शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

शेतमालाचा इंधन निर्मितीसाठी वापर व्हावा

By admin | Updated: October 5, 2016 01:14 IST

औरंगाबाद : शेतमालाचा जोपर्यंत केवळ खाण्यासाठी वापर होईल तोपर्यंत त्याला चांगला दर मिळूच शकत नाही. म्हणून शेतमालाचा जैव इंधन निर्मितीसाठीही वापर होणे गरजेचे आहे

औरंगाबाद : शेतमालाचा जोपर्यंत केवळ खाण्यासाठी वापर होईल तोपर्यंत त्याला चांगला दर मिळूच शकत नाही. म्हणून शेतमालाचा जैव इंधन निर्मितीसाठीही वापर होणे गरजेचे आहे. शेतमालापासून इथेनॉल आणि बायो डिझेलची निर्मिती होऊ शकते. त्यामुळे शासनाने जैव इंधन निर्मितीसाठी शेतमालाचा वापर करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी जैव इंधन शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. गावोगावी असे कारखाने उभे राहिल्यास शेतमालाला चांगला भाव मिळून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील, अशी अपेक्षाही संघटनेने व्यक्त केली आहे.मंत्रिमंडळ बैठकीच्या पार्श्वभूमीवर जैव इंधन शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शामराव देसाई, राज्य महिला आघाडीच्या अध्यक्षा सुजाता देसाई आणि त्यांचे काही सहकारी औरंगाबाद शहरात आले आहेत. शामराव देसाई हे मागील दहा वर्षांपासून या मागणीबाबत शासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. ते म्हणाले, शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित दर आणि हमीभाव ही संकल्पना आता बाद झाली आहे. शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव मिळण्यासाठी शेती उत्पादने फक्त अन्न म्हणून वापरून चालणार नाही. त्यासोबतच त्याचा वापर इथेनॉल आणि बायो डिझेल निर्मितीसाठी करावा लागेल. असेही पृथ्वीच्या पोट्यातील इंधन संपणार आहे. त्यामुळे आतापासून शेतमालाचा वापर इंधन निर्मितीसाठी व्हायला हवा. गोड ज्वारी (स्वीट सोरगम), मका यासारख्या अनेक पिकांपासून इथेनॉलची निर्मिती करता येते. शासनाने शेतमालाचा जैव इंधन निर्मितीसाठी वापर करण्याची परवानगी देण्याची गरज आहे. तशी परवानगी दिल्यास असे कारखाने सुरू होऊन शेतकऱ्यांना भाव मिळेल. त्यामुळे शेतकरी आत्महत्याही थांबतील. वाजपेयी सरकारच्या काळात शेतमालापासून जैव इंधन निर्मितीची परवानगी देण्यात आली होती, असेही देसाई यांनी सांगितले.