शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
3
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
4
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
5
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
6
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
7
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
8
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
9
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
10
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
11
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
12
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
13
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
14
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
15
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
16
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
17
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
18
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
19
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
20
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश

२०४ शाळांचे राज्यस्तरीय पथकाकडून बाह्य मूल्यमापन

By admin | Updated: April 6, 2017 23:24 IST

लातूर : जिल्हा परिषदेबरोबर खाजगी शाळांची गुणवत्ता वाढावी म्हणून केंद्र शासनाच्या वतीने शाळा सिद्धी उपक्रम सुरू करण्यात आला आहे़

लातूर : जिल्हा परिषदेबरोबर खाजगी शाळांची गुणवत्ता वाढावी म्हणून केंद्र शासनाच्या वतीने शाळा सिद्धी उपक्रम सुरू करण्यात आला आहे़ या उपक्रमांतर्गत स्वयंमूल्यमापनात ‘अ’ दर्जा मिळालेल्या जिल्ह्यातील २०४ शाळांचे आता राज्यस्तरीय पथकाकडून बाह्य मूल्यमापन होणार आहे़ त्यामुळे या शाळांची धाकधूक वाढली आहे़ तर शासनाची आपल्यामागे कटकट नको म्हणून २३५१ शाळांनी ‘अ’ दर्जा वगळून अन्य दर्जा दिला आहे़ शहराबरोबर ग्रामीण भागातील गुणवत्तेचे प्रमाण वाढावे, यासाठी केंद्र शासनाच्या वतीने शाळासिद्धी उपक्रम सुरू आहे़ या उपक्रमांतर्गत ७ गाभाघटक असून, ४६ मानके आहेत़ शाळेचे सामर्थ्यस्त्रोत, उपलब्धता, पर्याप्तता व उपयुक्तता तसेच अध्ययन, अध्यापन व मुल्यमापन, अध्ययनार्थींची प्रगती, संपादणुक व विकास, शिक्षक कामगिरी व व्यावसायिक विकासाचे व्यवस्थापन, शालेय नेतृत्व आणि व्यवस्थापन, समावेशन, आरोग्य व सुरक्षा, उत्पादक समाजाचा सहभाग या गाभाघटकांतर्गत तपासणी केली जाणार आहे़ जिल्ह्यात एकूण २ हजार ६४१ शाळा आहेत़ त्यापैकी २ हजार ५९८ शाळांनी आपले स्वयंमूल्यमापन पूर्ण करून त्याचा अहवाल शासनाकडे आॅनलाईन पद्धतीने सादर केला आहे़ दरम्यान, ४३ शाळांनी या उपक्रमास कुठलाही प्रतिसाद दिला नाही़ विशेष म्हणजे २ हजार ३५१ शाळांनी स्वयंमूल्यमापनात ‘अ’ दर्जा वगळता ब, क, ड असा दर्जा दिला आहे़ ‘अ’ दर्जाच्या २०४ शाळांचे आता राज्यस्तरीय पथकाकडून बाह्य मूल्यमापन होणार असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले़