शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

औरंगाबादच्या मागास शेतक-यांना विहिरींची ‘लॉटरी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 00:07 IST

जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत जिल्ह्यातील ४८९ मागासवर्गीय शेतक-यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत विहिरींसाठी सोडत पद्धतीने निवड करण्यात आली, अशी माहिती जि.प.चे उपाध्यक्ष केशव तायडे पाटील यांनी दिली.

ठळक मुद्देयंदा ४८९ शेतक-यांना लाभ : जि. प. उपाध्यक्ष केशव तायडे यांचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत जिल्ह्यातील ४८९ मागासवर्गीय शेतक-यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत विहिरींसाठी सोडत पद्धतीने निवड करण्यात आली, अशी माहिती जि.प.चे उपाध्यक्ष केशव तायडे पाटील यांनी दिली.यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना तायडे म्हणाले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिरसे यांच्या उपस्थितीत जि.प. सभागृहामध्ये लााभार्थ्यांची सोडत पद्धतीने निवड करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत यावर्षी एकूण २ हजार ६०८ आॅनलाईन अर्ज प्राप्त झाले होते. ही योजना प्रामुख्याने अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकºयांसाठीच राबवली जाते. यामध्ये नवीन विहिरीच्या खोदकामासाठी २ लाख ५० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. केवळ विहीर खोदल्यानंतर संबंधित लाभार्थी शेतकºयांना वाºयावर सोडून न देता त्यांना वीज कनेक्शनसाठी १० हजार रुपये, विद्युत पंपासाठी २५ हजार रुपये, तुषार सिंचन संचासाठी २५ हजार रुपयेही मागणीनुसार दिले जातात. पूर्वी विशेष घटक योजनेंतर्गत विहीर खोदण्यासाठी १ लाख रुपयांचे अनुदान दिले जात होते. ज्यांनी यापूर्वी विहीर योजनेचा लाभ घेतला असेल, अशा शेतकºयांना विहीर दुरुस्ती किंवा खोलीकरणासाठी ५० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. प्राप्त अर्जांची छाननी केल्यानंतर ८७२ जणांनी यापूर्वी लाभ घेतला असल्याचे दिसून आले, तर ४६३ जणांनी योजनेचे निकष पूर्ण केलेले नव्हते. त्यामुळे हे अर्ज बाद करण्यात आले. पात्र ९१२ अर्जांपैकी ४८९ लाभार्थ्यांची नवीन विहिरीसाठी निवड करण्यात आली. ३४ लाभार्थ्यांना विहीर दुरुस्तीसाठी अनुदान दिले जाणार असून, ४ शेतकºयांना विहिरीत बोअर घेण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे. जिल्ह्यात कृषी विभागाचे तालुकानिहाय ९ कृषी अधिकारी व २० कृषी विस्तार अधिकारी कार्यरत आहेत. या अधिकाºयांमार्फत निवड झालेल्या लााभार्थी शेतकºयांना विहीर खोदण्याचे ‘मार्कआऊट’ टाकून दिले जाईल. याच अधिकाºयांच्या मार्गदर्शनाखाली विहिरींचे काम पूर्ण केले जाईल. जसजशी विहिरींची कामे होतील, त्यानुसार हे अधिकारी मोजमाप पुस्तिकेत कामाच्या नोंदी घेतील व त्यानुसार त्यांना अनुदानाची रक्कम वाटप केली जाईल.पुढील वर्षासाठी प्रतीक्षा यादीसोडत पद्धतीने निश्चित केलेल्या लाभार्थ्यांशिवाय ४२३ लाभार्थ्यांची प्रतीक्षा यादी तयार करण्यात आली आहे. प्रतीक्षा यादीतील शेतकºयांचा या योजनेसाठी पुढील आर्थिक वर्षात विचार केला जावा, असा प्रस्ताव कृषी विभागामार्फत शासनाला पाठविला जाणार असल्याचे कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार यांनी सांगितले.