शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

देशाच्या रक्षणासाठी प्रत्येकाने सज्ज व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2016 00:38 IST

औरंगाबाद : देश सुरक्षित राहिला तरच राज्य, धर्म, जात-पंथ, संस्कृती, परंपरा टिकून राहतील. यामुळे देशाच्या रक्षणासाठी आता प्रत्येकाने सज्ज होण्याची वेळ आली आहे.

औरंगाबाद : देश सुरक्षित राहिला तरच राज्य, धर्म, जात-पंथ, संस्कृती, परंपरा टिकून राहतील. यामुळे देशाच्या रक्षणासाठी आता प्रत्येकाने सज्ज होण्याची वेळ आली आहे. आवश्यकता पडल्यास युद्ध सुरू करण्यात सर्वात पुढे साधू-संत राहतील. कारण देशाचे रक्षण करणे म्हणजे हिंसा नव्हे, ती वीर अहिंसा आहे. तरुणांनी व्हॉटस् अ‍ॅप, फेसबुकमध्ये न रमता सैन्यात भरती होऊन मातृभूमीच्या रक्षणासाठी सीमेवर शौर्य दाखवावे, असे आवाहन जैन समाजातील साधू-संतांनी केले. पर्युषण पर्वानिमित्त सकल जैन समाज व खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत पार्श्वनाथ मंदिर, राजाबाजारच्या वतीने रविवारी आयोजित सामूहिक क्षमापना महोत्सव निमित्ताने धर्मपीठावर सकल जैन समाजातील सर्व पंथातील साधू-संत, साध्वीजी एकत्र आले होते. धर्मपीठावर आचार्य गुप्तीनंदीजी गुरुदेव, राष्ट्रसंत कमलमुनी कमलेश म.सा, अरिहंतमुनीजी म.सा., कौशलमुनीजी म.सा., घनश्याममुनीजी म.सा, तसेच मुनिश्री सुयशगुप्तीजी म.सा., मुनिश्री चंद्रगुप्तीजी म.सा., आर्यिका कुलभूषणजी माताजी, साध्वी प्रज्ञाश्रीजी म.सा., साध्वी सुमिताश्रीजी म.सा., साध्वी सत्यवतीजी म.सा., साध्वी पुण्यदर्शनाजी म.सा., साध्वी शशीप्रज्ञाजी म.सा. यांची उपस्थिती होती. धर्मपीठावर उजव्या बाजूस उरी येथे शहीद झालेल्या १८ सैैनिकांच्या छायाचित्रांचे बॅनर लावण्यात आले होते. प्रारंभी, सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा यांनी औरंगाबादेतील सकल जैन समाज एकजूट असून, येथे समाजातील सर्व परिवार एकत्र महावीर जयंती साजरी करत असल्याचा उल्लेख केला. यावेळी खा.चंद्रकांत खैरे, आ. संजय शिरसाट, आ. अतुल सावे, किशनचंद तनवाणी, विकास जैन, प्रफुल्ल मालानी, नंदकुमार घोडेले, पृथ्वीराज पवार यांच्यासह सकल जैन समाजाचे जी. एम. बोथरा, ललित पाटणी, प्रकाश बाफना, विजयराज संघवी, राजाभाऊ डोसी, सुधीर साहुजी, जवेरचंद डोसी, रतिलाल मुगदिया, मिठालाल कांकरिया, चांदमल सुराणा, मदनलाल आच्छा, संजय संचेती, रवी मुगदिया, विनोद बोकडिया, ताराचंद बाफना, कन्हैयालाल रुणवाल, पुखराज पगारिया, गौतम संचेती, प्रकाश मुगदिया, डॉ. नवल मालू यांच्यासह श्रावक, श्राविका हजर होत्या. संचालन महावीर पाटणी यांनी केले. विलास साहुजी यांनी आभार मानले. आपल्या मुलांना सैन्यात पाठवाआचार्य गुप्तीनंदीजी गुरुदेव यांनी सांगितले की, देशाच्या विकासात जैन समाज सदैव पुढे असतो. आता समाजबांधवांनी आपल्या मुलांना सैन्यात पाठवून देशाचे रक्षण करण्यात हातभार लावावा. थेट शहिदांच्या परिवाराला रक्कम देणार राष्ट्रसंत कमलमुनी कमलेश म.सा यांनी सांगितले की, जैन समाजाने शहिदांच्या परिवाराला मदत करण्यासाठी सढळ हाताने मदत करावी. जमलेली रक्कम थेट शहिदांच्या परिवाराला सकल जैन समाजातर्फे नेऊन देण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली. संतांच्या आवाहनाला समाजातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.