शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

डासोत्पत्ती रोखण्यात मनपाला अपयश !

By admin | Updated: November 7, 2014 00:42 IST

लातूर : पावसाळ्यात गप्पी मासे सोडले नाहीत की, कोरडा दिवस पाळला नाही. धूर फवारणी तर लांबच. मनपाच्या या अक्षम्य दुर्लक्षामुळे लातूर शहरात मोठ्या प्रमाणात डासोत्पत्ती ठिकाणे वाढली आहेत.

लातूर : पावसाळ्यात गप्पी मासे सोडले नाहीत की, कोरडा दिवस पाळला नाही. धूर फवारणी तर लांबच. मनपाच्या या अक्षम्य दुर्लक्षामुळे लातूर शहरात मोठ्या प्रमाणात डासोत्पत्ती ठिकाणे वाढली आहेत. परिणामी, डेंग्यूचा एडिस इजिप्ती डास सक्रिय झाला आहे. त्याच्या दंशामुळे जिल्ह्यातील ५५ जणांना डेंग्यूची लागण झाली असून, चौघांना या डासाने गिळंकृत केले आहे. तरीही मनपा झोपेतच आहे. ‘लोकमत’ने गेल्या तीन दिवसांपासून आणि यापूर्वीही वृत्त प्रकाशित केल्यानंतर काही प्रमाणात झोपलेली मनपा जागी झाली आणि कर्मचाऱ्यांनानोटिसा देण्यात आल्या. मात्र फॉगिंग करून डासोत्पत्ती ठिकाणे नष्ट करण्यात मनपाचे दुर्लक्षच आहे.लातूर शहरात चारशे ते सव्वाचारशे डासोत्पत्ती ठिकाणे आहेत. जिल्हाभरात सहाशे ते सातशे डासोत्पत्ती ठिकाणे आहेत. या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात डासोत्पत्ती होत आहे. या डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पावसाळ्यात हौदात गप्पी मासे सोडले जातात. तर घरोघरी कोरडा दिवस पाळून डासोत्पत्ती रोखण्याचा प्रयत्न केला जातो. जिल्हा हिवताप कार्यालयाच्या वतीने डासोत्पत्ती ठिकाणांचा शोध घेऊन संबंधित यंत्रणेला ती नष्ट करण्याबाबत सुचविले जाते. परंतु, गेल्या पावसाळ्यात ना हिवताप कार्यालयाने गप्पी मासे सोडले ना मनपाने डासोत्पत्ती ठिकाणे नष्ट करण्यासाठी मोहीम राबविली. परिणामी, गेल्या दोन महिन्यांपासून डासांचा उद्रेक वाढला आहे. जिल्हाभरात डेंग्यूसदृश रुग्ण सापडत आहेत. जिल्हा हिवताप कार्यालयाने जे अडीच हजार रक्तनमुने प्रयोगशाळेला पाठविले, वर्षभरात ५५ रुग्णांच्या रक्तनमुन्याचा डेंग्यू पॉझिटिव्ह आला आहे. विशेष म्हणजे या डेंग्यूच्या तापीने चौघा जणांचा मृत्यू झाला. तरीही मनपा डासोत्पत्ती रोखण्याबाबत पुढे येऊ शकली नाही. हिवताप कार्यालयाने जिल्ह्यातील मनपा, नगरपालिका, ग्रामपंचायतींना डासोत्पत्तीचा उद्रेक कळूनही डासोत्पत्ती ठिकाणे नष्ट होऊ शकली नाहीत. (प्रतिनिधी)लातूर शहरातील प्रत्येक प्रभागांत सकाळी व संध्याकाळी धूर फवारणी करण्यात येत आहे. मनपाकडे धूर फवारणीचे १३ यंत्र आहेत. या यंत्राद्वारे प्रत्येक प्रभागात धूर फवारणी सुरू करण्यात आली आहे. सकाळी व संध्याकाळी एक-एक वॉर्ड धरून फवारणी केली जात आहे. त्यासोबतच अ‍ॅबेटिंगही केली जात आहे. पाण्यात औषधी मिसळून डासोत्पत्ती रोखण्याचा प्रयत्न मनपाने हाती घेतला आहे. डास वाढणार नाहीत, यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी आणि मनपाला सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य अधिकारी डॉ. महेश पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यातील ५५ जणांना डेंग्यू झाला, तर चौघा जणांचा मृत्यू झाला. खाजगी रुग्णालयांतील अनेक रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह आहेत. परंतु, जिल्हा हिवताप कार्यालयाच्या प्रयोगशाळेतून आलेला अहवालाच ग्राह्य धरल्यामुळे खाजगी रुग्णालयातील रुग्ण संशयित डेंग्यू म्हणूनच ग्राह्य धरले जातात. एवढ्या मोठ्या प्रमाणात डेंग्यूचा उद्रेक सुरू असताना मनपा झोपेत आहे. ४‘लोकमत’मध्ये या डेंग्यूच्या उद्रेकाबाबत वृत्त प्रकाशित होताच लातूर मनपाने १५२ लोकांना नोटिसा पाठविल्या आहेत. एवढीच कारवाई मनपाने केली आहे. अद्याप धूर फवारणी केल्याचे दिसत नाही. तात्पुरते व कायमस्वरूपी डासोत्पत्ती ठिकाणांचा शोध घेऊन त्या नष्ट करण्याबाबत अद्याप उपाययोजना नसल्याने डासांचा उद्रेक सुरू आहे.