शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

‘नवीन संहितांवर प्रयोग करावेत’

By admin | Updated: November 16, 2014 00:01 IST

औरंगाबाद : कलाकारांच्या सादरीकरणात तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आमूलाग्र असे बदल होत चालले आहेत. यामुळे नवीन कलाकारांच्या कलागुणांसोबतच नवीन लेखकांच्या लेखनालाही वाव मिळतो

औरंगाबाद : कलाकारांच्या सादरीकरणात तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आमूलाग्र असे बदल होत चालले आहेत. यामुळे नवीन कलाकारांच्या कलागुणांसोबतच नवीन लेखकांच्या लेखनालाही वाव मिळतो. या नवोदित कलाकारांच्या मेहनतीला राज्य नाट्यस्पर्धेसारख्या व्यासपीठावर नवीन संहितांचा प्रयोग करावा, असे प्रतिपादन प्रा. डॉ. दिलीप घारे यांनी राज्य नाट्यस्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात केले.तापडिया नाट्यमंदिरात आयोजित हौशी मराठी राज्य नाट्यस्पर्धेच्या प्रथम फेरीचा शुभारंभ सोहळा पार पडला. या नाट्यस्पर्धेची सुरुवात किरण लद्देलिखित ‘अघटित’ या दोन अंकी नाटकाने झाली. यावेळी उद्घाटक म्हणून प्रा. डॉ. दिलीप घारे यांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे यांच्यासह स्पर्धेचे परीक्षक श्रीकांत पाठक, भारत जगताप, गजानन कराड आदींची उपस्थिती होती.नवोदित लेखकांनी आपल्या समस्या, आपले प्रश्न लिखाणात आणावेत, त्याचे नाटकात रूपांतर करावे, असे केल्यास रसिकांचा प्रतिसाद वाढणार हे नक्की. या पद्धतीने नाटके सादर करीत गेल्यास या स्पर्धेची भूमी हीच खरी रंगभूमी आहे, असे मानले जाईल, असा विश्वासही डॉ. घारे यांनी यावेळी व्यक्त केला.महत्त्वाकांक्षी कलाकारांनी या स्पर्धेत उतरल्यास तसेच मार्गदर्शनयुक्त नाटकाचे प्रयोग सादर केल्यास हौशी मराठी राज्य नाट्यस्पर्धा ही कलाकारांसाठी मोलाची व मानबिंदू ठरेल. तसेच नवोदित नाट्यलेखकांनी आपल्या लिखाणात सामाजिक पर्यावरण, सामाजिक परिस्थिती, मानसिकता यासारख्या विषयांचा समावेश केल्यास सादरीकरणात निश्चितच बदल घडून येईल व रसिकांचा नाटकाकडे असलेला ओढा वाढेल, असे मत अध्यक्षीय समारोपात बोलताना प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी व्यक्त केले.