शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

...तर शेतकरी बँका फोडतील -बच्चू कडू

By admin | Updated: April 14, 2017 00:52 IST

अंबाजोगाई : केंद्र व राज्य शासन शेतकरी विरोधी धोरण राबवित असल्याने शेतकऱ्यांची दुरावस्था दिवसेंदिवस वाढत आहे.

अंबाजोगाई : केंद्र व राज्य शासन शेतकरी विरोधी धोरण राबवित असल्याने शेतकऱ्यांची दुरावस्था दिवसेंदिवस वाढत आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही तर शेतकरी संघटीत होवून बँका फोडतील असा सूचक इशारा आ.बच्च कडू यांनी दिला.प्रहार संघटना व शेतकरी संघटनेच्या वतीने ११ एप्रिलपासून नागपूर येथून निघालेली आसूड यात्रा २१ एप्रिल रोजी वडनगर येथे जात आहे. ही यात्रा गुरूवारी सायंकाळी अंबाजोगाईत पोहचली. आ.बच्चू कडू बोलत होते. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष कालीदास आपेट, प्रा.सुशिला मोराळे, राजाभाऊ गोकुळआष्टमी, प्रा.अंजली पाटील, अ‍ॅड.मनीषा रूपनर, डॉ.नरेंद्र काळे, संजय कुंबेफळकर उपस्थित होते.यावेळी आ.बच्चु कडू म्हणाले, शेतकऱ्यांना झुलवित ठेवण्याचे काम केंद्र व राज्य सरकार करीत आहे. आगामी काळात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय न घेतला तर शेतकरी एकत्रित येवून बँका फोडतील तसेच शेतकऱ्यांच्या कसल्याही कर्जाची वसूल दिली जाणार नाही. शासनाने १५ एप्रिल रोजी तूर खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतला तर मंत्र्यांच्या घरात आसूड यात्रा घसवली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी रघुनाथदादा पाटील म्हणाले, ज्या प्रमाणात जमिनीच्या किंमती शासनाने ठरविल्या त्याच प्रमाणात शेतकऱ्यांना कर्ज वाटप झाले पाहिजे. सोने तारण ठेवून कर्ज देता तसेच जमिनीला का देत नाहीत. हा दुजाभाव शासनाने बंद करावा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी बोलताना कालिदास आपेट म्हणाले, काँग्रेस व भाजपा सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत. सर्व धोरणे शासन शेतकरी विरोधी राबवित असल्याने दिवसेंदिवस शेतकरी कर्जबाजारीच होत असल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविक प्रा.अंजली पाटील यांनी तर आभार अ‍ॅड. मनीषा रूपनर यांनी मानले. आसूड यात्रेचे शहरात फटाक्याची आतषबाजीसह स्वागत झाले. (वार्ताहर)