शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
5
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
6
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
7
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
8
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
9
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
10
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
11
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
12
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
13
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
14
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
15
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
16
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
17
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
18
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
19
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
20
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...

चौकशी समितीने आवळला फास

By admin | Updated: March 14, 2016 00:56 IST

औरंगाबाद : प्राणिसंग्रहालयातील बिबट्यांच्या पिलांच्या मृत्यूप्रकरणी वन विभागापाठोपाठ आता पशुसंवर्धन विभागाकडूनही चौकशी होत आहे.

औरंगाबाद : प्राणिसंग्रहालयातील बिबट्यांच्या पिलांच्या मृत्यूप्रकरणी वन विभागापाठोपाठ आता पशुसंवर्धन विभागाकडूनही चौकशी होत आहे. मनपा आयुक्तांच्या विनंतीवरून पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयातर्फे ही चौकशी केली जात आहे. रविवारी या विभागाच्या एका पथकाने प्राणिसंग्रहालयात येऊन दीड तास चौकशी केली.मनपाच्या प्राणिसंग्रहालयात १७ फेबु्रवारी रोजी हेमलकसा येथून बिबट्यांची एक जोडी आणण्यात आली. त्यातील रेणू नावाच्या बिबट्याने येथे आल्यानंतर ७ मार्च रोजी तीन गोंडस पिलांना जन्म दिला. मात्र जन्मानंतर अवघ्या ३६ तासांतच या पिलांचा मृत्यू झाला. रेणू गरोदर असल्याची कोणतीही पूर्वकल्पना प्राणिसंग्रहालय प्रशासनाला नव्हती. त्यामुळे तिची योग्य काळजी घेण्यात आली नाही. शिवाय आठवडाभर आधी ती आजारी पडल्यामुळे तिला औषधांचे हाय पॉवर डोस दिले गेले. परिणामी रेणूची मुदतपूर्व प्रसूती झाली. त्यामुळे पिल्ले अशक्त जन्मून त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे यांच्यासह संबंधित अधिकारी अडचणीत आले आहेत. याप्रकरणी वन विभागाने शनिवारीच गुन्हा दाखल केला आहे. आता वन विभागाकडून याप्रकरणी स्वतंत्र चौकशी केली जात आहे. दरम्यान, मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनीही याप्रकरणी चौकशी करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी पशुसंवर्धन विभागाच्या उपायुक्तांना पत्र लिहून चौकशी अहवाल देण्याची विनंती केली होती. त्याप्रमाणे पशुसंवर्धन विभागाने या प्रकरणात नियुक्त केलेल्या चौकशी समितीने आज रविवारी प्राणिसंग्रहालयाला भेट दिली. चार सदस्यीय पथकाने रेणूला ठेवलेला पिंजरा, तिच्या केलेल्या उपचारांची कागदपत्रे आदींची पाहणी केली. तसेच कर्मचाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्याकडूनही माहिती घेतली. मनपा आयुक्तांनी या पथकाला अहवाल सादर करण्यासाठी तीन दिवसांची मुदत दिली आहे. त्यानंतर डॉ. नाईकवाडे यांच्यावर कारवाईची शक्यता आहे.