शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
2
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
6
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
7
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
8
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
9
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
10
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
11
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
12
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
13
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
14
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
15
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
16
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
17
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
18
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
19
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
20
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?

देवगिरी कारखाना सुरू करण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:05 IST

फुलंब्री : येथील देवगिरी सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ...

फुलंब्री : येथील देवगिरी सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. ते पाल येथे उभारण्यात आलेल्या स्टेडियमच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.

फुलंब्रीचा बंद पडलेला देवगिरी साखर कारखाना सुरू करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्याकडे केली. यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, कारखाना सुरू करण्यासंदर्भात शासनाकडून पूर्णपणे मदत केली जाईल. मात्र, हा साखर कारखाना बाहेरील व्यक्तीने चालविण्यापेक्षा स्थानिक लोकांनीच चालविला पाहिजे, त्यासाठी स्थानिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

पाल येथील संदीप जाधव या तरुणाने स्वखर्चाने पावणेचार एकरांत स्टेडियम उभारले. या स्टेडियमचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. तत्पूर्वी कार्यक्रमात त्यांनी प्रथम गणेश जयंती व संत सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले.

या कार्यक्रमाला पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे, आ. सतीश चव्हाण, आ. विक्रम काळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष विजय औताडे, बाळासाहेब थोरात, नितीन देशमुख, अभिजित देशमुख, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राहुल डकले, शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र ठोंबरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप बोरसे, सभापती चंद्रकांत जाधव, छाया जंगले, सरपंच जया जाधव, उपसरपंच ज्ञानेश्वर जाधव, चंद्रशेखर जाधव, शेख हमीद, अजहर पटेल, मतीन पटेल यांची उपस्थिती होती.

-------

पोशिंदा जगला तरच देश जगेल ही भूमिका घ्यावी

केंद्र सरकारने लादलेले तीन कृषी कायदे मागे घेण्यासाठी शेतकरी ९० दिवसांपासून दिल्लीत आंदोलन करीत आहेत; पण केंद्र सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. पोशिंदा जगला तरच देश जगेल, हा विचार केंद्र सरकारच्या लक्षात का येत नाही. तसा विचार करून निर्णय मागे घेतले गेले पाहिजेत, असे मत अजित पवार यांनी कृषी कायद्यांबाबत मांडले.

-----

कोरोना संपला नाही, मास्क लावा

असे कसे चालणार बाबांनो

गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाने थैमान घातलेले असताना शासनाच्या वतीने नागरिकांकरिता नियम पाळण्याचे आवाहन केले जात आहे; पण या नियमाची पायमल्ली होताना दिसून येते. मी औरंगाबादहून कारने फुलंब्रीला आलो; पण मोजक्याच लोकांच्या तोंडाला मास्क लावलेले दिसले. या कार्यक्रमातही अनेकांनी मास्क लावलेला नाही. असे कसे चालणार आहे, असे म्हणून उपस्थित लोकांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कानउघाडणी केली. कोरोनाचे संकट अद्यापही संपलेले नाही. स्वत:बरोबर इतरांचीही काळजी घ्या, असे आवाहन त्यांनी केले.

फोटो :