अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील सोनवळा येथील चारशे ग्रामस्थांना सामाजिक, आर्थिक व जातीनिहाय जनगणनेतून जाणीवपूर्वक वगळण्यात आले आहे. या वगळलेल्या ग्रामस्थांचा पुन्हा सर्वे करण्यात यावा. अशी मागणी ग्रामस्थांनी शुक्रवारी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे केली. शासनाच्या वतीने सामाजिक, आर्थिक व जातीनिहाय जनगणना करण्यात आली. ही जनगणना करीत असतांना दलित वस्तीमधील लोकांना जाणीवपूर्वक वगळण्यात आले. नुकत्याच जाहिर झालेल्या यादीमध्ये चारशे ग्रामस्थांची नावे समाविष्ट नाहीत. जनगणना करणारे प्रगणक, ग्रामसेवक व जनगणना करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना या संदर्भात विचारणा करून त्यांच्यावर कारवाई करावी व पुनर्रसर्व्हेक्षण करून वगळण्यात आलेल्या ग्रामस्थांचा यादीत समावेश करावा. अशी मागणी यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी केली. यावेळी ज्ञानोबा मस्के, बाबासाहेब मस्के, रामदास मस्के, राजेभाऊ व्हावळे, सुनील तरकसे, बाबू मडके, संजय तरकसे, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)
सोनवळ्यात जनगणनेच्या यादीतून चारशे ग्रामस्थांना वगळले
By admin | Updated: May 23, 2015 00:40 IST