शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

सत्ता परिवर्तनातही वाटा अपेक्षित

By admin | Updated: October 21, 2014 00:56 IST

जालना: केंद्रापाठोपाठ राज्यात सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेवर आरुढ होणार असून, या सत्तेतही जिल्ह्यास वाट मिळेल अशी चिन्हे आहेत.

जालना: केंद्रापाठोपाठ राज्यात सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेवर आरुढ होणार असून, या सत्तेतही जिल्ह्यास वाट मिळेल अशी चिन्हे आहेत. लोकसभा निवडणुकीत या जिल्ह्याने भाजपास मोठी साथ दिली. रावसाहेब दानवे हे तब्बल २ लाख मतांनी विजयी झाले. तेव्हा केंद्रिय मंत्रिमंडळात दानवे यांना स्थान मिळेल असे स्पष्ट संकेत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळात दानवे यांची राज्यमंत्री म्हणून वर्णी लागली. पर्यायाने या जिल्ह्यास केंद्रिय मंत्रिमंडळात पहिल्यांदाच प्रतिनिधित्व मिळाल्यामुळे राजकीय क्षेत्रासह जिल्ह्यात मोठा आनंद व्यक्त झाला. या पार्श्वभूमीवरच विधानसभा निवडणुका आल्या. त्यातही भाजपाने पाचपैकी तीन जागा पटकावून मोठी मुसंडी मारली आहे. त्यामुळेच राज्यातील सत्ता परिवर्तनात या जिल्ह्यास निश्चितपणे वाटा मिळणार अशी चिन्हे आहेत. भाजपाचे जिल्हाध्यक्ष बबनराव लोणीकर हे परतूरमधून निवडून आले आहेत. ते तिसऱ्यांदा विधानसभेचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. १९९९ व २००४ च्या निवडणुकीत ते सलग दोन वेळा विजयी झाले होते. २००९ च्या निवडणुकीत ते पराभूत झाले. परंतु गेल्या निवडणुकीत पराभावाचा लोणीकर यांनी या निवडणुकीत वचपा काढला.त्यामुळेच भाजपातील त्यांची ज्येष्ठता ओळखूनच राज्यमंत्री मंडळात वर्णी लागू शकेल अशी शक्यता वर्तविली जात आहे.जिल्ह्यात भाजपाचे भोकरदन व बदनापुरात दोन ठिकाणी उमेदवार विजयी झाले आहेत. ते दोघेही पहिल्यांदाच विधाभसभेचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. विशेषत: संतोष दानवे यांचे वडील हे केंद्रिय मंत्रिमंडळात प्रतिनिधीत्व करीत आहेत. एका कुटुंबात सत्तेत दोनदा प्रतिनिधीत्व वरकरणी शक्य वाटत नाही. राहिला प्रश्न नवनिर्वाचित आ. नारायण कुचे यांचा. तेही जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात नवखे आहेत. त्यामुळे त्यांचीही वर्णी लागेल असे चित्र नाही. या पार्श्वभूमीवर लोणीकर यांचा दावा प्रबळ ठरतो आहे. (जिल्हा प्रतिनिधी)