शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

कृषी संजीवनी योजनेला मुदतवाढ

By admin | Updated: January 2, 2015 00:51 IST

औरंगाबाद : शासनाने कृषी संजीवनी योजनेला मुदतवाढ देण्याचा नुकताच निर्णय घेतला आहे. त्यामुळे औरंगाबाद प्रभागामधील तीन लाख कृषिपंपधारक शेतकऱ्यांना कृषिपंपाचे थकित बिल भरण्यासाठी अवधी मिळणार आहे.

औरंगाबाद : शासनाने कृषी संजीवनी योजनेला मुदतवाढ देण्याचा नुकताच निर्णय घेतला आहे. त्यामुळे औरंगाबाद प्रभागामधील तीन लाख कृषिपंपधारक शेतकऱ्यांना कृषिपंपाचे थकित बिल भरण्यासाठी अवधी मिळणार आहे. शासनाने दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तीन महिन्यांचे वीज बिल माफ केलेले आहे.कृषी संजीवनी योजना २०१४ अंतर्गत शेतकऱ्यांना ३१ मार्च २०१४ पर्यंतच्या कृषिपंपाच्या एकूण मूळ थकबाकी बिलापैकी ५० टक्के रकमेचा भरणा केल्यास बाकी ५० टक्के मूळ रक्कम शासन महावितरणकडे जमा करते. ३१ मार्च २०१४ पर्यंतचे कृषिपंपाचे व्याज आणि दंड महावितरण ग्राहकांला माफ करते. त्यामुळे शेतकऱ्यांना ५० टक्के फायदा मिळतो. योजनेला शासनाच्या निर्णयाप्रमाणे ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे महावितरणने कळविले आहे. महावितरणचे औरंगाबाद झोनमध्ये कृषिपंपांच्या बिलापोटी शेतकऱ्यांकडे चौदाशे कोटी रुपये थकले आहेत. झोनमध्ये कृषिपंपांची संख्या ३०७२१५ आहे. या कृषिपंपधारकांकडे १ हजार ४५४ कोटी ४९ लाख ३१ हजार वीज बिल थकले आहे. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात २०२४३६ कृषिपंंपधारकांकडे ८३१२९.८६ लाख रुपये थकले आहेत. जालना जिल्ह्यात १०४७७९ कृषिपंपधारकांकडे ६२३१९.४५ लाख रुपये थकले आहेत. योजनेचा शेतकऱ्यांनी फायदा घेतला नसल्यामुळे दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे.