शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

शेतकरी आत्महत्या सत्र सुरूच ; मराठवाड्यात एकाच दिवसात चार तरुण शेतक-यांनी संपवली जीवनयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 18:20 IST

शेतकरी कर्जमाफी मिळण्यास नुकतीच सुरुवात झाली आहे.मात्र, तरीही शेतक-यांच्या आत्महत्यांचे सत्र काही थांबले नसून आज मराठवाड्यातील चार वेगवेगळ्या जिल्ह्यातील तरुण शेतक-यांनी कर्जापायी आपली जीवनयात्रा संपवली. 

ठळक मुद्दे शेतक-यांच्या आत्महत्यांचे सत्र काही थांबले नसून आज मराठवाड्यातील चार वेगवेगळ्या जिल्ह्यातील तरुण शेतक-यांनी कर्जापायी आपली जीवनयात्रा संपवली. मराठवाड्यातील बीड, परभणी , उस्मानाबाद व नांदेड अशा चार वेगवेगळ्या जिल्ह्यातील तरुण शेतक-यांनी केल्या आत्महत्या

मराठवाडा : शेतकरी कर्जमाफी मिळण्यास नुकतीच सुरुवात झाली आहे.मात्र, तरीही शेतक-यांच्या आत्महत्यांचे सत्र काही थांबले नसून आज मराठवाड्यातील चार वेगवेगळ्या जिल्ह्यातील तरुण शेतक-यांनी कर्जापायी आपली जीवनयात्रा संपवली. 

पावसाचे प्रमाण जास्त असो कि कमी शेतक-यांच्या मागची कर्जाची आणि नापिकीचे चक्र काही सुटता सुटत नाही. याचीच प्रचीती सातत्याने होत असलेल्या शेतक-यांच्या आत्महत्येमुळे येत आहे. सरकारने नुकतीच शेतक-यांना कर्जमुक्ती जाहीर केली असून त्या रकमेचे वितरणही सुरु झाले आहे. मात्र, असे असतानाही शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे.  आज मराठवाड्यातील बीड, परभणी , उस्मानाबाद व नांदेड अशा चार वेगवेगळ्या जिल्ह्यातील तरुण शेतक-यांनी आपली जीवनयात्रा संपवल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

परभणी - पाथरी तालुक्यातील बाभळगाव येथील बाळासाहेब रणेर या ३२ वर्षीय उच्चशिक्षित शेतक-याने कर्जबाजारीपणामुळे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याला ३ एकर जमीन होती व त्याच्या नवे राष्ट्रीयकृत बँकेचे १ लाख ८० हजार इतके कर्ज होते. 

बीड -पाटोदा तालुक्यातील लिंबादेवी ऊखंडा येथील अडाले वस्तीवरील राहणा-या बाळासाहेब महादेव जाधव या ३२ वर्षीय शेतक-याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या वडिलांच्या नावे बँकेचे कर्ज असून त्यांना ४ एकर जमीन होती.  

नांदेड - लोहा तालुक्यातील पिंपळगाव (ढगे) येथील 38 वर्षीय शेतकरी तुकाराम माधव कापसे या शेतक-याने आज सकाळी आपल्याच शेतात विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. २ एकर ६ गुंठे जमीन असलेल्या कापसे यांनी सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळुन आपल्याच शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. 

 

उस्मानाबाद - परंडा तालुक्यातील आवारपिंपरी येथे हातचे खरीप पीक वाया गेल्याने व बँकेकडे कर्जासाठी अर्ज करूनही त्याचे वितरण न झाल्याने लांबाजी डाकवाले या ४२ वर्षीय शेतक-याने आज सकाळी विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केली. डाकवाले यांच्या मुलीचा विवाह निश्चित झाला आहे. यापूर्वीच त्यांनी आर्थिक विवंचनेने त्रस्त होत आपली जीवनयात्रा संपवली.