शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

शहराच्या विकासात क्रेडाईकडून अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:04 IST

औरंगाबाद : कोरोनाने उद्‌भवलेल्या परिस्थितीवर आपण लवकरच मात करू. त्यानंतर शहर व आर्थिक पातळीवर विकासाचे इंजिन म्हणून बांधकाम व्यावसायिकांची ...

औरंगाबाद : कोरोनाने उद्‌भवलेल्या परिस्थितीवर आपण लवकरच मात करू. त्यानंतर शहर व आर्थिक पातळीवर विकासाचे इंजिन म्हणून बांधकाम व्यावसायिकांची संघटना ‘क्रेडाई’ महत्त्वाची भूमिका निभावेल, असे प्रतिपादन मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी येथे व्यक्त केले.

कॉन्फडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया (क्रेडाई) या संघटनेच्या औरंगाबाद शाखेच्या वर्ष २०२१ ते २०२३ या कालावधीसाठी निवडलेल्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा रविवारी ऑनलाइन पद्धतीने उत्साहात पार पडला.

या सोहळ्यात आस्तिककुमार पाण्डेय यांच्यासह एसबीआयचे उपमहाव्यवस्थापक रवीकुमार वर्मा, क्रेडाईचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मगर, राष्ट्रीय उपाध्यक्ष शांतीलाल कटारिया, अनंत राजेगावकर, क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष सुनील फुरदे, क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष (इलेक्ट) प्रमोद खैरनार, क्रेडाई महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष राजेंद्रसिंग जाबिंदा, देवानंद कोटगिरे आदींची ऑनलाइन उपस्थिती होती.

यावेळी राज्य, तसेच राष्ट्रीय पातळीवर विविध पदांवर निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी माजी अध्यक्ष नरेंद्रसिंग जाबिंदा, सचिव सुनील बेदमुथा, तसेच उपाध्यक्ष विकास चौधरी यांनी मागील दोन वर्षांचा अहवाल सादर केला. मावळत्या कार्यकारिणीने नूतन कार्यकारिणीकडे पदाची सूत्रे मानदंडाच्या स्वरूपात सोपविली.

पदभार स्वीकारल्यानंतर अध्यक्ष नितीन बगडिया यांनी सांगितले की, शहरात आता ७० मीटर उंचीच्या इमारती बांधण्यास परवानगी मिळाली आहे. त्यामुळे शहरात गगनचुंबी इमारती उभ्या राहतील व सर्वसामान्यांना परवडतील अशी घरे उपलब्ध होतील. घरांच्या मागणीला आता मोठा वेग येत असून, सर्वसामान्यांना घर खरेदी सुलभ व्हावी याकरिता शासनाने सुरू केलेल्या प्रोत्साहनपर योजना पुढेही सुरू ठेवाव्यात, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

याप्रसंगी रवीकुमार वर्मा यांच्यासह महाराष्ट्र क्रेडाईच्या सर्व मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या.

नीता पानसरे यांनी सूत्रसंचालन केले. क्रेडाईचे सचिव अखिल खन्ना यांनी आभार मानले.

चौकट

क्रेडाईतर्फे घोषणा

* बांधकाम कामगारांचे लवकरच क्रेडाईतर्फे मोफत लसीकरण करणार.

* येत्या दोन वर्षांत शहरातील सर्व प्रवेश मार्गांवर स्वागत कमानी उभारणार.

* शहरातील विविध ठिकाणी दिशादर्शक फलक लावणार.

* मनपाच्या सहकार्याने विविध चौकांचे सुशोभीकरण करणार.