शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
2
राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये वाघ व बिबट्यांची दहशत; बिबट्यांच्या मुक्त संचारामागे कारणे काय?
3
'भारताने माझ्या आईचे प्राण वाचवले, त्यांना बांगलादेशच्या स्वाधीन करणार नाहीत'; शेख हसीना यांच्या मुलाने व्यक्त केला विश्वास
4
ICC ODI Batting Ranking : 'नवा गडी नव राज्य!' रोहित शर्माला मागे टाकत डॅरिल मिचेलनं रचला इतिहास
5
"मदरसे-मशिदीतून दहशतवादी बाहेर पडतात..."; योगी सरकारमधील मंत्र्याचं वादग्रस्त विधान, AMU वरही उपस्थित केला सवाल
6
Jalgaon Crime: 'चोर पऱ्या' बोलला अन्...; रेल्वे रुळावर मृतदेह सापडलेल्या हर्षलची हत्याच; सगळा घटनाक्रम आला समोर
7
महागड्या क्रिम्सना बाय-बाय, Skinimalism सोपा उपाय; ३ स्टेपमध्ये मेकअपशिवाय ग्लोइंग स्किन
8
'मला नीट झोप येत नाहीये...', बिहार निवडणुकीत 'जन सुराज'च्या पराभवावर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया
9
जगातील टॉप हाय-स्ट्रीट रँकिंगमध्ये भारताचा दबदबा! ही बाजारपेठ सर्वात महागडी, तर सर्वाधिक भाडे कुठे?
10
आता बँक FD विसरा! पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये मिळतंय ८.२०% पर्यंत व्याज; गॅरंटीड रिटर्नवाले प्लान्स पाहा
11
सिद्धू मूसेवाला ते बाबा सिद्दीकी हत्या अन् सलमान खान..; अनमोल बिश्नोईची संपूर्ण क्राइम कुंडली
12
Jara Hatke: सिम कार्डचे एक टोक तिरपे का असते? ९९ % लोकांना माहीत नाही कारण!
13
किमान ५ इमारतीच्या गटाचे ‘मिनी क्लस्टर’ लवकरच; मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश
14
"मला शिव्या दिल्या तर फरक नाही, पण संघावर आल्यावर मी..."; पिट्या भाईने सांगितले मनसे सोडण्याचे कारण
15
घरमालक-भाडेकरू वादावर अखेर ब्रेक! 'नवीन भाडे करार २०२५' लागू; 'हा' नियम मोडल्यास ५ हजार दंड!
16
Vastu Tips: घड्याळ दोन-तीन मिनिटं पुढे लावणे शुभ? पाहा वास्तू शास्त्र काय सांगते... 
17
धर्म आणि जातीवर ऐश्वर्या राय बच्चनचं वक्तव्य, पंतप्रधान मोदींच्या पाया पडत घेतले आशीर्वाद
18
गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेने हाकलले, विमानातून उतरताच एनआयएने ताब्यात घेतले  
19
छत्तीसगडमध्ये दोन अल्पवयीन मुलांना ATSकडून अटक; 'ब्रेनवॉश' करून ISISमध्ये सुरू होती भरती
20
स्लीपर वंदे भारत अन् बुलेट ट्रेन कधीपासून सुरू होणार? अश्विनी वैष्णव यांनी तारखाच सांगितल्या
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीच्या नुकसानीचे निकष ठरेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:03 IST

सोयगाव : जिल्हाभरात अतिवृष्टी होऊन आठवडा उलटला तरीही अद्यापही बाधित क्षेत्राची आकडेवारी जुळवाजुळव करण्यातच जिल्हा प्रशासन गुंतले आहे. अद्यापही ...

सोयगाव : जिल्हाभरात अतिवृष्टी होऊन आठवडा उलटला तरीही अद्यापही बाधित क्षेत्राची आकडेवारी जुळवाजुळव करण्यातच जिल्हा प्रशासन गुंतले आहे. अद्यापही नुकसानीचा निकष ठरत नसल्याने जिल्ह्यासाठी मिळणारी अतिवृष्टीची मदत रखडली आहे.

जिल्हाभरात आठवड्यापूर्वी झालेल्या अतिवृष्टीच्या तडाख्यात खरिपाचे मोठे नुकसान झालेले आहे. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्हाभरात नुकसानीची पाहणी पूर्ण केली. परंतु अद्याप जिल्ह्याची नुकसानीची आकडेवारी जुळवाजुळवीचेच काम सुरू आहे. जिल्हा प्रशासनाकडून पंचनामे संथगतीने सुरू आहेत. शासनाकडून अद्यापही नुकसानीच्या भरपाईसाठी हेक्टरी मदत घोषित करण्यात आलेली नसल्याने प्रशासनाच्या स्थानिक पातळीवर मदतीच्या निकषासाठी एकमत होत नसल्याने नुकसानभरपाईच्या मदतीसाठी अद्यापही निकष ठरत नाही. परंतु पंचनामे कोणत्या आधारावर करण्यात येत आहे, याबाबत शेतकऱ्यांत संभ्रम निर्माण झाला आहे.

------

दोन हेक्टरची मर्यादा

अतिवृष्टीच्या नुकसानीसाठी जिल्हा प्रशासनाकडून पंचनामे करताना दोन हेक्टरचीच मर्यादा घालून दिलेली असल्याने या नुकसानीसाठी एनडीआरएफचाच निकष ग्राह्य धरण्यात येत असल्याचे पंचनाम्यांच्या हालचालीवरून उघड झाले आहे. या निकषात कोरडवाहू क्षेत्रासाठी ६,८०० व बागायतीसाठी १२,५०० रुपये मदत मिळते, तर ज्वारी, बाजरी आणि भाजीपाल्यासाठी कोणता निकष लावला जाणार आहेत. याचा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

130921\img-20210912-wa0127.jpg

सोयगाव-सोयगाव तालुक्यात झालेले नुकसान