शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

शेतकऱ्यांचे पावसाकडे डोळे

By admin | Updated: June 15, 2014 00:34 IST

नांदेड : शेतकऱ्यांनी नांगरणी, वखरणी आदी मशागतीची कामे पूर्ण करुन खत-बी-बियाणाची खरेदी केली. आता बळीराजा आकाशाकडे डोळे करुन पावसाची प्रतीक्षा करीत आहे.

नांदेड : शेतकऱ्यांनी नांगरणी, वखरणी आदी मशागतीची कामे पूर्ण करुन खत-बी-बियाणाची खरेदी केली. आता बळीराजा आकाशाकडे डोळे करुन पावसाची प्रतीक्षा करीत आहे.यंदा जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ७ लाख ६५ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असून यापैकी सोयाबीनची ३ लाख तर कापसाची २ लाख २५ हजार हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे. बी-बियाणाच्या दरात गतवर्षीपेक्षा जवळपास दीडपटीने वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांची बियाणे खरेदी करताना चांगलीच दमछाक होत आहे. यावर्षी कापसाच्या बियाणाचे दर टिकून असले तरी सोयाबीनच्या बियाणामध्ये बऱ्याच अंशी वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना खरेदी करताना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. ज्या प्रमाणात बियाणाच्या दरात वाढ झाली त्या तुलनेत शेतमालाचे दर अत्यल्प वाढले आहेत.मृग नक्षत्र सुरु होऊनही आठ दिवसांचा कालावधी झाला आहे. मात्र अद्यापही पावसाने हजेरी लावली नाही. तापमान उन्हाळ््यासारखेच जाणवत असल्याने अंगाची लाहीलाही होत असून शेतकऱ्यांसह सर्वच जणांना आता पावसाची प्रतीक्षा लागली आहे. यंदा राज्यात मान्सून लवकर दाखल झाला तर पेरण्या वेळेवर ्आटोपणार आहेत. अन्यथा पेरण्याला उशीर झाला तर हंगाम चांगला येत नाही. यावर्षी जून महिना अर्धा संपत आला असतांना अजूनही पावसाचा पत्ता नाही. यामुळे पेरण्या वेळेवर होणार की नाही, याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. गतवर्षी जून महिन्यात पाऊस पहिल्याच आठवड्यात पाऊस बरसल्याने काही भागात पेरण्यालाही लवकरच प्रारंभ झाला होता. मात्र यावर्षी अद्याप पावसाचे वातावरणही तयार झालेले नाही.कापूस तसेच सोयाबीनला उत्पादन खर्चावर आधारित मिळत असलेला अत्यल्प भाव यामुळे बहुतांश शेतकरी हरभरा व अन्य पिकांना पसंती देत आहेत. यावर्षी तरी कापसाच्या दरामध्ये चांगली वाढ होईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र कृषिमूल्य आयोगाने कापसाला प्रतिक्विंटल केवळ ५० रुपये दरवाढ जाहीर करुन उत्पादकांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. (प्रतिनिधी)