शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

तीन ग्रामपंचायतींचे अस्तित्व धोक्यात

By admin | Updated: November 7, 2014 00:41 IST

कळंब : ‘घर तिथे शौचालय, हागणदारीमुक्त गाव’ या संकल्पनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांकडेच शौचालय नसल्यामुळे तालुक्यातील

कळंब : ‘घर तिथे शौचालय, हागणदारीमुक्त गाव’ या संकल्पनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांकडेच शौचालय नसल्यामुळे तालुक्यातील ३७ सदस्यांना अपर जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरविले आहे. यामध्ये अकरा ग्रामपंचायतींच्या सदस्यांचा समावेश असून, तीन ग्रामपंचायतीचे तर जवळपास संपूर्ण बोर्डच अपात्र ठरल्याने या ग्रामपंचायतीच्या बोर्डांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ (१), (ज ५) नुसार मुदतीत शौचालय बांधून त्याचा वापर न करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांना पदावर अनर्ह (अपात्र) ठरविण्याची तरतूद आहे. याच अधिनियमातील कलम १६ नुसार कारवाई करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झालेला आहे. कळंब तालुक्यात ९१ ग्रामपंचायती असून, या ग्रामपंचायतींमध्ये ७६७ ग्रामपंचायत सदस्य आहेत. सदस्य म्हणून निवड झाल्यानंतर १० जानेवारी २०११ ते १० जानेवारी २०१२ या दरम्यान सर्व सदस्यांनी आपल्या शौचालय वापराबाबत ग्रामसभेचा ठराव व ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे सादर करणे आवश्यक होते. या कालावधीत असे प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या सदस्यांना आपले म्हणणे सादर करण्याची संधीही देण्यात आली होती. याउपरही प्रमाणपत्र व ठराव सादर केले नसल्याने ३७ सदस्यांवर अनर्हतेची कारवाई अपर जिल्हाधिकारी जोतीबा पाटील यांनी केली आहे. यात एकूण ११ ग्रामपंचायतीतील सदस्यांचा समावेश असून, यातही कोठाळवाडी व शिंगोलीतील सर्व तर आडसूळवाडी येथील सातपैकी सहा आणि वाकडी येथील सात पैकी चार सदस्यांवर ही कारवाई झाली आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींचे असतित्व धोक्यात आले आहे. दरम्यान, या कारवाईबाबत काही सदस्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात अपील दाखल केले आहे. (वार्ताहर)