शेतक-यांना कर्जमुक्ती जाहीर केली असून त्या रकमेचे वितरणही सुरु झाले आहे. मात्र, असे असतानाही शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे.  आज मराठवाड्यातील बीड, परभणी , उस्मानाबाद व नांदेड अशा चार वेगवेगळ्या जिल्ह्यातील तरुण शेतक-यांनी आपली जीवनयात्रा संपवल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

परभणी - पाथरी तालुक्यातील बाभळगाव येथील बाळासाहेब रणेर या ३२ वर्षीय उच्चशिक्षित शेतक-याने कर्जबाजारीपणामुळे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याला ३ एकर जमीन होती व त्याच्या नवे राष्ट्रीयकृत बँकेचे १ लाख ८० हजार इतके कर्ज होते. 

बीड -पाटोदा तालुक्यातील लिंबादेवी ऊखंडा येथील अडाले वस्तीवरील राहणा-या बाळासाहेब महादेव जाधव या ३२ वर्षीय शेतक-याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या वडिलांच्या नावे बँकेचे कर्ज असून त्यांना ४ एकर जमीन होती.  

नांदेड - लोहा तालुक्यातील पिंपळगाव (ढगे) येथील 38 वर्षीय शेतकरी तुकाराम माधव कापसे या शेतक-याने आज सकाळी आपल्याच शेतात विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. २ एकर ६ गुंठे जमीन असलेल्या कापसे यांनी सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळुन आपल्याच शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. 

 

उस्मानाबाद - परंडा तालुक्यातील आवारपिंपरी येथे हातचे खरीप पीक वाया गेल्याने व बँकेकडे कर्जासाठी अर्ज करूनही त्याचे वितरण न झाल्याने लांबाजी डाकवाले या ४२ वर्षीय शेतक-याने आज सकाळी विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केली. डाकवाले यांच्या मुलीचा विवाह निश्चित झाला आहे. यापूर्वीच त्यांनी आर्थिक विवंचनेने त्रस्त होत आपली जीवनयात्रा संपवली.