शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा संचालकांच्या वा-या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 01:11 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने घेतलेल्या पदवी परीक्षांमधील बी.कॉम.च्या प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ सत्रांचे निकाल जाहीर झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने घेतलेल्या पदवी परीक्षांमधील बी.कॉम.च्या प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ सत्रांचे निकाल जाहीर झाले. मात्र, महत्त्वाच्या बी.ए., बी.एस्सी.च्या निकालाची महिना उलटल्यानंतरही प्रतीक्षा कायम आहे. विद्यापीठाचे परीक्षा संचालक डॉ. दिगंबर नेटके यांच्याकडे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाची जबाबदारी दिल्यामुळे त्यांच्या मुंबर्ई- औरंगाबाद वाºया सुरू आहेत.विद्यापीठाच्या महिनाभरापूर्वीच पदवी परीक्षा घेण्यात आलेल्या आहेत. परीक्षा संचालक डॉ. नेटके यांनी ३० डिसेंबरपर्यंत सर्व पदवी परीक्षांचे निकाल जाहीर होणार असल्याचा दावा केला होता. मात्र, पदवी परीक्षांचे निकाल जाहीर झालेले नाहीत. बुधवारी बी.कॉम.च्या प्रथम आणि द्वितीय वर्षातील चार सत्रांचा निकाल जाहीर झाला आहे, तर बी.सी.ए., बी.बी.ए. या पदवी अभ्यासक्रमांचे निकालही दोन दिवसांपूर्वी जाहीर झाले असल्याचे उपकुलसचिव डॉ. प्रताप कलावंत यांनी सांगितले, तर एलएल.बी.चा निकालही बुधवारी सायंकाळपर्यंत जाहीर करण्यात येणार आहे. यापूर्वी इतरही काही पदवी अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झालेले आहेत. मात्र, सर्वाधिक विद्यार्थी संख्या असलेल्या बी.ए., बी.एस्सी.च्या निकालाची प्रतीक्षाच विद्यार्थ्यांना करावी लागत आहे. दरम्यान, मुंबई विद्यापीठाच्या मागील सत्रावेळी निकालाचा झालेला गोंधळ यावेळी होऊ नये, यासाठी राज्यातील विविध अधिकाºयांची मदत घेण्यात येत आहे.मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. दिगंबर नेटके यांच्याकडेही मुंबई विद्यापीठाच्या निकालाची काही जबाबदारी सोपावली. यामुळे डॉ. नेटके हे आठ दिवस मुंबई आणि आठ दिवस औरंगाबादेत काम करीत आहेत.डॉ. नेटके यांना पूर्णवेळ मुंबईला पाठविण्यासाठी कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी नकार दर्शविला होता. यामुळे आठ दिवसांचा तोडगा काढला आहे. याचा परिणाम परीक्षा विभागाच्या कामावर होत असल्याचे बोलले जात आहे.आगामी परीक्षा अर्जांची मुदत संपलीपदवी अभ्यासक्रमांच्या चालू सत्रातील परीक्षांचे अर्ज भरण्याची मुदत मंगळवारीच संपली आहे. ही मुदत संपली तरीही पदवीच्या झालेल्या परीक्षांचे निकाल लागले नाहीत. यामुळे नापास विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज भरावे लागणार आहेत.बी.कॉम.च्या चार सत्रांचे निकाल जाहीर झाले आहेत. बी.ए., बी.एस्सी.चे निकालही लवकरच जाहीर होतील. याचवेळी अभियांत्रिकीच्या एम.सी.ए. इंजिनिअरिंगचे निकाल जाहीर करीत अभियांत्रिकीच्या निकालांनाही प्रारंभ केला आहे.-डॉ. प्रताप कलावंत,उपकुलसचिव