शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

पुढील अर्थसंकल्पात औरंगाबाद-नगर रेल्वे मार्गाला ‘ग्रीन सिग्नल’ अपेक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:05 IST

सध्या राज्यात ४८ रेल्वे मार्ग सर्वेक्षणात असून, यातील केवळ ३ मार्गांच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. औरंगाबाद-अहमदनगर रेल्वे मार्गाचे ...

सध्या राज्यात ४८ रेल्वे मार्ग सर्वेक्षणात असून, यातील केवळ ३ मार्गांच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. औरंगाबाद-अहमदनगर रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण सध्या सुरू आहे. येत्या अर्थसंकल्पात या रेल्वे मार्गाला मान्यता मिळविण्यासाठी सखोल माहिती व आकडेवारीनुसार हा अहवाल रेल्वे मंत्रालयाकडे मान्यतेसाठी सुपूर्द करण्यात येणार आहे.

औरंगाबाद व नगरच्या चार तालुक्यांतून हा मार्ग जाणार असल्याने त्या अनुषंगाने उद्योजक, शेतकरी व व्यापाऱ्यांचे मत जाणून घेण्यात आले. सध्या वाळूज औद्योगिक वसाहतीतून दिवसाला ३०० कंटेनर माल वाहतूक होते, तर औरंगाबाद-पुणे महामार्गावर अंदाजे रोज आठशे महामंडळाच्या, तर दोनशेच्या आसपास खाजगी प्रवासी गाड्या धावतात, अशी माहिती उपस्थित अधिकारी व नागरिकांनी या सर्व्हे समितीला दिली आहे. याव्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात शेती मालाची वाहतूकदेखील परिसरातून केली जाते, या मार्गावर कायगाव, देवगड व शनिशिंगणापूर देवस्थान असल्याने याचा फायदादेखील रेल्वेला होणार असल्याचे नागरिकांनी सांगितले.

मध्य रेल्वेचे डेप्युटी चीफ ऑपरेटिंग मॅनेजर (सर्व्हे) सुरेशचंद्र जैन यांच्या नेतृत्वाखाली रवी गुजराल, मुकेश लाल हे या सर्व्हेचे काम पाहत आहेत. याप्रसंगी खा. डॉ. भागवत कराड, किशोर धनायत, नगरसेवक प्रदीप पाटील, तहसीलदार अविनाश शिंगोटे, व्यापारी महासंघाचे शरद गांधी, विष्णुपंत पोळ, प्रवीण पारख, दीपक साळवे, सतीश बारे, राजेंद्र राठोड, भारत पाटील, वाजीद कुरेशी, तसेच गंगापूर व लासूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी, आगार प्रमुख, शहरातील व्यापारी, शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येने हजर होते.