शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

शासनाच्या समितीकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 00:34 IST

शहर हगणदारीमुक्त व्हावे यासाठी महापालिकेकडून मागील तीन वर्षांपासून जोरदार प्रयत्न सुरू आहेत; मात्र प्रशासनाला पाहिजे तसे यश मिळायला तयार नाही. त्यातच मंगळवारपासून शासनाने नेमलेल्या समितीने शहरातील विविध वसाहतींमध्ये जाऊन पाहणी दौरा सुरू केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहर हगणदारीमुक्त व्हावे यासाठी महापालिकेकडून मागील तीन वर्षांपासून जोरदार प्रयत्न सुरू आहेत; मात्र प्रशासनाला पाहिजे तसे यश मिळायला तयार नाही. त्यातच मंगळवारपासून शासनाने नेमलेल्या समितीने शहरातील विविध वसाहतींमध्ये जाऊन पाहणी दौरा सुरू केला आहे. महापालिकेचे काम अत्यंत असमाधानकारक असल्याचे समितीच्या निदर्शनास आले. येणाºया चार ते पाच दिवसांमध्ये शहर हगणदारीमुक्त होईल, या दृष्टीने प्रयत्न करा, अशा सूचना समितीने मनपा अधिकाºयांना दिल्या.स्वच्छ भारत व स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत साफसफाई, शहर हगणदारीमुक्त करण्याकडे शासनाकडून विशेष लक्ष देण्यात येत आहे. उघड्यावर प्रातर्विधीस जाण्याचा प्रकार बंद करण्यासाठी लाभार्थींची निवड करून त्यांना प्रत्येकी १२ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येत असून, त्यासाठी महापालिकेच्या वतीने सुमारे सात हजार वैयक्तिक व १४ ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहे बांधण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महापालिकेला वारंवार संधी देण्यात आली; मात्र अद्याप शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण झालेले नाही. राज्य शासनाने राज्यातील शहरे दोन आॅक्टोबरला गांधी जयंतीदिनी हगणदारीमुक्त म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्य शासनाच्या पाच सदस्यांची समिती मंगळवारी सकाळीच स्वच्छतागृहाच्या बांधकामाची पाहणी करण्यासाठी शहरात दाखल झाली. नाशिक महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांच्या नेतृत्वाखालील समितीने शहरात २० ठिकाणी पाहणी केली. काही वसाहतींमध्ये काम समाधानकारक असल्याचे, तर काही ठिकाणी सुधारणा करण्याची गरज असल्याचे मत या समितीने व्यक्त केले. नारेगाव, मिटमिटा, पडेगाव, मुकुंदवाडी, राजनगर, अंबिकानगर आदी वसाहतींमध्ये वैयक्तिक स्वच्छतागृहांची पाहणी समितीने केली. समितीने स्वच्छतागृहाचे छायाचित्र घेतले. बांधकाम निकृष्ट दर्जाचे आहे का? लाभार्थींच्या खात्यावर पैसे योग्य वेळी जमा झालेले आहेत का? याची खातरजमा करण्यात आली. त्यासाठी पासबुकचा फोटोदेखील घेण्यात आला.