शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

शिष्यवृत्ती अर्ज सादर करण्यासाठी १५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:05 IST

औरंगाबाद : आर्थिक वर्ष मावळले, तरीही मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेचे १५ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज अजूनही महाविद्यालयातच पडून आहेत. परिणामी, मागासवर्गीय ...

औरंगाबाद : आर्थिक वर्ष मावळले, तरीही मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेचे १५ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज अजूनही महाविद्यालयातच पडून आहेत. परिणामी, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेतच संपूर्ण वर्ष घालवावे लागले. दरम्यान, समाजकल्याण विभागाने २५ मार्चपर्यंत अर्ज सादर करण्याची महाविद्यालयांंना दिलेली मुदत आता १५ एप्रिलपर्यंत वाढवून दिली आहे.

यासंदर्भात शिष्यवृत्ती विभागाचे समाजकल्याण अधिकारी जावेद खान यांनी सांगितले की, मावळत्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये ऑनलाइन शिष्यवृत्ती अर्ज भरावे लागतात, विद्यार्थ्यांनी तसे अर्जही भरले; परंतु अर्जातील काही त्रुटी तसेच ऑनलाइन अर्ज व सोबत जोडलेल्या कागदपत्रांच्या हार्ड कॉपी अभावी अजूनही महाविद्यालयांकडे अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासप्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील १५ हजार ६६२ विद्यार्थ्यांचे अर्ज पडून आहेत. या मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे उच्चशिक्षणातील प्रमाण वाढावे. केवळ आर्थिक अडचणीमुळे त्यांच्या शैक्षणिक कार्याला बाधा येऊ नये म्हणून त्यांना शासनाच्या वतीने मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व फ्रीशिपचा लाभ दिला जातो.

सन २०२०-२१ या वर्षात अनुसूचित जाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांचे समाजकल्याण विभागाकडे ३४ हजार ४०१ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी १८ हजार ५८ विद्यार्थ्यांचे अर्ज परिपूर्ण असून, ते विभागाने मंजूर केले. या प्रवर्गाचे महाविद्यालयांकडे अजूनही सहा हजार ३४० विद्यार्थ्यांचे अर्ज विविध कारणांमुळे अडकलेले आहेत. याशिवाय, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासप्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे विभागाला प्राप्त ३८ हजार १४ अर्जांपैकी १८ हजार ३५८ अर्ज मान्य केले असून, ९ हजार ३२२ विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयाकडे प्रलंबित आहेत.

चौकट...

रिपब्लिकन विद्यार्थी सेनेची मागणी

रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे सचिन निकम व पदाधिकाऱ्यांनी ३० मार्च रोजी शिष्यवृत्तीचे आवेदनपत्र सादर करण्यास मुदतवाढ द्यावी, अशी मागणी करणारे निवेदन सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त, प्रादेशिक उपायुक्तांना मेलद्वारे केली होती. कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे अनेक भागांत स्थानिक प्रशासनाने लॉकडाऊनची घोषणा केली असल्याने काही विद्यार्थ्यांना कागदपत्रांअभावी आवेदनपत्र भरता आले नाही, तर काहीजणांना हार्ड कॉपी सादर करता आली नाही. मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नयेत, यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, असे निवेदनात म्हटले होते.