शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

माजी नगराध्यक्षांसह सहा जणांना केले हद्दपार...

By admin | Updated: April 29, 2017 00:47 IST

उस्मानाबाद : विविध प्रकारचे गुन्हे दाखल असलेले माजी नगराध्यक्ष अमित दिलीप शिंदे यांच्यासह सहा जणांच्या हद्दपारीचे आदेश उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष प्रसाद यांनी शुक्रवारी काढले़

उस्मानाबाद : विविध प्रकारचे गुन्हे दाखल असलेले माजी नगराध्यक्ष अमित दिलीप शिंदे यांच्यासह सहा जणांच्या हद्दपारीचे आदेश उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष प्रसाद यांनी शुक्रवारी काढले़ यात दोघांना तब्बल दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे़ तर इतरांना तीन ते सहा महिन्यांसाठी जिल्हा व परिसरातील तीन तालुक्यांमधून हद्दपार केले आहे़उस्मानाबाद व तुळजापूर तालुक्यातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत गंभीर गुन्ह्यांसह इतर अनेक गुन्हे दाखल असलेल्या आरोपितांना हद्दपार करण्याचे प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे दाखल करण्यात येतात़ सन २०१४ पासून उस्मानाबाद येथील उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयात दाखल असलेले ४५ प्रस्ताव प्रलंबीत होते़ उपविभागीय दंडाधिकारी म्हणून पदभार हाती घेतल्यानंतर परिविक्षाधीन जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी आयुष प्रसाद यांनी पोलीस अधीक्षकांसमवेत बैठक घेतली होती़ या बैठकीत प्रस्तावित तडीपारीचे प्रस्ताव निकाली काढण्याबाबत चर्चा करून आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या होत्या़ प्रस्तावांवरील सुनावणीसाठी संबंधितांना नोटीसा देऊन बोलाविण्यात आले होते़ या सुनावणीदरम्यान उस्मानाबाद शहराचे माजी नगराध्यक्ष अमित दिलीप शिंदे यांना उस्मानाबाद जिल्हा व परिसरातील तालुक्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे़मागील काही वर्षात भिमनगर व सांजा रोड भागातील युवकांमध्ये सतत हाणारी होऊन शहराचे वातावरण बिघडाविले जात होते़ या दोन्ही टोळींमधील प्रमुखांसह इतर काहींचे हद्दपारीचे प्रस्तावही दाखल होते़ यातील सांजा रोड टोळीतील प्रमुखाला यापूर्वीच हद्दपार करण्यात आले आहे़ तर शुक्रवारी काढलेल्या आदेशात भिमनगर मधील लल्या उर्फ सुशांत बनसोडे, व भैय्यासाहेब नागटिळे या दोघांना उस्मानाबाद जिल्ह्यासह शेजारील बीड, लातूर, सोलापूर आदी जिल्ह्यांमधून तब्बल दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे़ याशिवाय सांजारोड टोळीतील सचिन नामदेव राठोड याला सहा महिन्यांसाठी, भिमनगर मधील बाळासाहेब अंगुल बनसोडे याला सहा महिन्यांसाठी उस्मानाबाद जिल्हा व परिसरातील तालुक्यांमधून हद्दपार करण्यात आले आहे़ तर शहरातीलच प्रकाश छगन पवार याला तीन महिन्यासाठी उस्मानाबाद जिल्हा व परिसरातील तालुक्यांमधून सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आल्याचे सांगून उर्वरित प्रकरणेही लवकरच निकाली काढण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय दंडाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली़(प्रतिनिधी)