शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

...तर शेतकरी बँका फोडतील -बच्चू कडू

By admin | Updated: April 14, 2017 00:52 IST

अंबाजोगाई : केंद्र व राज्य शासन शेतकरी विरोधी धोरण राबवित असल्याने शेतकऱ्यांची दुरावस्था दिवसेंदिवस वाढत आहे.

अंबाजोगाई : केंद्र व राज्य शासन शेतकरी विरोधी धोरण राबवित असल्याने शेतकऱ्यांची दुरावस्था दिवसेंदिवस वाढत आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही तर शेतकरी संघटीत होवून बँका फोडतील असा सूचक इशारा आ.बच्च कडू यांनी दिला.प्रहार संघटना व शेतकरी संघटनेच्या वतीने ११ एप्रिलपासून नागपूर येथून निघालेली आसूड यात्रा २१ एप्रिल रोजी वडनगर येथे जात आहे. ही यात्रा गुरूवारी सायंकाळी अंबाजोगाईत पोहचली. आ.बच्चू कडू बोलत होते. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष कालीदास आपेट, प्रा.सुशिला मोराळे, राजाभाऊ गोकुळआष्टमी, प्रा.अंजली पाटील, अ‍ॅड.मनीषा रूपनर, डॉ.नरेंद्र काळे, संजय कुंबेफळकर उपस्थित होते.यावेळी आ.बच्चु कडू म्हणाले, शेतकऱ्यांना झुलवित ठेवण्याचे काम केंद्र व राज्य सरकार करीत आहे. आगामी काळात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय न घेतला तर शेतकरी एकत्रित येवून बँका फोडतील तसेच शेतकऱ्यांच्या कसल्याही कर्जाची वसूल दिली जाणार नाही. शासनाने १५ एप्रिल रोजी तूर खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतला तर मंत्र्यांच्या घरात आसूड यात्रा घसवली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी रघुनाथदादा पाटील म्हणाले, ज्या प्रमाणात जमिनीच्या किंमती शासनाने ठरविल्या त्याच प्रमाणात शेतकऱ्यांना कर्ज वाटप झाले पाहिजे. सोने तारण ठेवून कर्ज देता तसेच जमिनीला का देत नाहीत. हा दुजाभाव शासनाने बंद करावा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी बोलताना कालिदास आपेट म्हणाले, काँग्रेस व भाजपा सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत. सर्व धोरणे शासन शेतकरी विरोधी राबवित असल्याने दिवसेंदिवस शेतकरी कर्जबाजारीच होत असल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविक प्रा.अंजली पाटील यांनी तर आभार अ‍ॅड. मनीषा रूपनर यांनी मानले. आसूड यात्रेचे शहरात फटाक्याची आतषबाजीसह स्वागत झाले. (वार्ताहर)