शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

नाटकातून अनुभवा अजिंठ्याची अक्षरलेणी!

By admin | Updated: November 5, 2014 00:59 IST

औरंगाबाद : उत्कट आविष्काराचा शाश्वत सौंदर्यानुभव देणाऱ्या अजिंठ्याच्या लेण्यांना प्रख्यात नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी नाट्यबद्ध केले आहे.

औरंगाबाद : उत्कट आविष्काराचा शाश्वत सौंदर्यानुभव देणाऱ्या अजिंठ्याच्या लेण्यांना प्रख्यात नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी नाट्यबद्ध केले आहे. गज्वी व त्यांच्या चार मित्रांनी अनुभवलेला अजिंठा पाच नाट्यसंहितांच्या माध्यमातून उलगडला आहे.इसवी सन पूर्व कालखंडात अनाम शिल्पकारांनी खोदून ठेवलेल्या या जिवंत कलाकृतींची भुरळ आजवर सामान्यांसह अनेक चित्रकार, कवी अन् नाटककारांना पडली आहे. तीन वर्षांपूर्वी अजिंठ्याला भेट दिल्यानंतर या भव्य कलाकृतींमध्ये काही एक नाट्य दडल्याचा साक्षात्कार झाल्याचे गज्वी म्हणाले. ते सांगतात की, ‘मी माझे मित्र अरुण मिरजकर, भगवान हिरे, स्वप्नील गांगुर्डे व चांदे यांच्यासह अजिंठा लेणी पाहावयास गेलो. तो खरेतर दोनदिवसीय अभ्यासदौराच होता. या लेण्यांची स्थापत्य कला, शिल्पांच्या मुद्रेवरील बोलके भाव आणि चित्रांचे ताजे रंग पाहून आम्ही भारावून गेलो. त्यानंतर झालेल्या चर्चेतून या सगळ्यातील सौंदर्य आम्हाला जवळच्या असलेल्या नाट्यमाध्यमातून उभे करण्याचे आम्ही ठरवले. या लिखाणासाठी वर्षभराचा कालखंड निश्चित केला. दरम्यान, माझे नाटककार मित्र अशोक हंडोरे यांनीही या प्रयोगात सहभाग घेण्याची इच्छा दाखविली. त्यांनी काही वर्षांपूर्वी ही लेणी पाहिली होती. त्यांनीही एक नाट्यसंहिता यात लिहिली.भगवान हिरे यांना नाटक लिहिणे शक्य झाले नाही. मात्र, ते वगळता सगळ्यांच्या मिळून पाच संहिता सध्या हाती आल्या आहेत. मी लिहिलेल्या ‘द बुद्धा’ या नाटकात भगवान गौतम बुद्ध यांचा जन्मापासून महानिर्वाणापर्यंतचा पट उलगडला आहे. बुद्धांच्या जीवनासह त्यांचे तत्त्वज्ञान, त्यांचे पत्नी यशोधरेशी असलेले नाते यावरही प्रकाश टाकला आहे. बुद्धांना काहीशा अपारंपरिक, नव्या रूपात समोर आणण्याचा हा प्रयत्न आहे.’ ही पाचही नाटके ‘अजिंठा’ या एकाच कल्पनेवर आधारित असली तरी प्रत्येक नाटककाराची स्वतंत्र दृष्टी, कलाविषयक धारणा व सौंदर्यानुभव यातून केलेली अभिव्यक्ती नवी असेल, असेही गज्वी म्हणाले.मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागात या नाटकांचे वाचन झाले आहे. त्यात या नाटकांवर सांगोपांग चर्चा झाली असून, काही योग्य बदल करीत नवी भरही घातली गेली. येत्या काळात या नाटकांचा विशेष महोत्सवही आयोजित करण्याचा मानस असल्याचे गज्वी म्हणाले. सध्या पाचही नाटकांसाठी योग्य दिग्दर्शक-कलावंत शोधण्यासह आर्थिक बळ उभे करण्याचे काम सुरू आहे.‘कलेसाठी कला की जीवनासाठी कला’ या सनातन वादाकडे लक्ष वेधताना गज्वी म्हणाले की, या वादापेक्षाही ‘ज्ञानासाठी कला’ असा एक तिसरा अर्थवाही पर्याय डोळ्यांसमोर ठेवत आम्ही बोधी नाट्यचळवळ चालवतो. माणसाच्या उन्नयनासह जगणे सुंदर करण्यासाठी आम्ही कला सादर करतो. ‘अजिंठा’ नाट्यमहोत्सव हा यासाठीच केलेला अट्टहास असेल.