शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
2
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
3
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
4
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
5
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
6
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
7
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
8
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
9
ATM मधून पैसे काढताना तुम्हीही दोनदा Cancel बटन दाबता का? खरंच कामाची आहे का ही ट्रिक
10
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
11
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
12
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
13
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप
14
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
15
जीएसटी कपातीमुळे कुटुंबाच्या मासिक खर्चात होणार बचत; पण वाचलेल्या पैशांची कुठे, कशी गुंतवणूक कराल?
16
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!
17
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
18
रश्मिका मंदानाने घातली डायमंड रिंग, विजय देवरकोंडाशी झाला साखरपुडा? चर्चांना उधाण
19
Upcoming IPO: २१ वर्ष जुनी कंपनी IPO आणण्याच्या तयारीत, ८०० कोटी रुपये उभे करण्याची योजना
20
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?

जिल्ह्यात नवसाक्षरांची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:14 IST

जिल्ह्यातील ५६५ केंद्रावरून नवसाक्षरांची परीक्षा घेण्यात आली. डिसेंबर २०१७ पर्यंत संपूर्ण जिल्हा साक्षर करण्याचे उद्दिष्ट होते. सदर परीक्षा शेवटची घेण्यात आली असून ५ हजार निरक्षरांपैकी ४६०० जणांनी परीक्षा दिली. उर्वरीत परीक्षार्थींची आकडेवारी जुळवणी सुरू असल्याची माहिती शिक्षणाधिकारी डी. आर. चवणे यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील ५६५ केंद्रावरून नवसाक्षरांची परीक्षा घेण्यात आली. डिसेंबर २०१७ पर्यंत संपूर्ण जिल्हा साक्षर करण्याचे उद्दिष्ट होते. सदर परीक्षा शेवटची घेण्यात आली असून ५ हजार निरक्षरांपैकी ४६०० जणांनी परीक्षा दिली. उर्वरीत परीक्षार्थींची आकडेवारी जुळवणी सुरू असल्याची माहिती शिक्षणाधिकारी डी. आर. चवणे यांनी दिली.राष्ट्रीय मुक्त विद्यालय संस्था (नोयडा) मार्फत साक्षर भारत मिशनतंर्गत जिल्ह्यातील ५६५ ग्राम लोक शिक्षण समिती असलेल्या गावातील जि. प. प्राथमिक शाळेत नवसाक्षरांची परीक्षा घेण्यात आली. आता बाह्यमूल्यमापन करण्यात येणार आहे. यामध्ये खरेच किती नवसाक्षर साक्षर झाले आहेत, याचा आढावा शिक्षण विभागातील वरिष्ठ समितीतर्फे घेतला जाणार आहे. उपक्रम सुरू झाला तेव्हापासून आतापर्यंत जवळपास १ लाखांवर निरक्षर साक्षर झाल्याची नोंद शिक्षण विभागाकडे होती. उर्वरित नवसाक्षरांची परीक्षा रविवारी झाली. जिल्ह्यात एकूण ११३० प्रेरक साक्षर भारतसाठी नेमण्यात आले होते. २० आॅगस्ट रोजी घेण्यात आलेल्या परीक्षा केंद्रांना संचालक अधिकारी, प्रतिनिधी, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी यांनी भेटी दिल्या.कौठा केंद्रास भेटकौठा : येथे साक्षर भारत परीक्षेस शिक्षणाधिकारी डी .आर. चवने सातपुते, शेकडे यांनी भेट दिली. सदर परीक्षा सुरळीत पार पडली असून केंद्रावर मुख्याध्यापक सदावर्ते, प्रेरिका ज्योत्स्ना स्वामी, पाईकराव, शाळा समितीचे अध्यक्ष बोबडे आदी उपस्थित होते.परीक्षा सुरळीतकनेरगागाव नाका : साक्षर भारत कार्यक्रमांतर्गत आज दि २०आॅगस्ट रोजी फाळेगाव केंद्रा अंतर्गत फाळेगाव, कानडखेडा बु., देवठाणा कानडखेडा खु., कनेरगाव नाका, वांझोळा आदी गावांतील नवसाक्षरांनी परीक्षा दिली. सदर परीक्षा सुरळीत पार पडली.परीक्षार्थींचे इंग्रजीतून नावेपोत्रा : मराठीतूनच बरोबर लिहिता येत नाही, निरक्षर नवसाक्षरांची २० आॅगस्ट रोजी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेच्या प्रश्न उत्तर पत्रीकेत परीक्षार्थींचे नाव चक्क इंग्रजीतून टाकून देण्यात आले. त्यामुळे या अजब कारभारावरच प्रश्न चिन्ह निर्माण होत आहेत.२० आॅगस्ट रोजी कळमनुरी तालुक्यातील पोत्रा येथील जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक शाळेवर नवसाक्षरांसाठी प्राथमिक साक्षरता परीक्षा घेण्यात आली. नवसाक्षर परीक्षेचे पेपर गिरवत असताना एक बाब निदर्शनास आली की, प्रश्नोत्तर पत्रिकेत परीक्षार्थीचे नाव प्रथम आडनाव टाकून इंग्रजीमधूनच नावे टाकण्याची सूचना निदर्शनास आली. सदर प्रश्नोत्तर पत्रिकेवरील नावे ही प्रेरकांनीच इंग्रजीतून टाकल्याचे पाहावयास मिळाले. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.