परतूर: परतूर तालूक्यातील पाटोदा या गावात महिलांच्या अंगावरील दागिने पळवण्याचे प्रकार वाढल्याने या गावातील महिलांनी चक्क आता नकली दागिने घातले आहेत.या गावात मागील महिनाभरापासून चोरांचा सुळसुळाट झाला आहे, शेतवस्तीवर हल्ला, शेतकऱ्यांना माहाण करणे, शेतातील घर जाळून टाकणे आदी घटना घडल्या आहेत. या बरोबरच चोरट्यांनी आता गावातही शिरकाव करून महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबविण्याचे सत्र सुरू केले आहे. गेल्या तीन दिवसांपूर्वी दोन घटना सलग घडलया. या घटनांचा आष्टी, परतूरच्या पोलिसांनी तपास केला मात्र याचा काहीच सुगावा लागला नाही, गावकऱ्यांनीही एकत्र येवून चोरट्यांचा पाठलाग केला. मात्र हाती काहीच लागले नाही, या प्रकाराने महिला वर्गात भीती निर्माण झाली आहे. गळयात मंगळसूत्रही घालणे धोक्याचे झाले आहे. परंतु मंगळसुत्र घालणे तर आवश्यक आहे, यावर या गावातील महिलांनी आता चक्क चोरटयांच्या भितिने नकली दागिने घालायला सुरूवात केली आहे. सध्या शेतात जाणेही महत्वाचे असल्याने यावर उपाय म्हणून या गावातील महिलांनी शक्कल लढवून चक्क नकली दागिने घालायला सुरूवात केली आहे. (वार्ताहर)
पाटोद्यात महिलांनी घातले नकली दागिने
By admin | Updated: February 20, 2015 00:06 IST