शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांना मदत केलेला आरोपी सुरक्षा दलाच्या जाळ्यात; ऑपरेशन महादेवला मोठं यश
2
काश्मीर मुद्द्यावरून अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का! पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीबद्दलही केले मोठे विधान
3
'अशा' कमाईवर विशेष टॅक्स सूट नाही; कर सवलत मिळालेल्यांना थकबाकी भरावी लागणार, पण एक दिलासा...
4
एअरस्पेसमध्ये रशियाचा 'डिजिटल हल्ला'; स्पेनच्या संरक्षण मंत्र्यांच्या विमानाच्या जीपीएसमध्ये बिघाड, युरोपमध्ये खळबळ
5
इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर...
6
महाराष्ट्रातील बेस्ट पर्यटन स्थळे क्लिक करा, ५ लाख जिंका; शासनाची अनोखी स्पर्धा, काय आहेत अटी?
7
नवरात्री २०२५: शुक्रवारी ललिता पंचमी, ३ शुभ योगासह, भद्रा राजयोगात ७ राशींचा भाग्योदय
8
लडाखमधील भडकलेल्या आंदोलनाचं पाकिस्तान कनेक्शन? सोनम वांगचूक यांच्या दौऱ्याबद्दल उपस्थित होताहेत शंका
9
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब आणि मुलावर गुन्हा दाखल; १५० हून अधिक लोकांना लाखोंचा फटका
10
Stock Market Today: सलग पाचव्या दिवशी शेअर बाजारात घसरण, निफ्टी ४० अंकांनी घसरला; Glenmark Pharma, Dixon Tech मध्ये तेजी
11
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
12
कुलदीप यादव सुसाट! जडेजा आणि मुरलीधरनचा रेकॉर्ड ब्रेक, मलिंगाचाही 'हा' विक्रम धोक्यात
13
पाकिस्तानची स्थिती बिकट होणार! भारतीय हवाई दलाला मिळणार ९७ तेजस विमाने
14
१ ऑक्टोबरपासून बदलणार ७ नियम, सामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम; ऑनलाइन गेमिंगपासून तिकिटापर्यंत आहे यादीत
15
Asia Cup 2025: हारिस रौफ आणि साहिबजादा फरहानवर बंदीची टांगती तलवार, मैदानातील गैरवर्तन महागात पडणार?
16
Post Office च्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹४ लाख, मिळेल ₹१,७९,६३१ चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
17
या संकटात बळीराजा तू एकटा नाहीस, अख्खा महाराष्ट्र सोबत आहे; हताश शेतकरी घेतायेत मृत्यूशी गळाभेट
18
'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
19
बहिणीसाठी रक्षक नाही, भक्षक ठरले भाऊ; आई-वडिलांनीही पाठ फिरवली, पण होणाऱ्या नवऱ्याने साथ दिली अन्..
20
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?

अजब नियमांमुळे मुकुंदवाडीवर एक्स्प्रेसला ‘रेड सिग्नल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:02 IST

औरंगाबाद : शहराच्या रेल्वेस्टेशनवरून रेल्वेने मुकुंदवाडी स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी १० मिनिटे लागतात. त्यामुळे १० मिनिटांच्या अंतरावर असलेल्या स्टेशनवर एक्सप्रेस रोखता ...

औरंगाबाद : शहराच्या रेल्वेस्टेशनवरून रेल्वेने मुकुंदवाडी स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी १० मिनिटे लागतात. त्यामुळे १० मिनिटांच्या अंतरावर असलेल्या स्टेशनवर एक्सप्रेस रोखता येत नसल्याचा दावा केला जात आहे. परंतु अनेक ठिकाणी यापेक्षा कमी अंतर असलेल्या स्टेशनवर एक्सप्रेस थांबविण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.

मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनवरून नियमित प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन हे रेल्वेच्या एनएसजी- ५ या गटात आहे. औरंगाबाद रेल्वे मार्गावर एनएसजी - ५ गटांत मोडणारे सेलू, मानवत रोड, परतूर आणि रांजणी हे रेल्वेस्टेशनही आहेत. यातील काही रेल्वेस्टेशनवर दोन्ही बाजूने प्लॅटफॉर्म तयार करण्यात आलेला आहे. परंतु मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन येथे अद्यापही एकाच बाजूने प्लॅटफॉर्म आहे. सेलू, मानवत रोड, परतूर आणि रांजणी या ठिकाणी काही एक्सप्रेस रेल्वे थांबतात; मात्र मुकुंदवाडी या रेल्वे स्टेशनवर फक्त एकच एक्सप्रेस आणि काही पॅसेंजर रेल्वे थांबतात.

मुकुंदवाडी स्टेशनवर एक्सप्रेस थांबविण्याची मागणी केल्यानंतर मुख्य रेल्वे स्टेशनपासून मुकुंदवाडीचे अंतर कमी असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु अनेक मुख्य रेल्वेस्टेशन आणि दुसरे स्टेशन कमी अंतर असताना, या ठिकाणी एक्सप्रेस रेल्वे थांबविण्यात येतात. औरंगाबादला वेगळा न्याय आणि अन्य भागांसाठी वेगळा न्याय रेल्वे विभागाकडून देण्यात येत असल्याची ओरड होत आहे.

अशी आहेत रेल्वेस्टेशन व अंतर

मुख्य रेल्वेस्टेशन ते जवळचे रेल्वेस्टेशन - अंतर (मिनिटांत)

सिकंदराबाद ते मलकाजगिरी - ८ मिनिटे

नागपूर ते अंजणी - ८ मिनिटे

औरंगाबाद ते मुकुंदवाडी - १० मिनिटे

--

मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन

प्रवासी संख्या-४५७८२

उत्पन्न-२७,७३,७७३ रुपये (जानेवारी २०१९)

रेल्वेची दुटप्पी भूमिका

मराठवाड्यातील अन्य रेल्वेस्टेशनच्या तुलनेत मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनहून येणारे उत्पन्न अधिक आहे. इतर शहरांत ८ मिनिटे अंतरावर असलेल्या रेल्वेस्टेशनवर एक्सप्रेस रेल्वे थांबविता येतात. मग १० मिनिटांच्या अंतरावरील मुकुंदवाडीला का थांबविता येत नाही. रेल्वे विभागाचा औरंगाबादबाबतीत अद्यापही दुटप्पी भूमिका सुरू आहे.

- ओमप्रकाश वर्मा , अध्यक्ष,मराठवाडा रेल्वे विकास समिती