शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
3
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
4
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
5
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
6
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
7
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
8
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
9
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
10
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
11
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
12
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
13
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
14
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
15
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
16
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
17
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
18
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
19
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

‘दख्खनी’ मातीची मिजासच निराळी!

By admin | Updated: December 29, 2014 01:07 IST

औरंगाबाद : मराठवाड्याच्या (दख्खन) मातीची मिजासच निराळी आहे. अमृतापेक्षाही गोड येथील भाषा असून, संस्कृतीलाही तोड नाही.

औरंगाबाद : मराठवाड्याच्या (दख्खन) मातीची मिजासच निराळी आहे. अमृतापेक्षाही गोड येथील भाषा असून, संस्कृतीलाही तोड नाही. उर्दू अदबच्या दुनियेत दख्खनी मातीचा उल्लेख नसेल तर उर्दू साहित्याचा इतिहास पूर्ण होऊच शकत नाही, असा सूर आज येथे आयोजित एका परिसंवादात मान्यवरांनी आळवला.आमखास मैदानावर सुरू असलेल्या ‘उर्दू किताब मेला’च्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. आज सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटरमध्ये उर्दू साहित्य अकादमीतर्फे ‘मराठवाडा में उर्दू अदब, सिम्त व रफ्तार’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले होते.यावेळी व्यासपीठावर दिल्ली विद्यापीठातील निवृत्त उर्दू विभागप्रमुख डॉ.अतीक-उल्ला, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. इरतेकाज अफजल, राष्ट्रीय उर्दू भाषा विकास परिषदेचे संचालक डॉ. खाजा मोहंमद इकरामोद्दीन, शारेख नक्षबंदी यांची उपस्थिती होती.यावेळी डॉ. इरतेकाज अफजल यांनी मराठवाड्यातील उर्दू साहित्य, संस्कृतीचा धावता आढावा घेतला. स्वातंत्र्यानंतरही या मातीमधील अनेक गावांमध्ये रेल्वे जात नाही. जिथे जाते तिथे थांबत नाही ही शोकांतिका असली तरी लेखकासाठी हा विषय आहे.मैं चरागों को रौषणी दुंगा, तुम हवाओं के कान भर देना...असे हलक्या फुलक्या साहित्यापासून वली दकनी, नुरूल हसनैन, शाह सिराज वली, काझी सलीम, अशा अनेक शायर मंडळींचे नाव घेता येईल. त्यांनी उर्दू साहित्याला दिलेले योगदान येणारी पिढी कधीच विसरू शकत नाही. दख्खनच्या कोणत्या प्रदेशात तुम्ही भर उन्हाळ्यात गेल्यावर एक प्रकारचा विशेष सन्नाटा पाहायला मिळतो, अनेक लेखकांनी यावरही भाष्य केलेले आहे.या मातीत शब्द ठासून भरले आहेत. येथील रस्ते, बाजार, वारा, सण प्रत्येक गोष्ट संस्कृतीतून झळकत असते. हा वारसा जपणे आपले कर्तव्य आहे. येणाऱ्या पिढीने साहित्य लिहिले नाही तर किमान वाचायला तरी हवे, असे आवाहन त्यांनी केले.डॉ. इकरामोद्दीन यांनी उर्दू भाषेच्या विकासासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून अनेक ठोस पावले उचलण्यात येत असल्याचे नमूद केले. आपल्याकडे काही प्रस्ताव असल्यास परिषदेकडे अवश्य पाठवावेत, असे आवाहनही त्यांनी केले. परिसंवादात असलम मिर्झा, डॉ. मसरत फिरदोस, डॉ. शरफून निहार, अशरफ जावेद, डॉ. काझी अख्तर सुलताना, डॉ. हमीद उल्ला खान, डॉ. रिजवाना शमीम, डॉ. कीर्ती मालिनी जावळे आदींनी शोधनिबंध सादर केले. सूत्रसंचालन नवीन जे. पी. सईद यांनी केले.