शहरं
Join us  
Trending Stories
1
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
2
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
3
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
4
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
5
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
6
इतकी मोठी झाली उर्मिला-आदिनाथ कोठारेची लेक जिजा, दिसायला आहे आईची कार्बन कॉपी
7
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
8
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
9
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
10
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
11
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
12
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
13
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
14
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
15
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
16
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
17
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
18
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
19
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
20
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...

तहान भागविण्यासाठी कसरत

By admin | Updated: June 3, 2016 23:51 IST

औरंगाबाद : जायकवाडी धरणातील पाणीपातळी झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे औरंगाबाद शहराची तहान भागविण्यासाठी महापालिकेला मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.

औरंगाबाद : जायकवाडी धरणातील पाणीपातळी झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे औरंगाबाद शहराची तहान भागविण्यासाठी महापालिकेला मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. यंदा पावसाळा लांबला तर परिस्थिती आणखी गंभीर बनू शकते. औरंगाबादकरांना भविष्यात आपली तहान भागविण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. २०१२ मध्ये महापालिकेला अशाच पद्धतीने गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागले होते. तब्बल ८ कोटी रुपये खर्च करून धरणाच्या मध्य भागातून एक अ‍ॅप्रोच चॅनल तयार करण्यात आला होता. ८५०-९०० मीटर लांब चॅनल तयार केला आहे. धरणातील पाणीपातळी झपाट्याने खालावत असल्याने सध्या अ‍ॅप्रोच चॅनलद्वारे डाव्या कालव्यात पाणी आणण्यात येत आहे. कालव्यातील पाणीपातळीही दीड मीटरने खाली गेली आहे. त्यामुळे महापालिकेने सहा इमर्जन्सी पंप सुरू करून एक स्वतंत्र विहीर तयार केली आहे. यामध्ये पाणी आणून शहराची तहान भागविण्यात येत आहे. धरणाचा परिसर पूर्णपणे कोरडाठाक पडला आहे. नाथसागराच्या मध्यभागीच मृतसाठा दिसून येत आहे. मृतसाठ्याची पाणीपातळी बाष्पीभवनामुळे कमी होत असल्याने मनपाची चिंता वाढू लागली आहे. सध्या अ‍ॅप्रोच चॅनलमधून तीन ते चार फूट पाणीपातळी आहे. आणखी पंधरा ते वीस दिवस ही पाणीपातळी कायम राहील. १५ जूननंतरही पाऊस लांबल्यास परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. अ‍ॅप्रोच चॅनलला आणखी खोल करणे सध्या मनपाला शक्य नाही. इमर्जन्सी पंपही एवढ्या लांब धरणात नेणे अशक्य आहे.शुक्रवारी महापौर त्र्यंबक तुपे यांनी धरणात जाऊन प्रत्यक्ष पाणीपुरवठ्याची पाहणी केली. यावेळी कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, उपअभियंता शिरसाट यांच्यासह औरंगाबाद वॉटर युटिलिटीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. धरणाच्या मृतसाठ्यातील पाणी डाव्या कालव्यापर्यंत आणण्याची कसरत आणखी एक महिना होऊ शकते, असे मनपा पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता कोल्हे यांनी नमूद केले.