शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

तीन ग्रामपंचायतींचे अस्तित्व धोक्यात

By admin | Updated: November 7, 2014 00:41 IST

कळंब : ‘घर तिथे शौचालय, हागणदारीमुक्त गाव’ या संकल्पनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांकडेच शौचालय नसल्यामुळे तालुक्यातील

कळंब : ‘घर तिथे शौचालय, हागणदारीमुक्त गाव’ या संकल्पनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांकडेच शौचालय नसल्यामुळे तालुक्यातील ३७ सदस्यांना अपर जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरविले आहे. यामध्ये अकरा ग्रामपंचायतींच्या सदस्यांचा समावेश असून, तीन ग्रामपंचायतीचे तर जवळपास संपूर्ण बोर्डच अपात्र ठरल्याने या ग्रामपंचायतीच्या बोर्डांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ (१), (ज ५) नुसार मुदतीत शौचालय बांधून त्याचा वापर न करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांना पदावर अनर्ह (अपात्र) ठरविण्याची तरतूद आहे. याच अधिनियमातील कलम १६ नुसार कारवाई करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झालेला आहे. कळंब तालुक्यात ९१ ग्रामपंचायती असून, या ग्रामपंचायतींमध्ये ७६७ ग्रामपंचायत सदस्य आहेत. सदस्य म्हणून निवड झाल्यानंतर १० जानेवारी २०११ ते १० जानेवारी २०१२ या दरम्यान सर्व सदस्यांनी आपल्या शौचालय वापराबाबत ग्रामसभेचा ठराव व ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे सादर करणे आवश्यक होते. या कालावधीत असे प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या सदस्यांना आपले म्हणणे सादर करण्याची संधीही देण्यात आली होती. याउपरही प्रमाणपत्र व ठराव सादर केले नसल्याने ३७ सदस्यांवर अनर्हतेची कारवाई अपर जिल्हाधिकारी जोतीबा पाटील यांनी केली आहे. यात एकूण ११ ग्रामपंचायतीतील सदस्यांचा समावेश असून, यातही कोठाळवाडी व शिंगोलीतील सर्व तर आडसूळवाडी येथील सातपैकी सहा आणि वाकडी येथील सात पैकी चार सदस्यांवर ही कारवाई झाली आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींचे असतित्व धोक्यात आले आहे. दरम्यान, या कारवाईबाबत काही सदस्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात अपील दाखल केले आहे. (वार्ताहर)