शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

परीक्षा संचालकांच्या वा-या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 01:11 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने घेतलेल्या पदवी परीक्षांमधील बी.कॉम.च्या प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ सत्रांचे निकाल जाहीर झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने घेतलेल्या पदवी परीक्षांमधील बी.कॉम.च्या प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ सत्रांचे निकाल जाहीर झाले. मात्र, महत्त्वाच्या बी.ए., बी.एस्सी.च्या निकालाची महिना उलटल्यानंतरही प्रतीक्षा कायम आहे. विद्यापीठाचे परीक्षा संचालक डॉ. दिगंबर नेटके यांच्याकडे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाची जबाबदारी दिल्यामुळे त्यांच्या मुंबर्ई- औरंगाबाद वाºया सुरू आहेत.विद्यापीठाच्या महिनाभरापूर्वीच पदवी परीक्षा घेण्यात आलेल्या आहेत. परीक्षा संचालक डॉ. नेटके यांनी ३० डिसेंबरपर्यंत सर्व पदवी परीक्षांचे निकाल जाहीर होणार असल्याचा दावा केला होता. मात्र, पदवी परीक्षांचे निकाल जाहीर झालेले नाहीत. बुधवारी बी.कॉम.च्या प्रथम आणि द्वितीय वर्षातील चार सत्रांचा निकाल जाहीर झाला आहे, तर बी.सी.ए., बी.बी.ए. या पदवी अभ्यासक्रमांचे निकालही दोन दिवसांपूर्वी जाहीर झाले असल्याचे उपकुलसचिव डॉ. प्रताप कलावंत यांनी सांगितले, तर एलएल.बी.चा निकालही बुधवारी सायंकाळपर्यंत जाहीर करण्यात येणार आहे. यापूर्वी इतरही काही पदवी अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झालेले आहेत. मात्र, सर्वाधिक विद्यार्थी संख्या असलेल्या बी.ए., बी.एस्सी.च्या निकालाची प्रतीक्षाच विद्यार्थ्यांना करावी लागत आहे. दरम्यान, मुंबई विद्यापीठाच्या मागील सत्रावेळी निकालाचा झालेला गोंधळ यावेळी होऊ नये, यासाठी राज्यातील विविध अधिकाºयांची मदत घेण्यात येत आहे.मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. दिगंबर नेटके यांच्याकडेही मुंबई विद्यापीठाच्या निकालाची काही जबाबदारी सोपावली. यामुळे डॉ. नेटके हे आठ दिवस मुंबई आणि आठ दिवस औरंगाबादेत काम करीत आहेत.डॉ. नेटके यांना पूर्णवेळ मुंबईला पाठविण्यासाठी कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी नकार दर्शविला होता. यामुळे आठ दिवसांचा तोडगा काढला आहे. याचा परिणाम परीक्षा विभागाच्या कामावर होत असल्याचे बोलले जात आहे.आगामी परीक्षा अर्जांची मुदत संपलीपदवी अभ्यासक्रमांच्या चालू सत्रातील परीक्षांचे अर्ज भरण्याची मुदत मंगळवारीच संपली आहे. ही मुदत संपली तरीही पदवीच्या झालेल्या परीक्षांचे निकाल लागले नाहीत. यामुळे नापास विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज भरावे लागणार आहेत.बी.कॉम.च्या चार सत्रांचे निकाल जाहीर झाले आहेत. बी.ए., बी.एस्सी.चे निकालही लवकरच जाहीर होतील. याचवेळी अभियांत्रिकीच्या एम.सी.ए. इंजिनिअरिंगचे निकाल जाहीर करीत अभियांत्रिकीच्या निकालांनाही प्रारंभ केला आहे.-डॉ. प्रताप कलावंत,उपकुलसचिव