शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

भाग्यश्री योजनेला कुटुंब नियोजन प्रमाणपत्राचा अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 00:43 IST

मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार निर्माण व्हावा, मुलींचा जन्मदर वाढावा, त्यांना योग्य शिक्षण मिळावे, बालविवाहास आळा बसावा यासाठी महिला व बालकल्याण विभागाने माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू केली आहे.

बाबासाहेब म्हस्के ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार निर्माण व्हावा, मुलींचा जन्मदर वाढावा, त्यांना योग्य शिक्षण मिळावे, बालविवाहास आळा बसावा यासाठी महिला व बालकल्याण विभागाने माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू केली आहे. मात्र, या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे प्रमाणपत्र आवश्यक असल्याने आतापर्यंत एकही प्रस्ताव प्राप्त झालेला नाही.मुलींचे शिक्षण, आरोग्य यामध्ये सुधारणा करणे, त्यांच्या उज्ज्वल भविष्याकरिता आर्थिक तरतूद करणे, स्त्री भू्रणहत्या रोखणे या उद्देशाने शासनामार्फत वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतात. याचाच एक भाग म्हणून राज्य शासनाने २०१४ मध्ये सुकन्या योजना सुरू केली.१ आॅगस्ट २०१७ पासून महिला व बालकल्याण विभागाने सुकन्या योजनेचे विलिनीकरण ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेत केले आहे. सुधारित योजनेनुसार पात्र लाभार्थी कुटुंबाला मुलीच्या वयाच्या अठराव्या वर्षी शासनाकडून बँक खात्यामध्ये ५० हजार रुपये जमा केले जाणार आहेत.भाग्यश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधितांनी दोन किंवा एका मुलीवर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करायला हवी, ही महत्त्वाची अट आहे. तीन अपत्ये असणाºयांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच पहिली मुलगी २०१४ नंतर जन्मलेली असावी.त्या पूर्वी जन्मलेल्या मुलीचा प्रस्ताव स्वीकारण्यात येणार नाही. मात्र, दुसºया प्रसुतीस जुळ्या मुली झाल्यास योजनेस पात्र राहणार आहेत.दोन मुलींच्या जन्मानंतर कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर प्रस्ताव दाखल करता येणार आहे. मात्र जनजागृतीचा अभाव व गुंतागुंतीच्या निकषांमुळे योजनेबाबत पालकांची भूमिका उदासीन आहे.योजनेबाबत तालुकास्तरावर बालविकास प्रकल्प अधिकाºयांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास अधिकारी एस.डी. लोंढे यांनी सांगितले.