शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
3
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
4
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
5
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
6
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
7
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
8
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
9
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
10
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
11
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
12
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
13
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
14
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
15
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
16
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
17
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
18
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
19
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
20
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार

नवरात्रात अनवाणी राहण्याचे ‘फॅड’

By admin | Updated: September 29, 2014 00:42 IST

अंबाजोगाई: विज्ञान युगात श्रद्धेपेक्षा अंधश्रद्धेलाच मोठे महत्त्व प्राप्त होत असल्याचा प्रत्यय सुरू असलेल्या नवरात्रौ महोत्सवात समोर आला आहे.

अंबाजोगाई: विज्ञान युगात श्रद्धेपेक्षा अंधश्रद्धेलाच मोठे महत्त्व प्राप्त होत असल्याचा प्रत्यय सुरू असलेल्या नवरात्रौ महोत्सवात समोर आला आहे. युवक व युवती तसेच प्राथमिक शाळेतील बालकेही नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने नऊ दिवस पादत्राणाचा वापर करायचा नाही हे फॅडच जणु काही पसरल्याने शहरात अनवाणीपणे चालणाऱ्या युवक-युवतींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. संगणकीकरण, विज्ञान,तंत्रज्ञान यांचा झपाट्याने होत असलेला प्रसार, भौतिक सुविधांची रेलचेल अशाही स्थितीत श्रद्धेपेक्षा अंधश्रद्धेचे वाढत असलेले महत्त्व नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने समोर आले आहे. योगेश्वरी देवीचे नवरात्र सुरू झाल्यानंतर घटस्थापनेपासूनच अनवाणी राहण्याचा संकल्प शहरातील महाविद्यालयीन युवक-युवतींनी केला आहे. अनवाणी राहयचे हे फॅड यावर्षीच्या नवरात्रौ मोठ्या प्रमाणात पसरले आहे. येथील शालेय विद्यार्थी मांगल्य मोरोपंत कुलकर्णी याच्याकडे याबाबत विचारणा केली असता मातीत अनवाणीपणे चालल्यास रक्ताभिसरण चांगले होते. अशी प्रतिक्रिया त्याने दिली. विज्ञानाचा आधार त्याने सांगितला. मात्र, शाळेतील अनेक मुली योगेश्वरी देवीसाठी आपण अनवाणी फिरत असल्याचे त्या म्हणाल्या. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे बीड जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. डी. एच. थोरात म्हणाले की, तंत्रशिक्षण घेणारे व विज्ञानाचे पदवीधर विद्यार्थीही अनवाणीपणे फिरत आहेत. या रूढी व अंधश्रद्धेबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.अनवाणी फिरण्यामुळे पायाला होणाऱ्या जखमा व जंतुसंसर्ग याचा मोठा त्रास काही दिवसानंतर सुरू होतो. असे सांगून समाजात प्रबोधन व उद्बोधन झाल्यासच या प्रथा दूर होतील. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. पूर्वी शहरातील काही ज्येष्ठ मंडळी अथवा महिला या प्रथेचे पालन करीत असत.मात्र, आता ज्येष्ठांपेक्षा युवक-युवतींनीच या नवरात्रात हे फॅड फॅशन म्हणून रूढ केल्याने अनवाणीपणे चालणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. (वार्ताहर)