शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

जलजागृतीच्या बैठकीला तज्ज्ञांचा दुष्काळ

By admin | Updated: March 15, 2016 00:40 IST

औरंगाबाद : मराठवाड्यात आणि जिल्ह्यात चार वर्षांपासून सततचा दुष्काळ पडत असल्यामुळे पाणी वापरावर अनेक निर्बंध आले आहेत.

औरंगाबाद : मराठवाड्यात आणि जिल्ह्यात चार वर्षांपासून सततचा दुष्काळ पडत असल्यामुळे पाणी वापरावर अनेक निर्बंध आले आहेत. जलजागृती करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेण्याचे शासनाचे आदेश असताना जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी ३१ जलतज्ज्ञांच्या बैठकीसाठी बोटावर मोजण्याइतकेच सदस्य हजर राहिले. दुष्काळात तरी पाण्याबाबत सतर्कता आणावी, अशी अपेक्षा असताना महसूल प्रशासनासह सिंचन, पाटबंधारे विभागाला दुष्काळाचे काहीही देणे घेणे नसल्याचा प्रत्यय आला. शासनाच्या ११ फेबु्रवारीच्या आदेशामुळे फक्त कागदी घोडे नाचविण्यापुरताच बैठकीचा फार्स केला गेला. बैठकीच्या अध्यक्षा जिल्हाधिकारी डॉ.निधी पांडे या कामात व्यस्त असल्यामुळे निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांच्या दालनात दुपारी १२.३० वा. बैठक झाली. ती बैठक २० मिनिटांत गुंडाळण्यात आली. सिंचन, पाटबंधारे आणि जीवन प्राधिकरणासह जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे प्रतिनिधी आणि काही माध्यम प्रतिनिधींची त्या छोटेखानी बैठकीला हजेरी होती. मनपा, प्रगतिशील शेतकरी, जलतज्ज्ञ, जायकवाडी प्रकल्पाचे प्रतिनिधी त्या बैठकीकडे फिरकलेदेखील नाहीत. कुणालाही पाण्याच्या दुष्काळाबाबत काहीही आस्था राहिली नसल्याचे स्पष्ट झाले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृह तब्बल दोन तास बैठकीची वाट पाहत होते. या काळात सभागृहातील सर्व ए.सी, बल्ब, फॅन सुरू होते. बैठक होणारच नव्हती, तर विजेचा अपव्यय थांबविण्याची तसदीदेखील कुणीही घेतली नाही. जिल्हा प्रशासनात कुणाचाही कुणावर धाक नसल्याचे हे उदाहरण आहे. उपजिल्हाधिकारी गावंडे म्हणाले, पैठणला जलजागृती सप्ताहाचा समारोप २२ मार्च रोजी होईल. कलशपूजन व इतर कार्यक्रम तेथे होतील. त्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. अधीक्षक अभियंता एस.व्ही.खरात म्हणाले, अधिवेशनासाठी अधिकारी गेल्यामुळे बैठकीला कमी सदस्य हजर राहिले.