शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:02 IST

पाचोड : पैठण तालुक्यातील कोळीबोडखा गावातील एका शेतकऱ्याने डोक्यावर असलेला कर्जाचा डोंगर व तो फेडण्याचा एकमेव मार्ग असलेल्या ...

पाचोड : पैठण तालुक्यातील कोळीबोडखा गावातील एका शेतकऱ्याने डोक्यावर असलेला कर्जाचा डोंगर व तो फेडण्याचा एकमेव मार्ग असलेल्या शेतीचे निसर्गाच्या लहरीपणामुळे झालेले नुकसान याला कंटाळून विषारी द्रव प्राशन करून जीवन संपविले. बाबासाहेब यशवंतराव काळे (७०), असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.

पाचोडपासून जवळच असलेल्या कोळीबोडखा येथे बाबासाहेब काळे यांची अडीच एकर शेती आहे. शेतीसाठी त्यांनी दोन बँकेकडून कर्ज घेतले आहे. यावर्षी शेतात त्यांनी कपाशी व तुरीची लागवड केलेली असून, या पिकांच्या भरवशावर कर्ज फिटून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालेल याची त्यांना खात्री होती. पिकेही चांगलीच बहरात आलेली होती. मात्र, महिनाभरापासून परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे बाबासाहेब यांच्या शेतात पाणी साचून शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले. ज्याच्या भरवशावर त्यांनी स्वप्न पाहिले होते, ती पिकेच नष्ट झाल्याने बाबासाहेब संकटात सापडले. काय करावे, काय नाही याबाबत त्यांना काहीच सुचत नव्हते. शेतीसाठी काढलेले कर्ज कसे फेडायचे, कुठून पैसा आणायचा, या चिंतेने बाबासाहेबांचे अवसान गळाले. शुक्रवारी सकाळीच शेतात जाऊन त्यांनी विषारी द्रव प्राशन केले. ही बाब त्यांच्या पुतण्याच्या लक्षात आल्यानंतर त्यांना तत्काळ पाचोड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. बाबासाहेब घुगे व डॉ. शिवाजी पवार यांनी तपासून त्यांना मयत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून असा परिवार आहे. या घटनेची माहिती मिळताच पाचोड ठाण्याचे सपोनि. गणेश सुरवसे, जमादार किशोर शिंदे व फिरोज बर्डे यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

फोटो :

240921\anil mehetre_img-20210924-wa0017_1.jpg

बाबासाहेब यशवंतराव काळे