शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

‘दख्खनी’ मातीची मिजासच निराळी!

By admin | Updated: December 29, 2014 01:07 IST

औरंगाबाद : मराठवाड्याच्या (दख्खन) मातीची मिजासच निराळी आहे. अमृतापेक्षाही गोड येथील भाषा असून, संस्कृतीलाही तोड नाही.

औरंगाबाद : मराठवाड्याच्या (दख्खन) मातीची मिजासच निराळी आहे. अमृतापेक्षाही गोड येथील भाषा असून, संस्कृतीलाही तोड नाही. उर्दू अदबच्या दुनियेत दख्खनी मातीचा उल्लेख नसेल तर उर्दू साहित्याचा इतिहास पूर्ण होऊच शकत नाही, असा सूर आज येथे आयोजित एका परिसंवादात मान्यवरांनी आळवला.आमखास मैदानावर सुरू असलेल्या ‘उर्दू किताब मेला’च्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. आज सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटरमध्ये उर्दू साहित्य अकादमीतर्फे ‘मराठवाडा में उर्दू अदब, सिम्त व रफ्तार’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले होते.यावेळी व्यासपीठावर दिल्ली विद्यापीठातील निवृत्त उर्दू विभागप्रमुख डॉ.अतीक-उल्ला, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. इरतेकाज अफजल, राष्ट्रीय उर्दू भाषा विकास परिषदेचे संचालक डॉ. खाजा मोहंमद इकरामोद्दीन, शारेख नक्षबंदी यांची उपस्थिती होती.यावेळी डॉ. इरतेकाज अफजल यांनी मराठवाड्यातील उर्दू साहित्य, संस्कृतीचा धावता आढावा घेतला. स्वातंत्र्यानंतरही या मातीमधील अनेक गावांमध्ये रेल्वे जात नाही. जिथे जाते तिथे थांबत नाही ही शोकांतिका असली तरी लेखकासाठी हा विषय आहे.मैं चरागों को रौषणी दुंगा, तुम हवाओं के कान भर देना...असे हलक्या फुलक्या साहित्यापासून वली दकनी, नुरूल हसनैन, शाह सिराज वली, काझी सलीम, अशा अनेक शायर मंडळींचे नाव घेता येईल. त्यांनी उर्दू साहित्याला दिलेले योगदान येणारी पिढी कधीच विसरू शकत नाही. दख्खनच्या कोणत्या प्रदेशात तुम्ही भर उन्हाळ्यात गेल्यावर एक प्रकारचा विशेष सन्नाटा पाहायला मिळतो, अनेक लेखकांनी यावरही भाष्य केलेले आहे.या मातीत शब्द ठासून भरले आहेत. येथील रस्ते, बाजार, वारा, सण प्रत्येक गोष्ट संस्कृतीतून झळकत असते. हा वारसा जपणे आपले कर्तव्य आहे. येणाऱ्या पिढीने साहित्य लिहिले नाही तर किमान वाचायला तरी हवे, असे आवाहन त्यांनी केले.डॉ. इकरामोद्दीन यांनी उर्दू भाषेच्या विकासासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून अनेक ठोस पावले उचलण्यात येत असल्याचे नमूद केले. आपल्याकडे काही प्रस्ताव असल्यास परिषदेकडे अवश्य पाठवावेत, असे आवाहनही त्यांनी केले. परिसंवादात असलम मिर्झा, डॉ. मसरत फिरदोस, डॉ. शरफून निहार, अशरफ जावेद, डॉ. काझी अख्तर सुलताना, डॉ. हमीद उल्ला खान, डॉ. रिजवाना शमीम, डॉ. कीर्ती मालिनी जावळे आदींनी शोधनिबंध सादर केले. सूत्रसंचालन नवीन जे. पी. सईद यांनी केले.