शहरं
Join us  
Trending Stories
1
खेडमध्ये वैभव खेडेकरांच्या पदरी निराशा; पत्नीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आली वेळ, काय घडलं?
2
वाद चिघळणार! ठाण्यात शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण; भाजपाच्या माजी नगरसेवकावर आरोप
3
जपानवर मोठे आर्थिक संकट? ३० वर्षांचा 'येन कॅरी ट्रेड' मोडीत; जागतिक बाजारात मोठा उलटाफेर होण्याची भीती!
4
मतविभाजनाची भीती! ठाकरे गटाकडून काँग्रेसची मनधरणी, बड्या नेत्याची वर्षा गायकवाडांशी चर्चा 
5
पाकिस्तानमध्ये मध्यरात्री भूकंपाचे हादरे; ५.२ तीव्रतेचा धक्का, डोंगराळ भागात केंद्रबिंदू
6
गौतम गंभीरचे प्रयोग टीम इंडियाला झेपेना; दीड वर्षात नंबर ३ वर खेळवले तब्बल सात फलंदाज
7
TATA ची 'ही' कंपनी ५० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार, यापूर्वी TCS मधून १२ हजार कर्मचाऱ्यांना दिलेला नारळ
8
आई आमदार बनली, पण मंत्रिपद मुलाला मिळालं; नितीश कुमारांच्या नव्या सरकारमध्ये संधी, सगळेच हैराण
9
"अरे ऐक ना जरा हसतोस का...", मराठी गाण्यावर विद्या बालनने बनवला रील, मिथिला पालकरला टॅग करत म्हणाली...
10
Mumbai: वसईनंतर आता सांताक्रूझच्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये तोच प्रकार, विद्यार्थ्यावर रुग्णालयात उपचार सुरू
11
2026 Prediction: ज्योतिषांचे भाकीत, आर्थिक धक्के पचवून, २०२६ मध्ये भारत होणार 'विश्वगुरू'!
12
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात, निफ्टी १०० अंकांनी घसरला; India VIX १३% नं उसळला
13
Cyber Crime: दिवसा भारतीय, रात्री अमेरिकन नागरिकांवर सायबर हल्ला; नवी मुंबईतून २० जणांना अटक!
14
दरवर्षी जमा करा १.५ लाख, मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; मुलीच्या भविष्यासाठी सुरक्षित आहे सरकारी स्कीम
15
Uddhav Thackeray: "बाबा, मला मारले म्हणत दिल्लीला गेले" अमित शाह- एकनाथ शिंदे यांच्या भेटीवरून ठाकरेंचा टोला
16
Mumbai: मुंबईकरांसाठी खुशखबर...! नव्या इमारतीतील घरांसाठी नोंदणी शुल्क माफ
17
BJP vs Shinde Sena: मुद्रांक शुल्क सवलतीच्या निर्णयावरून शिंदेसेना-भाजपमध्ये क्रेडिट वॉर सुरू!, कोण काय बोलतंय? वाचा
18
आजचे राशीभविष्य - २१ नोव्हेंबर २०२५, कार्यपूर्ती, यश आणि कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस
19
Elections: मुंबईत ११.८० लाख तर, ठाण्यात ४.२१ लाख मतदार वाढले; महिला मतदारांची संख्या अधिक!
20
SC: राज्यपाल, राष्ट्रपतींना विधेयकांच्या मंजुरीसाठी डेडलाइन देता येणार नाही, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अजब नियमांमुळे मुकुंदवाडीवर एक्स्प्रेसला ‘रेड सिग्नल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:02 IST

औरंगाबाद : शहराच्या रेल्वेस्टेशनवरून रेल्वेने मुकुंदवाडी स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी १० मिनिटे लागतात. त्यामुळे १० मिनिटांच्या अंतरावर असलेल्या स्टेशनवर एक्सप्रेस रोखता ...

औरंगाबाद : शहराच्या रेल्वेस्टेशनवरून रेल्वेने मुकुंदवाडी स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी १० मिनिटे लागतात. त्यामुळे १० मिनिटांच्या अंतरावर असलेल्या स्टेशनवर एक्सप्रेस रोखता येत नसल्याचा दावा केला जात आहे. परंतु अनेक ठिकाणी यापेक्षा कमी अंतर असलेल्या स्टेशनवर एक्सप्रेस थांबविण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.

मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनवरून नियमित प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन हे रेल्वेच्या एनएसजी- ५ या गटात आहे. औरंगाबाद रेल्वे मार्गावर एनएसजी - ५ गटांत मोडणारे सेलू, मानवत रोड, परतूर आणि रांजणी हे रेल्वेस्टेशनही आहेत. यातील काही रेल्वेस्टेशनवर दोन्ही बाजूने प्लॅटफॉर्म तयार करण्यात आलेला आहे. परंतु मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन येथे अद्यापही एकाच बाजूने प्लॅटफॉर्म आहे. सेलू, मानवत रोड, परतूर आणि रांजणी या ठिकाणी काही एक्सप्रेस रेल्वे थांबतात; मात्र मुकुंदवाडी या रेल्वे स्टेशनवर फक्त एकच एक्सप्रेस आणि काही पॅसेंजर रेल्वे थांबतात.

मुकुंदवाडी स्टेशनवर एक्सप्रेस थांबविण्याची मागणी केल्यानंतर मुख्य रेल्वे स्टेशनपासून मुकुंदवाडीचे अंतर कमी असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु अनेक मुख्य रेल्वेस्टेशन आणि दुसरे स्टेशन कमी अंतर असताना, या ठिकाणी एक्सप्रेस रेल्वे थांबविण्यात येतात. औरंगाबादला वेगळा न्याय आणि अन्य भागांसाठी वेगळा न्याय रेल्वे विभागाकडून देण्यात येत असल्याची ओरड होत आहे.

अशी आहेत रेल्वेस्टेशन व अंतर

मुख्य रेल्वेस्टेशन ते जवळचे रेल्वेस्टेशन - अंतर (मिनिटांत)

सिकंदराबाद ते मलकाजगिरी - ८ मिनिटे

नागपूर ते अंजणी - ८ मिनिटे

औरंगाबाद ते मुकुंदवाडी - १० मिनिटे

--

मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन

प्रवासी संख्या-४५७८२

उत्पन्न-२७,७३,७७३ रुपये (जानेवारी २०१९)

रेल्वेची दुटप्पी भूमिका

मराठवाड्यातील अन्य रेल्वेस्टेशनच्या तुलनेत मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनहून येणारे उत्पन्न अधिक आहे. इतर शहरांत ८ मिनिटे अंतरावर असलेल्या रेल्वेस्टेशनवर एक्सप्रेस रेल्वे थांबविता येतात. मग १० मिनिटांच्या अंतरावरील मुकुंदवाडीला का थांबविता येत नाही. रेल्वे विभागाचा औरंगाबादबाबतीत अद्यापही दुटप्पी भूमिका सुरू आहे.

- ओमप्रकाश वर्मा , अध्यक्ष,मराठवाडा रेल्वे विकास समिती