शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

निकालात घसरण

By admin | Updated: June 18, 2014 01:26 IST

परभणी: महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत यंदा परभणी जिल्ह्याची मोठी घसरण झाली

परभणी: महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत यंदा परभणी जिल्ह्याची मोठी घसरण झाली असून, विभागात परभणी जिल्हा शेवटच्या क्रमांकावर फेकल्या गेला आहे. जिल्ह्याचा एकूण निकाल ७९.१६ टक्के लागला आहे.जिल्ह्यातील ३७५ शाळांमधून २२ हजार ८१९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १८ हजार ६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ३ हजार १९० विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले असून, प्रथम श्रेणीत ६ हजार १६५, द्वितीय श्रेणीत ६ हजार ९४३ तर १ हजार ७६६ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले. औरंगाबाद विभागाचा निकाल ८७.०६ टक्के लागला असून, ९१.८८ टक्के निकालासह बीड जिल्हा अव्वल ठरला आहे. त्याखालोखाल जालना जिल्ह्याचा ८८.४५, औरंगाबाद जिल्ह्याचा ८८.१४, हिंगोली जिल्ह्याचा ८०.८३ टक्के आणि परभणी जिल्ह्याचा निकाल ७९.१६ टक्के लागला. (प्रतिनिधी)आइचे नाव अनिवार्य...यावर्षी प्रथमच निकाल पाहण्यासाठी परीक्षा क्रमांकाबरोबरच परीक्षार्थ्याच्या आईचे नाव नोंदवावे लागले. आईचे नावाशिवाय निकाल पाहता येत नव्हता. त्यामुळे विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम आईचे नाव नोंदवावे लागले.दहावीतही मुलीच...दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे यावर्षीही दहावीच्या निकालात मुलींनी आघाडी घेतली आहे. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ८३.१० टक्के असून, मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ७६.४१ टक्के आहे. परभणी जिल्ह्यातून ९४६६ मुलींनी परीक्षेसाठी अर्ज दाखल केला होता. त्यापैकी ९ हजार ३७९ विद्यार्थिनींनी परीक्षा दिली. ७ हजार ७७९४ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर १३ हजार ६४९ मुलांनी परीक्षा अर्ज भरले. त्यापैकी १३ हजार ४४० मुलांनी परीक्षा दिली. १० हजार २७० मुले उत्तीर्ण झाले आहेत.यावर्षी जिल्ह्यातील बहुतांश शाळांचे निकाल बऱ्यापैकी आहेत. निकाल घोषित झाल्यानंतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. पेढे वाटून पालकांनी देखील आनंद व्यक्त केला.विद्यार्थी नेटकॅफेकडेमंगळवारी दुपारी १ वाजता दहावीचा निकाल आॅनलाईन जाहीर करण्यात आला. विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी नेट कॅफेकडे धाव घ्यावी लागली. शहरातील विश्वशांती ज्ञानपीठ यासह अन्य संस्थांनी मोफत निकाल पाहण्याची व्यवस्था केली होती. त्यामुळ या ठिकाणी निकालासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती.