शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

...तर शेतकरी बँका फोडतील -बच्चू कडू

By admin | Updated: April 14, 2017 00:52 IST

अंबाजोगाई : केंद्र व राज्य शासन शेतकरी विरोधी धोरण राबवित असल्याने शेतकऱ्यांची दुरावस्था दिवसेंदिवस वाढत आहे.

अंबाजोगाई : केंद्र व राज्य शासन शेतकरी विरोधी धोरण राबवित असल्याने शेतकऱ्यांची दुरावस्था दिवसेंदिवस वाढत आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही तर शेतकरी संघटीत होवून बँका फोडतील असा सूचक इशारा आ.बच्च कडू यांनी दिला.प्रहार संघटना व शेतकरी संघटनेच्या वतीने ११ एप्रिलपासून नागपूर येथून निघालेली आसूड यात्रा २१ एप्रिल रोजी वडनगर येथे जात आहे. ही यात्रा गुरूवारी सायंकाळी अंबाजोगाईत पोहचली. आ.बच्चू कडू बोलत होते. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष कालीदास आपेट, प्रा.सुशिला मोराळे, राजाभाऊ गोकुळआष्टमी, प्रा.अंजली पाटील, अ‍ॅड.मनीषा रूपनर, डॉ.नरेंद्र काळे, संजय कुंबेफळकर उपस्थित होते.यावेळी आ.बच्चु कडू म्हणाले, शेतकऱ्यांना झुलवित ठेवण्याचे काम केंद्र व राज्य सरकार करीत आहे. आगामी काळात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय न घेतला तर शेतकरी एकत्रित येवून बँका फोडतील तसेच शेतकऱ्यांच्या कसल्याही कर्जाची वसूल दिली जाणार नाही. शासनाने १५ एप्रिल रोजी तूर खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतला तर मंत्र्यांच्या घरात आसूड यात्रा घसवली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी रघुनाथदादा पाटील म्हणाले, ज्या प्रमाणात जमिनीच्या किंमती शासनाने ठरविल्या त्याच प्रमाणात शेतकऱ्यांना कर्ज वाटप झाले पाहिजे. सोने तारण ठेवून कर्ज देता तसेच जमिनीला का देत नाहीत. हा दुजाभाव शासनाने बंद करावा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी बोलताना कालिदास आपेट म्हणाले, काँग्रेस व भाजपा सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत. सर्व धोरणे शासन शेतकरी विरोधी राबवित असल्याने दिवसेंदिवस शेतकरी कर्जबाजारीच होत असल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविक प्रा.अंजली पाटील यांनी तर आभार अ‍ॅड. मनीषा रूपनर यांनी मानले. आसूड यात्रेचे शहरात फटाक्याची आतषबाजीसह स्वागत झाले. (वार्ताहर)