शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

दरवर्षी दलितांवरील अत्याचाराच्या घटनांत वाढ

By admin | Updated: May 22, 2014 00:10 IST

शिरीष शिंदे , बीड भारत देशाने जगात लोकशाही असल्याचा बहुमान मिळविला असल तरी जातीय समिकरणे अद्याप बदलायला तयार नाहीत.

 शिरीष शिंदे , बीड भारत देशाने जगात लोकशाही असल्याचा बहुमान मिळविला असल तरी जातीय समिकरणे अद्याप बदलायला तयार नाहीत. गेल्या पाच वर्षात जिल्ह्यातील दलितांवर झालेल्या अत्याचाराचा आढावा घेतला असता त्यात प्रति वर्षी वाढ झाली असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. बीड जिल्ह्यात पाच वर्षात अ‍ॅट्रॉसिटीची २९१ प्रकरणे दाखल झाली आहेत. ही समस्या गंभीर बनली असून दलित अत्याचाराच्या विरोधात सामाजिक संघटना एकवटल्या आहेत. २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्य घटना अंमलात आली. घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्य घटना तयार करताना भारतातील दलित व आदिवासी समाज बांधवाचे इतर सवर्ण व्यवस्थेतील लोकांकडून शोषण होऊ नये म्हणून, त्यांच्यावर अन्याय, अत्याचार, बहिष्कार, हत्या करणे, दलित व आदिवासी समाजातील महिलांचे शारीरिक शोषण व विनयभंग यापासून संरक्षण होण्यासाठी राज्य घटनेत अस्पृश्यता नष्ट करण्याच्या कलमाचा अंर्तभाव केला. दलित अत्याचार रोखण्याठी १९८८ साली अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट अस्तित्वात आला. त्याची अंमलबजावणी १९८९ करण्यात आली होती. १९८९ ते एप्रिल २०१४ अखेर पर्यंत जिल्ह्यात दलित अत्याचाराच्या ८६९ घटना घडल्या आहेत. जिल्ह्यांमध्ये दलितांवर दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. दलित अत्याचार विरोधी कायदा अस्तित्वात आला मात्र त्याची योग्य अंमलबजावणी होत नसल्याच्या प्रतिक्रिया दलित नेते देत आहेत. दलित व आदिवासींच्या अत्याचारात, गुन्ह्यांमध्ये वाढ झाली असून त्याचे अत्याचारांचे स्वरुपही बदलत चालले आहे. अस्पृश्यतेच्या रीतीरिवाजांची जागा आता बलात्कार, मतदानाच्या वेळी मज्जाव करणे, दबाव टाकणे, घर जाळणे, खून, मारहाण करणे, राग व द्वेषातून शिवीगाळ करणे यांनी घेतली आहे. अत्याचार होत असल्याने आजही दलित समाजावर एका प्रकारचे बर्डन असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त करीत आहे. बीड शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दलित, आदिवासी भटके, विमुक्त संघटना व अन्याय विरोधी कृती समितीच्या वतीने महाराष्ट्रात दलित, आदिवासी व भटके विमुक्त यांच्यावर होणार्‍या अन्यायाच्या विरोधात मंगळवारी महाधरणे आंदोलन करण्यात आले होते. जामखेड तालुक्यातील खेर्डा येथील नितीन आगे या युवकाची जातीयवादी गुंडांनी कायदा हातात घेत निर्घृण हत्या केली होती. तसेच बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील दादेगाव येथे भिल्ल समाजाच्या संजय गायकवाड याची दिवसाढवळ्या गोळ्या घालून व तलवारीने वार करुन हत्या करण्यात आली होती. या दोन्ही घटना काही दिवसांपूर्वी घडलेल्या आहेत. या संदर्भात प्रतिक्रिया देताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स फोरमचे अ‍ॅड. अविनाश गंडले म्हणाले, पोलिसांना अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टचा गुन्हा कसा दाखल करुन घ्यावा याचे प्रशिक्षण नसते परिणामी न्यायालयात प्रकरण चालत नाही. म्हणून पोलिसांना अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टचा गुन्हा दाखल करण्यासाठी प्रशिक्षण द्यावे, दुसरी बाब म्हणजे, अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल होतो मात्र फिर्यादी न्यायालयात फुटतो. असे घडले तर न्यायालयाने फुटलेल्या फिर्यादी विरुद्ध कारवाई करायला हवी. जेणे करुन बोगस अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्टची गुन्ह्यांवर आळा बसेल. जिल्ह्यात दाखल होणार्‍या अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टच्या सर्व केसेस चालविण्यासाठी विशेष न्यायालयाची स्थापना होणे आवश्यक असल्याचे मतही अ‍ॅड. गंडले यांनी व्यक्त केले. दलित अत्याचार वाढले असल्याच्या संदर्भात फिर्याद देताना मानवी हक्क अभियानाचे अशोक तांगडे म्हणाले की, गावामध्ये दलितांवर अत्याचार झाल्यास दलित प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करतात. त्यामुळे दलित अत्याचार होण्याची संख्या वाढत चालली आहे. गुन्हेगारांवर वचक बसत नसल्याने या प्रकारच्या घटना सारख्या घडत आहेत. पोलीस प्रशासन विरोधकांच्या बाजूने वागत असल्याने आरोपींना अभय मिळत असल्याचा आरोपही तांगडे यांनी केला आहे. सामाजिक कार्यकर्ते तत्वशील कांबळे म्हणाले की, अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टची कडक अंमलबजावणी झाल्यासच हे प्रमाण कमी होऊ शकते. पोलीस प्रशासनाने आपले कार्य चोख बजावण्याची गरज निर्माण झाली आहे. आरोपींना अभय मिळत असल्यामुळे त्यांना शिक्षा होत नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनाने अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टचे काटेकोरपणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. अ‍ॅट्रॉसिटीचे प्रकरणांची दाखल वर्ष संख्या २०१० ४० २०११ ५१ २०१२ ६३ २०१३ १०२ २०१४ (एप्रिल अखेर पर्यंत ) ३५