शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

जाधववाडीत दररोज येतोय १०० टन कांदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:05 IST

औरंगाबाद : जाधववाडीत बाजार समितीत दररोज ९० ते १०० टन कांद्याची आवक होत आहे. होलसेलमध्ये ७ ते ११ ...

औरंगाबाद : जाधववाडीत बाजार समितीत दररोज ९० ते १०० टन कांद्याची आवक होत आहे. होलसेलमध्ये ७ ते ११ रुपये किलोने विकला जाणार कांद्या, भाजी मंडई व हातगाडीवर मात्र २० ते ३५ रुपये किलोपर्यंत विकला जात आहे.

एकीकडे कांदा उत्पादकांना मातीमोल भावात कांदा विकावा लागतो आणि दुसरीकडे ग्राहकांना चढ्या दराने कांदा खरेदी करावा लागत आहे. मधला नफा व्यापारी व विक्रेत्यांच्या साखळीत जात आहे.

सध्या शहरात हलक्या प्रतीचा कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. नंबरवन क्वाॅलिटीचा कांदा दिसत नाही. हलक्या प्रतीचा कांद्यावर एकच पात असते. ही पात वाहतुकीमध्येच निघून जाते. हा कांदा लवकर खराब होतो.

मागील महिन्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडला याचा परिणामही कांदा उत्पादनावर झाला. यामुळे हलक्या प्रतीचा कांदा जास्त प्रमाणात विक्रीला येत आहे. यातील चांगला कांदा बाजूला करून तेच जास्त भावात विकल्या जात आहे. कांदाच्या पोत्यामागे १ ते ३ किलोपर्यंत कांदे लगेच खराब होतात. यामुळे ती नुकसानभरपाई अन्य कांद्याची किंमत वाढवून केली जात असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. सध्या बाजर समितीमध्ये फुलंब्री, लासूर, देवगाव रंगारी या भागातून कांदा येत आहे.

चौकट

चांगल्या कांद्याची साठवणूक

बाजारात कांद्याला भाव नसल्यामुळे डबल पत्ती नसलेला नंबरवन क्वॉलिटीचा कांदा शेतकरी बाजारात आणत नाही. भाव कमी असल्याने साठवणूक करण्यास सुरुवात केली आहे. कारण हा कांदा जास्त दिवस टिकतो. चांगला भाव मिळल्यावरच शेतकरी हा कांदा विक्रीला काढतील.

चौकट

नाफेडने ३० रुपये किलोने कांदा खरेदी करावा

आता नाफेडद्वारा राज्यातील कांदा खरेदी सुरू होणार आहे. नाफेडने शेतकऱ्यांकडील कांदा ३० रुपयांनी खरेदी करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने केली आहे.

चौकट

फेकून दिलेला कांदा गरीब घेतात वेचून

जाधववाडी अडत बाजारात खराब कांदा फेकून दिला जात आहे. तो कांदा खाणाराही गरीब आहे. त्या फेकून दिलेल्या कांद्यातून थोडा चांगला कांदा निवडून ते लोक घरी खाण्यासाठी नेतात. कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीच्या कांद्याची साठवणूक करणे सुरू केले आहे. शहरात सध्या हलक्या प्रतीचा कांदा तोही महागड्या दरात ग्राहकांना खरेदी करावा लागत आहे.