शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

जाधववाडीत दररोज येतोय १०० टन कांदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:05 IST

औरंगाबाद : जाधववाडीत बाजार समितीत दररोज ९० ते १०० टन कांद्याची आवक होत आहे. होलसेलमध्ये ७ ते ११ ...

औरंगाबाद : जाधववाडीत बाजार समितीत दररोज ९० ते १०० टन कांद्याची आवक होत आहे. होलसेलमध्ये ७ ते ११ रुपये किलोने विकला जाणार कांद्या, भाजी मंडई व हातगाडीवर मात्र २० ते ३५ रुपये किलोपर्यंत विकला जात आहे.

एकीकडे कांदा उत्पादकांना मातीमोल भावात कांदा विकावा लागतो आणि दुसरीकडे ग्राहकांना चढ्या दराने कांदा खरेदी करावा लागत आहे. मधला नफा व्यापारी व विक्रेत्यांच्या साखळीत जात आहे.

सध्या शहरात हलक्या प्रतीचा कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. नंबरवन क्वाॅलिटीचा कांदा दिसत नाही. हलक्या प्रतीचा कांद्यावर एकच पात असते. ही पात वाहतुकीमध्येच निघून जाते. हा कांदा लवकर खराब होतो.

मागील महिन्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडला याचा परिणामही कांदा उत्पादनावर झाला. यामुळे हलक्या प्रतीचा कांदा जास्त प्रमाणात विक्रीला येत आहे. यातील चांगला कांदा बाजूला करून तेच जास्त भावात विकल्या जात आहे. कांदाच्या पोत्यामागे १ ते ३ किलोपर्यंत कांदे लगेच खराब होतात. यामुळे ती नुकसानभरपाई अन्य कांद्याची किंमत वाढवून केली जात असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. सध्या बाजर समितीमध्ये फुलंब्री, लासूर, देवगाव रंगारी या भागातून कांदा येत आहे.

चौकट

चांगल्या कांद्याची साठवणूक

बाजारात कांद्याला भाव नसल्यामुळे डबल पत्ती नसलेला नंबरवन क्वॉलिटीचा कांदा शेतकरी बाजारात आणत नाही. भाव कमी असल्याने साठवणूक करण्यास सुरुवात केली आहे. कारण हा कांदा जास्त दिवस टिकतो. चांगला भाव मिळल्यावरच शेतकरी हा कांदा विक्रीला काढतील.

चौकट

नाफेडने ३० रुपये किलोने कांदा खरेदी करावा

आता नाफेडद्वारा राज्यातील कांदा खरेदी सुरू होणार आहे. नाफेडने शेतकऱ्यांकडील कांदा ३० रुपयांनी खरेदी करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने केली आहे.

चौकट

फेकून दिलेला कांदा गरीब घेतात वेचून

जाधववाडी अडत बाजारात खराब कांदा फेकून दिला जात आहे. तो कांदा खाणाराही गरीब आहे. त्या फेकून दिलेल्या कांद्यातून थोडा चांगला कांदा निवडून ते लोक घरी खाण्यासाठी नेतात. कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीच्या कांद्याची साठवणूक करणे सुरू केले आहे. शहरात सध्या हलक्या प्रतीचा कांदा तोही महागड्या दरात ग्राहकांना खरेदी करावा लागत आहे.