शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
5
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
6
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
7
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
8
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
9
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
10
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
11
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
12
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
13
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
14
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
15
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
16
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
17
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
18
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
19
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
20
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी

कर्जमाफी अर्ज आॅनलाइन भरण्यात जालना आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 00:44 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ४३ हजार ६५८ शेतकºयांनी आॅनलाइन अर्ज भरले आहेत. कर्जमाफीचे अर्ज भरण्यात जालना जिल्हा राज्यात सहाव्या तर मराठवाड्यात प्रथम क्रमांकावर आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ४३ हजार ६५८ शेतकºयांनी आॅनलाइन अर्ज भरले आहेत. कर्जमाफीचे अर्ज भरण्यात जालना जिल्हा राज्यात सहाव्या तर मराठवाड्यात प्रथम क्रमांकावर आहे. उर्वरित शेतकºयांचे अर्ज प्रशासनाने तातडीने भरून या योजनेपासून एकही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी सोमवारी दिले.पालकमंत्र्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आॅनलाईन अर्ज भरणे, स्वच्छ भारत मिशन, जलयुक्त शिवार अभियान, पीकविमा, वृक्ष लागवड याबाबत आढावा बैठक घेतली. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा पात्र शेतकºयांना लाभ व्हावा यासाठी शेतकºयांकडून आनलाईन अर्ज भरून घेण्यात येत आहे. जिल्ह्यातील चार लाख १८ शेतकºयांपैकी एक लाख ८१ हजार ९८१ शेतकºयांनी या योजनेसाठी नोंदणी केलेली आहे. यापैकी एक लाख ४३ हजार ६५८ शेतकºयांचे अर्ज आॅनलाईन अपलोड करण्यात आले आहेत.औरंगाबाद जिल्ह्याने आतापर्यंत एक लाख ४५ हजार, परभणी जिल्ह्यात ६६ हजार, हिंगोली ६९ हजार, बीडमध्ये १ लाख १६ हजार, नांदेड एक लाख ३४ हजार, लातूर १ लाख ४२ हजार व उस्मानाबाद जिल्ह्याने १ लाख १ हजार शेकºयांचे अर्ज आॅनलाइन अपलोड केले आहेत. उर्वरित शेतकºयांचे अर्ज तातडीने आॅनलाईन अपलोड करण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचाºयांनी वैयक्तिक लक्ष देऊन समन्वयाने काम करावे, अशा सूचना लोणीकर यांनी दिल्या.जलयुक्त शिवार अभियान व स्वच्छता अभियानाच्या कामास गती देण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाºयांना दिल्या. या वेळी जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी दशरथ तांभाळे, जिल्हा उपनिबंधक नारायण आघाव यांची उपस्थिती होती.