शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
2
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
3
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
4
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
5
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
6
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
7
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
8
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
9
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
10
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
11
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
12
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
13
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप
14
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
15
Sleep Tourism : नव्या ट्रेंडची भुरळ! फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास; काय आहे स्लीप टूरिझ्म?
16
अष्टमीच्या नैवेद्याला कांदा, लसूण न घालता करा काळ्या वाटण्याची चमचमीत उसळ, पुऱ्या आणि शिरा; खास टिप्स!
17
'सैयारा'नंतर अहान पांडेला लागला मोठा जॅकपॉट, दोन दिग्गज दिग्दर्शकाच्या सिनेमात लागली वर्णी
18
Tamil Nadu Stampede : "माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
19
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
20
५० रुपये प्रति तास या हिशोबाने भाड्याने मिळतायेत 'Friend'; केरळमधील अजब ट्रेंडनं वाढवलं टेन्शन

आवर्तन सोडण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचा मज्जाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:05 IST

सुदामवाडी, बोरसर येथील शेतकऱ्यांची जवळपास दीडशे ते दोनशे हेक्टर क्षेत्रावरील पिके पाण्याअभावी धोक्यात आली आहेत. त्यांनी पाटबंधारे विभागाला निवेदन ...

सुदामवाडी, बोरसर येथील शेतकऱ्यांची जवळपास दीडशे ते दोनशे हेक्टर क्षेत्रावरील पिके पाण्याअभावी धोक्यात आली आहेत. त्यांनी पाटबंधारे विभागाला निवेदन देऊन कोल्ही प्रकल्पातून आवर्तन सोडण्याची विनंती केली होती. त्यानुसार अधिकारी आवर्तन सोडण्यासाठी कोल्ही प्रकल्पावर आले होते. ते आल्याचे समजताच या भागातील शेतकऱ्यांनी त्यांना घेराव घालत सर्वप्रथम गेट व पाटाची दुरुस्ती करण्याची मागणी केली. तसेच अधिकाऱ्यांना दोन तास थांबवून ठेवल्याने सुदामवाडी येथील शेतकऱ्यांना सोडण्यात येणारे आवर्तनाचे पाणी सोडण्यात आले नाही. गेट नादुरुस्त असल्याने गेटमधून पूर्वी मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत होती, परंतु आम्ही सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येत गेटजवळ माती आणून टाकली होती. संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शेतकरी ताराचंद पवार यांनी केला आहे, तर सुदामवाडी भागातील शेतकऱ्यांचे दोनशे हेक्टर क्षेत्रावर पिकाची लागवड केलेली आहे. जर पाणी मिळाले नाही, तर आमचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. त्याकरिता आम्हाला लवकरात लवकर पाणी सोडण्याची मागणी सुदामवाडीचे सरपंच प्रभाकर सोनवणे यांनी केली आहे.

कोट

माझे कोल्ही प्रकल्पालगत सोळा एकर शेत आहे. पाटबंधारे विभागाला पत्रव्यवहार करूनसुद्धा गेट व पाटाची दुरुस्ती झालेली नाही. पाणी सोडले तर माझ्या शेतातील सर्व पिके नष्ट होतील. त्याकरिता प्रथम दुरुस्ती करावी व नंतर पाणी सोडावे.

किसन पवार, शेतकरी, कोल्ही.

कोट

२००७ पासून पत्रव्यवहार करूनही अद्यापपर्यंत गेट व पाटाची दुरुस्ती झाली नाही. यासाठी वरिष्ठ कार्यालयास पत्र पाठविण्यात आले होते; मात्र अंदाजपत्रक मंजूर नसल्याने पाटाची दुरुस्ती होऊ शकली नाही. परंतु पर्यायी व्यवस्था करून पाटाला आवर्तनाचे पाणी सोडण्यात येईल.

- वनगुजरे, अभियंता, सार्वजनिक पाटबंधारे विभाग

फोटो :