शहरं
Join us  
Trending Stories
1
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
2
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
3
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका
4
 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...
5
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
6
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
7
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
8
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
9
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
10
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
11
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
12
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
13
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
14
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
15
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
16
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
17
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
18
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
19
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
20
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता

पीक कर्जासाठी शेतकरी मेटाकुटीला

By admin | Updated: July 7, 2014 00:42 IST

राजू वैष्णव , सिल्लोड पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर एकाच संस्थेचा बोजा असला पाहिजे, अशी नवीन अट राष्ट्रीयीकृत बँक ांकडून लादली जात असल्याने तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे.

राजू वैष्णव , सिल्लोडपीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर एकाच संस्थेचा बोजा असला पाहिजे, अशी नवीन अट राष्ट्रीयीकृत बँक ांकडून लादली जात असल्याने तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. गेल्या वर्षी मात्र पीक कर्ज देताना अशी अट नव्हती. यावर्षी बँकांकडून नवीन नियम व अट लागू क रून पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याने ‘भिक नको; पण कुत्रे आवर’ अशी म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. राष्ट्रीयीकृत बँकांकडून शेतकऱ्यांना कमी व्याजदराने प्रति एकर १३ ते १५ हजार रुपये पीक कर्ज दिले जाते. दरवर्षी शेतकरी जुने पीक कर्ज भरून नवे वाढीव कर्ज घेतात. दरवर्षी बहुतांश शेतकरी पीक कर्ज नवे-जुने करतात. सध्या राष्ट्रीयकृत बँकांमध्ये पीक कर्ज नवे-जुने करण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी होत आहे. बहुतांश शेतकऱ्यांवर सोसायटीचे कर्ज असल्याने त्याचा बोजा सातबाऱ्यावर आहे; परंतु बँकांकडून यावर्षी सातबाऱ्यावर एकाच संस्थेचा बोजा असला पाहिजे, असा नवीन नियम लागू केल्याने शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. दोन वर्षांपूर्वी शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागला. गेल्या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडूनही मार्च महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. यामुळे सलग दोन वर्षांपासून आर्थिक गणित बिघडल्याने शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे. तरीदेखील पीक कर्ज नवे-जुने करण्यासाठी शेतकऱ्यांनी पैशांची जुळवाजुळव केली; परंतु बँकांकडून नवीन नियम लागू केल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. गेल्या वर्षी पीक कर्ज देताना सोसायटीच्या बेबाकी प्रमाणपत्रावर शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यात आले. यंदा मात्र सोसायटीची बेबाकी व सातबाऱ्यावर पीक कर्ज देणाऱ्या बँकेशिवाय इतर संस्थेचा बोजा नसला पाहिजे, असा नवीन नियम व अट लागू केल्याने शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यासाठी बँकांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. बँकांचे उंबरठे झिजवून ही पीक कर्ज मिळत नसल्याने शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. जुने कर्ज भरून नवीन वाढीव कर्ज शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी जुने कर्ज भरून बँकेला सहकार्य करावे. नवीन वाढीव कर्ज घेताना सातबाऱ्यावर एकाच संस्थेचा बोजा असणे गरजेचे आहे. एकाच संस्थेक डून कर्ज घेणाऱ्या शेतक ऱ्यांना बँकेच्या नियमानुसार इतर शेती कर्ज उपलब्ध करून दिले जाईल, असे शरद रोडगे (शाखा व्यवस्थापक, बँक आॅफ महाराष्ट्र, सिल्लोड) यांनी सांगितले.बँकांकडून बळीराजाला सापत्न वागणूकसोसायटीकडून शेतकऱ्यांना प्रतिएकर साडेसहा हजार रुपयांप्रमाणे कर्जाचे वाटप केलेले आहे. बँक ांकडून १३ ते १५ हजार रुपये प्रति एकरप्रमाणे पीक कर्ज दिले जात आहे. ग्रामीण भागामध्ये जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत. कोरडवाहू जमिनीचा भाव प्रति एकर ५ ते ७ लाख, तर बागायत ८ ते १२ लाख रुपयांचा आहे. तरीदेखील शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना बँकांकडून नवीन नियम व अटी लागू करून वेठीस धरले जात आहे. शहरातील व्यापाऱ्यांना मात्र व्यवसायासाठी बँकांकडून सहज कर्ज उपलब्ध करून दिले जाते. शिवाय त्यांना व्यवसायासाठी लागणाऱ्या भांडवलानुसार कर्ज दिले जाते. पीक कर्जाव्यतिरिक्त इतर शेती कर्जासाठी बँका शेतकऱ्यांशी मात्र दुजाभाव क रीत आहेत.ठरवून दिलेल्या मर्यादेनुसार कर्ज उपलब्ध शेतकऱ्यांना पीक कर्जाशिवाय विहीर, पाईपलाईन, ट्रॅक्टर, ठिबक यासाठी बँकेकडून ठरवून दिलेल्या मर्यादेनुसार कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. यासाठी शेतकऱ्यांकडे एकाच संस्थेचे कर्ज असणे आवश्यक आहे. बँकांकडून पीक व इतर कर्जासाठी शेतकऱ्यांनी एकाच संस्थेकडून कर्ज घ्यावे, जेणेकरून कर्ज देताना बँकेला अडचण निर्माण होणार नाही -जी.एस.खवसे, शाखा व्यवस्थापक, स्टेट बँक आॅफ हैदराबाद