शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

अपेक्षा उंचावल्या...

By admin | Updated: May 27, 2014 01:01 IST

जालना : खा. रावसाहेब दानवे यांच्या रुपाने केंद्रीय मंत्रिमंडळात जालना जिल्ह्याला प्रथमच स्थान मिळाले आहे.

जालना : खा. रावसाहेब दानवे यांच्या रुपाने केंद्रीय मंत्रिमंडळात जालना जिल्ह्याला प्रथमच स्थान मिळाले आहे. जिल्हा निर्मितीच्या ३३ वर्षानंतर जिल्ह्याला हे स्थान मिळाल्याने जिल्हावासियांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. दानवे यांच्या मंत्रिमंडळातील समावेशामुळे त्यांच्या कुटुंबियांसह समर्थकांना मोठा आनंद झाला आहे. चार दशकांच्या राजकीय वाटचालीतील २४ पैकी २३ निवडणुका जिंकत आपले वर्चस्व कायम राखणार्‍या खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून सलग चौथ्या वेळी २ लाखांवर मताधिक्याने विजयश्री पटकावली. मूळ भोकरदन तालुक्यातील पळसखेडा खुर्द येथील रहिवासी असलेले खा. दानवे यांनी १९७६ साली आपल्याच गावच्या सरपंचपदी विराजमान होत राजकीय क्षेत्रात पदार्पण केले. जवखेडा गण पं.स. सदस्य, १९८१ साली ते भोकरदन पं.स. सभापतीपदी विराजमान झाले. १९९० ते ९९ या कार्यकाळात ते भोकरदन विधानसभा मतदारसंघाचे दोन टर्म आमदार राहिले. १९९९ साली त्यांनी सर्वप्रथम लोकसभा निवडणूक लढविली. तेव्हापासून आजवर चारही लोकसभा निवडणुकांमधून त्यांनी विजय मिळविला. या व्यतिरिक्त रामेश्वर सहकारी साखर कारखाना, पंचायत राज समितीचे राज्याध्यक्ष तसेच इतर विविध पदे त्यांनी भूषविलेली आहेत. खा. दानवे यांच्या राजकीय आयुष्यातील १९८५ सालची विधानसभा निवडणूक अपवाद त्यांनी पराभव पत्करला नाही. खा. दानवे हे एक प्रदीर्घ अनुभवी व मुरब्बी राजकारणी म्हणून या जिल्ह्यात ओळखले गेले आहेत. जालना-खामगाव व सोलापूर जळगाव लोहमार्गाचा रेंगाळलेला प्रश्न मार्गी लागावा, अशी अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे औद्योगिक क्षेत्रासाठी गॅसलाईन, बदनापूरजवळ रेल्वेचा मालधक्का, जालना ते औरंगाबाद दुहेरी लोहमार्ग इत्यादी प्रश्न सुटावेत, अशीही अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर केंद्रीय मंत्रिमंडळातील अन्य सहकार्‍यांच्या मदतीने विविध विकास कामे करावीत, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे. स्टील, बियाणे या उद्योगांमुळे जालना जिल्ह्याचे नाव देशभर पसरलेले असले तरी उद्योग वाढीसाठी आणखी प्रयत्न करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया उद्योजकांमधून व्यक्त केली जात आहे. त्यासाठी विविध योजना राबविण्याची गरज असल्याचे उद्योजकांमधून सांगण्यात आले.(प्रतिनिधी) मिळालेल्या संधीचे सोने करू केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे ‘लोकमत’ शी बोलताना म्हणाले की, जालना जिल्ह्याला प्रथमच केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्यावर जी जबाबदारी टाकतील, ती यशस्वीपणे पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करू. राज्य व देशात चांगले काम करण्याची आपणास संधी दिल्याने या संधीचे आपण सोने करू, असा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला. दानवे यांच्या केंद्रीय राज्यमंत्री पदाच्या रूपाने जालना जिल्ह्याला प्रथमच केंद्राच्या सत्तेत संधी मिळाली आहे. त्यामुळे दानवे यांच्याकडून सर्वसामान्यांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत.