शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
4
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
5
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
6
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
7
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
8
Stock Market Today: शेअर बाजाराचं फ्लॅट ओपनिंग, १११ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; फार्मा-रियल्टी शेअर्स आपटले
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
10
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
11
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
12
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
13
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
14
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
15
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
16
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
17
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
18
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
19
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
20
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला

आवर्तन सोडण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचा मज्जाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:05 IST

सुदामवाडी, बोरसर येथील शेतकऱ्यांची जवळपास दीडशे ते दोनशे हेक्टर क्षेत्रावरील पिके पाण्याअभावी धोक्यात आली आहेत. त्यांनी पाटबंधारे विभागाला निवेदन ...

सुदामवाडी, बोरसर येथील शेतकऱ्यांची जवळपास दीडशे ते दोनशे हेक्टर क्षेत्रावरील पिके पाण्याअभावी धोक्यात आली आहेत. त्यांनी पाटबंधारे विभागाला निवेदन देऊन कोल्ही प्रकल्पातून आवर्तन सोडण्याची विनंती केली होती. त्यानुसार अधिकारी आवर्तन सोडण्यासाठी कोल्ही प्रकल्पावर आले होते. ते आल्याचे समजताच या भागातील शेतकऱ्यांनी त्यांना घेराव घालत सर्वप्रथम गेट व पाटाची दुरुस्ती करण्याची मागणी केली. तसेच अधिकाऱ्यांना दोन तास थांबवून ठेवल्याने सुदामवाडी येथील शेतकऱ्यांना सोडण्यात येणारे आवर्तनाचे पाणी सोडण्यात आले नाही. गेट नादुरुस्त असल्याने गेटमधून पूर्वी मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत होती, परंतु आम्ही सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येत गेटजवळ माती आणून टाकली होती. संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शेतकरी ताराचंद पवार यांनी केला आहे, तर सुदामवाडी भागातील शेतकऱ्यांचे दोनशे हेक्टर क्षेत्रावर पिकाची लागवड केलेली आहे. जर पाणी मिळाले नाही, तर आमचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. त्याकरिता आम्हाला लवकरात लवकर पाणी सोडण्याची मागणी सुदामवाडीचे सरपंच प्रभाकर सोनवणे यांनी केली आहे.

कोट

माझे कोल्ही प्रकल्पालगत सोळा एकर शेत आहे. पाटबंधारे विभागाला पत्रव्यवहार करूनसुद्धा गेट व पाटाची दुरुस्ती झालेली नाही. पाणी सोडले तर माझ्या शेतातील सर्व पिके नष्ट होतील. त्याकरिता प्रथम दुरुस्ती करावी व नंतर पाणी सोडावे.

किसन पवार, शेतकरी, कोल्ही.

कोट

२००७ पासून पत्रव्यवहार करूनही अद्यापपर्यंत गेट व पाटाची दुरुस्ती झाली नाही. यासाठी वरिष्ठ कार्यालयास पत्र पाठविण्यात आले होते; मात्र अंदाजपत्रक मंजूर नसल्याने पाटाची दुरुस्ती होऊ शकली नाही. परंतु पर्यायी व्यवस्था करून पाटाला आवर्तनाचे पाणी सोडण्यात येईल.

- वनगुजरे, अभियंता, सार्वजनिक पाटबंधारे विभाग

फोटो :