शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

सत्ता परिवर्तनातही वाटा अपेक्षित

By admin | Updated: October 21, 2014 00:56 IST

जालना: केंद्रापाठोपाठ राज्यात सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेवर आरुढ होणार असून, या सत्तेतही जिल्ह्यास वाट मिळेल अशी चिन्हे आहेत.

जालना: केंद्रापाठोपाठ राज्यात सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेवर आरुढ होणार असून, या सत्तेतही जिल्ह्यास वाट मिळेल अशी चिन्हे आहेत. लोकसभा निवडणुकीत या जिल्ह्याने भाजपास मोठी साथ दिली. रावसाहेब दानवे हे तब्बल २ लाख मतांनी विजयी झाले. तेव्हा केंद्रिय मंत्रिमंडळात दानवे यांना स्थान मिळेल असे स्पष्ट संकेत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळात दानवे यांची राज्यमंत्री म्हणून वर्णी लागली. पर्यायाने या जिल्ह्यास केंद्रिय मंत्रिमंडळात पहिल्यांदाच प्रतिनिधित्व मिळाल्यामुळे राजकीय क्षेत्रासह जिल्ह्यात मोठा आनंद व्यक्त झाला. या पार्श्वभूमीवरच विधानसभा निवडणुका आल्या. त्यातही भाजपाने पाचपैकी तीन जागा पटकावून मोठी मुसंडी मारली आहे. त्यामुळेच राज्यातील सत्ता परिवर्तनात या जिल्ह्यास निश्चितपणे वाटा मिळणार अशी चिन्हे आहेत. भाजपाचे जिल्हाध्यक्ष बबनराव लोणीकर हे परतूरमधून निवडून आले आहेत. ते तिसऱ्यांदा विधानसभेचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. १९९९ व २००४ च्या निवडणुकीत ते सलग दोन वेळा विजयी झाले होते. २००९ च्या निवडणुकीत ते पराभूत झाले. परंतु गेल्या निवडणुकीत पराभावाचा लोणीकर यांनी या निवडणुकीत वचपा काढला.त्यामुळेच भाजपातील त्यांची ज्येष्ठता ओळखूनच राज्यमंत्री मंडळात वर्णी लागू शकेल अशी शक्यता वर्तविली जात आहे.जिल्ह्यात भाजपाचे भोकरदन व बदनापुरात दोन ठिकाणी उमेदवार विजयी झाले आहेत. ते दोघेही पहिल्यांदाच विधाभसभेचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. विशेषत: संतोष दानवे यांचे वडील हे केंद्रिय मंत्रिमंडळात प्रतिनिधीत्व करीत आहेत. एका कुटुंबात सत्तेत दोनदा प्रतिनिधीत्व वरकरणी शक्य वाटत नाही. राहिला प्रश्न नवनिर्वाचित आ. नारायण कुचे यांचा. तेही जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात नवखे आहेत. त्यामुळे त्यांचीही वर्णी लागेल असे चित्र नाही. या पार्श्वभूमीवर लोणीकर यांचा दावा प्रबळ ठरतो आहे. (जिल्हा प्रतिनिधी)