शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
3
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
4
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
5
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
6
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
7
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
8
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
9
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
10
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
11
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
12
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
13
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
14
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
15
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
16
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
17
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
18
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
19
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा

तहान भागविण्यासाठी कसरत

By admin | Updated: June 3, 2016 23:51 IST

औरंगाबाद : जायकवाडी धरणातील पाणीपातळी झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे औरंगाबाद शहराची तहान भागविण्यासाठी महापालिकेला मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.

औरंगाबाद : जायकवाडी धरणातील पाणीपातळी झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे औरंगाबाद शहराची तहान भागविण्यासाठी महापालिकेला मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. यंदा पावसाळा लांबला तर परिस्थिती आणखी गंभीर बनू शकते. औरंगाबादकरांना भविष्यात आपली तहान भागविण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. २०१२ मध्ये महापालिकेला अशाच पद्धतीने गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागले होते. तब्बल ८ कोटी रुपये खर्च करून धरणाच्या मध्य भागातून एक अ‍ॅप्रोच चॅनल तयार करण्यात आला होता. ८५०-९०० मीटर लांब चॅनल तयार केला आहे. धरणातील पाणीपातळी झपाट्याने खालावत असल्याने सध्या अ‍ॅप्रोच चॅनलद्वारे डाव्या कालव्यात पाणी आणण्यात येत आहे. कालव्यातील पाणीपातळीही दीड मीटरने खाली गेली आहे. त्यामुळे महापालिकेने सहा इमर्जन्सी पंप सुरू करून एक स्वतंत्र विहीर तयार केली आहे. यामध्ये पाणी आणून शहराची तहान भागविण्यात येत आहे. धरणाचा परिसर पूर्णपणे कोरडाठाक पडला आहे. नाथसागराच्या मध्यभागीच मृतसाठा दिसून येत आहे. मृतसाठ्याची पाणीपातळी बाष्पीभवनामुळे कमी होत असल्याने मनपाची चिंता वाढू लागली आहे. सध्या अ‍ॅप्रोच चॅनलमधून तीन ते चार फूट पाणीपातळी आहे. आणखी पंधरा ते वीस दिवस ही पाणीपातळी कायम राहील. १५ जूननंतरही पाऊस लांबल्यास परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. अ‍ॅप्रोच चॅनलला आणखी खोल करणे सध्या मनपाला शक्य नाही. इमर्जन्सी पंपही एवढ्या लांब धरणात नेणे अशक्य आहे.शुक्रवारी महापौर त्र्यंबक तुपे यांनी धरणात जाऊन प्रत्यक्ष पाणीपुरवठ्याची पाहणी केली. यावेळी कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, उपअभियंता शिरसाट यांच्यासह औरंगाबाद वॉटर युटिलिटीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. धरणाच्या मृतसाठ्यातील पाणी डाव्या कालव्यापर्यंत आणण्याची कसरत आणखी एक महिना होऊ शकते, असे मनपा पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता कोल्हे यांनी नमूद केले.