शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
3
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
4
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
5
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
6
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
7
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
8
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
9
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
10
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...
11
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट
12
Gold Price 6 May: लग्नसराईच्या हंगामापूर्वी सोन्याच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा लेटेस्ट दर
13
'या' ५८ देशांत भारतीयांना व्हिसा फ्री प्रवेश! विमान पकडा आणि थेट परदेशात उतरा, यादीत अनेक सुंदर देश
14
नाशिक बोगस शालार्थ आयडी प्रकरण : 'त्या' शिक्षक, अधिकाऱ्यांची झाडाझडती
15
जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात; पूंछ जिल्ह्यात बस उलटली, दोघांचा मृत्यू तर 35 जखमी
16
हार्दिक पांड्या IPL मध्ये खेळतोय, दुसरीकडे त्याची Ex पत्नी नताशा काय करतेय? Photo Viral
17
तृतीयपंथीवर चौघांकडून लैंगिक अत्याचार; मोबाईलवर काढला व्हिडिओ, १ लाख मागितले
18
१०० वर्षांनी अद्भूत योग: ८ राशींना लॉटरी, सुख-सोयींचा काळ; पद-पैसा वृद्धी, शेअर बाजारात नफा!
19
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा
20
Soniya Bansal : "मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग

तहान भागविण्यासाठी कसरत

By admin | Updated: June 3, 2016 23:51 IST

औरंगाबाद : जायकवाडी धरणातील पाणीपातळी झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे औरंगाबाद शहराची तहान भागविण्यासाठी महापालिकेला मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.

औरंगाबाद : जायकवाडी धरणातील पाणीपातळी झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे औरंगाबाद शहराची तहान भागविण्यासाठी महापालिकेला मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. यंदा पावसाळा लांबला तर परिस्थिती आणखी गंभीर बनू शकते. औरंगाबादकरांना भविष्यात आपली तहान भागविण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. २०१२ मध्ये महापालिकेला अशाच पद्धतीने गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागले होते. तब्बल ८ कोटी रुपये खर्च करून धरणाच्या मध्य भागातून एक अ‍ॅप्रोच चॅनल तयार करण्यात आला होता. ८५०-९०० मीटर लांब चॅनल तयार केला आहे. धरणातील पाणीपातळी झपाट्याने खालावत असल्याने सध्या अ‍ॅप्रोच चॅनलद्वारे डाव्या कालव्यात पाणी आणण्यात येत आहे. कालव्यातील पाणीपातळीही दीड मीटरने खाली गेली आहे. त्यामुळे महापालिकेने सहा इमर्जन्सी पंप सुरू करून एक स्वतंत्र विहीर तयार केली आहे. यामध्ये पाणी आणून शहराची तहान भागविण्यात येत आहे. धरणाचा परिसर पूर्णपणे कोरडाठाक पडला आहे. नाथसागराच्या मध्यभागीच मृतसाठा दिसून येत आहे. मृतसाठ्याची पाणीपातळी बाष्पीभवनामुळे कमी होत असल्याने मनपाची चिंता वाढू लागली आहे. सध्या अ‍ॅप्रोच चॅनलमधून तीन ते चार फूट पाणीपातळी आहे. आणखी पंधरा ते वीस दिवस ही पाणीपातळी कायम राहील. १५ जूननंतरही पाऊस लांबल्यास परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. अ‍ॅप्रोच चॅनलला आणखी खोल करणे सध्या मनपाला शक्य नाही. इमर्जन्सी पंपही एवढ्या लांब धरणात नेणे अशक्य आहे.शुक्रवारी महापौर त्र्यंबक तुपे यांनी धरणात जाऊन प्रत्यक्ष पाणीपुरवठ्याची पाहणी केली. यावेळी कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, उपअभियंता शिरसाट यांच्यासह औरंगाबाद वॉटर युटिलिटीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. धरणाच्या मृतसाठ्यातील पाणी डाव्या कालव्यापर्यंत आणण्याची कसरत आणखी एक महिना होऊ शकते, असे मनपा पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता कोल्हे यांनी नमूद केले.