शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

सोयाबीन खरेद्री केंद्रावर शेतक-यांचा उद्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 23:05 IST

अंबड : येथील नाफेड केंद्रावर ग्रेडरने चांगल्या सोयाबीनला गुणवत्तेचे निकष लावून सुमारे चारशे क्विंटल सोयाबीन खरेदीस अपात्र ठरवली. त्यामुळे ...

अंबड : येथील नाफेड केंद्रावर ग्रेडरने चांगल्या सोयाबीनला गुणवत्तेचे निकष लावून सुमारे चारशे क्विंटल सोयाबीन खरेदीस अपात्र ठरवली. त्यामुळे सोयाबीन विक्रीस आलेल्या संतप्त शेतक-यांनी मंगळवारी दुपारी केंद्रावर ग्रेडरसह येथील कर्मचा-यांना घेराव घातला.अंबड येथील नाफेड केंद्रावर तीन नोव्हेंबरपासून सोयाबीन, मूग, उडीद खरेदी सुरू आहे. ३ ते १४ नोव्हेबरपर्यंत नाफेड केंद्रावर सोयाबीन खरेदी केंद्रावर ४८ शेतक-यांनी साधारण ८०० ते ९०० क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी केली होती. ८ नोव्हेंबरला मोबाईलवर प्राप्त संदेशावरून मच्छिंद्रनाथ चिंचोली, चिंचखेड, रामसगाव, चापडगाव, खालापुरी, देव हिवरा, खडका इ. गावांतील शेतकºयांनी मंगळवारी अंबड नाफेड खरेदी केंद्रावर साधारण ४०० क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आणली. परंतु येथील ठिकाणी ग्रेडरने सोयाबीन खरेदीचे निकष तपासून सर्व सोयाबीन खरेदीस अपात्र ठरवले. त्यामुळे शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात एकत्र जमवू लागले. सोयाबीन खरेदी करा असा आग्रह शेतक-यांनी धरला. परंतु परमेश्वर लांडगे व जिल्हा पणन अधिकारी पाटील यांनी सोयाबीनमध्ये आर्द्रता, फुटकळ दाणा, कचरा असल्याची कारणे सांगून सोयाबीन खरेदी करण्यास नकार दिला. एका शेतक-याची हेक्टरी ५.५४ क्विंटल सोयाबीन खरेदी केली जाईल, असे कृषी अधीक्षकांचे परिपत्रक दाखवून जास्त सोयाबीन खरेदी करण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या शेतक-यांनी नाफेड केंद्रासमोर आंदोलन सुरू केल्याने काही वेळ तणाव निर्माण झाला होता.