शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

अखेर मनपाकडून जयभवानीनगर येथील नाल्यावरील अतिक्रमण पाडण्यास सुरुवात  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 14:26 IST

जयभवानीनगर येथील नाल्यातील अतिक्रमणांचा मुद्या महापालिकेत मागील एक वर्षापासून गाजत आहे. कालपर्यंत महापालिकेने या विषयात अंग काढून घेण्याचीच भूमिका घेतली होती.

ठळक मुद्दे महापालिकेने या विषयात अंग काढून घेण्याचीच भूमिका घेतली होती. शेवटी दबावानंतर प्रशासनाने बुधवारी सकाळी कारवाईचा बडगा उगारला.जिल्हाधिका-यांनी पाहणी केली व नाल्यावर असलेली १३८ अतिक्रमणे हटवून पाण्याचा प्रवाह मोकळा करण्याचे आदेश मनपा प्रशासनाला दिले होते.

औरंगाबाद : जयभवानीनगर येथील नाल्यातील अतिक्रमणांचा मुद्या महापालिकेत मागील एक वर्षापासून गाजत आहे. कालपर्यंत महापालिकेने या विषयात अंग काढून घेण्याचीच भूमिका घेतली होती. शेवटी दबावानंतर प्रशासनाने बुधवारी सकाळी कारवाईचा बडगा उगारला.

प्रारंभी या भागातील नागरिकांनी अतिक्रमणे वाचविण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र यश मिळत नसल्याचे पाहून त्यांनीही माघार घेतली. दिवसभरात मनपाच्या पथकाने नाल्यातील चार इमारती जमीनदोस्त केल्या. या भागातील १३८ इमारती पाडण्यात येणार आहेत. मनपाच्या प्रत्येक सभेत नगरसेविका मनीषा मुंडे अतिक्रमणांचा मुद्या लावून धरीत असत. त्याला भाजपचे नगरसेवकही साथ देत असत. सप्टेंबर महिन्यात ढगफुटीनंतर जयभवानीनगर परिसर जलमय झाला. नाल्यांमधील प्रचंड अतिक्रमणांमुळे घरांमध्ये पाणी शिरले होते. जिकडे तिकडे हाहाकार उडाला होता. त्यानंतर पालकमंत्री, जिल्हाधिका-यांनी पाहणी केली व नाल्यावर असलेली १३८ अतिक्रमणे हटवून पाण्याचा प्रवाह मोकळा करण्याचे आदेश मनपा प्रशासनाला दिले होते.

मनपाने अगोदर पावसाळा व नंतर दसरा, दिवाळीचा सण असल्यामुळे कारवाई पुढे ढकलली होती. बुधवारी सकाळी पदनिर्देशित अधिकारी सी. एम. अभंग यांच्यासह प्रभाकर पाठक, इमारत निरीक्षक गंगाधर भांगे, पोपटराव तिवटने यांचे पथक जयभवानीनगरातील जिजामाता कॉलनी भागात पोहोचले. पोलीस, जेसीबीसह दाखल झालेले पथक पाहून नागरिकांमध्ये खळबळ उडाली. नागरिकांनी यावेळी कडाडून विरोध केला. दुपारनंतर प्रत्यक्षात कारवाईला सुरुवात करण्यात आली. सायंकाळपर्यंत चार अतिक्रमणे हटविण्यात आल्याचे मनपा अधिका-यांनी सांगितले. 

पोलिसाचे अतिक्रमणजिजामाता कॉलनीच्या पुढे सिडकोची घरे असून, सिडकोने नाल्याला संरक्षक भिंत बांधली आहे. या संरक्षक भिंतीवरच एका पोलीस उपनिरीक्षकाने भिंत बांधून अतिक्रमण केले होते. मनपाच्या पथकाने हे अतिक्रमण जमीनदोस्त केले. तसेच नाल्यावर बांधण्यात आलेले एक घर व इतर बाधित अतिक्रमणे हटविण्यात आल्याचे सी. एम. अभंग यांनी सांगितले.