शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

देवगिरी कारखाना सुरू करण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:05 IST

फुलंब्री : येथील देवगिरी सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ...

फुलंब्री : येथील देवगिरी सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. ते पाल येथे उभारण्यात आलेल्या स्टेडियमच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.

फुलंब्रीचा बंद पडलेला देवगिरी साखर कारखाना सुरू करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्याकडे केली. यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, कारखाना सुरू करण्यासंदर्भात शासनाकडून पूर्णपणे मदत केली जाईल. मात्र, हा साखर कारखाना बाहेरील व्यक्तीने चालविण्यापेक्षा स्थानिक लोकांनीच चालविला पाहिजे, त्यासाठी स्थानिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

पाल येथील संदीप जाधव या तरुणाने स्वखर्चाने पावणेचार एकरांत स्टेडियम उभारले. या स्टेडियमचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. तत्पूर्वी कार्यक्रमात त्यांनी प्रथम गणेश जयंती व संत सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले.

या कार्यक्रमाला पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे, आ. सतीश चव्हाण, आ. विक्रम काळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष विजय औताडे, बाळासाहेब थोरात, नितीन देशमुख, अभिजित देशमुख, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राहुल डकले, शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र ठोंबरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप बोरसे, सभापती चंद्रकांत जाधव, छाया जंगले, सरपंच जया जाधव, उपसरपंच ज्ञानेश्वर जाधव, चंद्रशेखर जाधव, शेख हमीद, अजहर पटेल, मतीन पटेल यांची उपस्थिती होती.

-------

पोशिंदा जगला तरच देश जगेल ही भूमिका घ्यावी

केंद्र सरकारने लादलेले तीन कृषी कायदे मागे घेण्यासाठी शेतकरी ९० दिवसांपासून दिल्लीत आंदोलन करीत आहेत; पण केंद्र सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. पोशिंदा जगला तरच देश जगेल, हा विचार केंद्र सरकारच्या लक्षात का येत नाही. तसा विचार करून निर्णय मागे घेतले गेले पाहिजेत, असे मत अजित पवार यांनी कृषी कायद्यांबाबत मांडले.

-----

कोरोना संपला नाही, मास्क लावा

असे कसे चालणार बाबांनो

गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाने थैमान घातलेले असताना शासनाच्या वतीने नागरिकांकरिता नियम पाळण्याचे आवाहन केले जात आहे; पण या नियमाची पायमल्ली होताना दिसून येते. मी औरंगाबादहून कारने फुलंब्रीला आलो; पण मोजक्याच लोकांच्या तोंडाला मास्क लावलेले दिसले. या कार्यक्रमातही अनेकांनी मास्क लावलेला नाही. असे कसे चालणार आहे, असे म्हणून उपस्थित लोकांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कानउघाडणी केली. कोरोनाचे संकट अद्यापही संपलेले नाही. स्वत:बरोबर इतरांचीही काळजी घ्या, असे आवाहन त्यांनी केले.

फोटो :