शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
7
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
8
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
9
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
10
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
11
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
12
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
13
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
14
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
15
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
16
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
17
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
18
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
19
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
20
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा

अखेर मनपाकडून जयभवानीनगर येथील नाल्यावरील अतिक्रमण पाडण्यास सुरुवात  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 14:26 IST

जयभवानीनगर येथील नाल्यातील अतिक्रमणांचा मुद्या महापालिकेत मागील एक वर्षापासून गाजत आहे. कालपर्यंत महापालिकेने या विषयात अंग काढून घेण्याचीच भूमिका घेतली होती.

ठळक मुद्दे महापालिकेने या विषयात अंग काढून घेण्याचीच भूमिका घेतली होती. शेवटी दबावानंतर प्रशासनाने बुधवारी सकाळी कारवाईचा बडगा उगारला.जिल्हाधिका-यांनी पाहणी केली व नाल्यावर असलेली १३८ अतिक्रमणे हटवून पाण्याचा प्रवाह मोकळा करण्याचे आदेश मनपा प्रशासनाला दिले होते.

औरंगाबाद : जयभवानीनगर येथील नाल्यातील अतिक्रमणांचा मुद्या महापालिकेत मागील एक वर्षापासून गाजत आहे. कालपर्यंत महापालिकेने या विषयात अंग काढून घेण्याचीच भूमिका घेतली होती. शेवटी दबावानंतर प्रशासनाने बुधवारी सकाळी कारवाईचा बडगा उगारला.

प्रारंभी या भागातील नागरिकांनी अतिक्रमणे वाचविण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र यश मिळत नसल्याचे पाहून त्यांनीही माघार घेतली. दिवसभरात मनपाच्या पथकाने नाल्यातील चार इमारती जमीनदोस्त केल्या. या भागातील १३८ इमारती पाडण्यात येणार आहेत. मनपाच्या प्रत्येक सभेत नगरसेविका मनीषा मुंडे अतिक्रमणांचा मुद्या लावून धरीत असत. त्याला भाजपचे नगरसेवकही साथ देत असत. सप्टेंबर महिन्यात ढगफुटीनंतर जयभवानीनगर परिसर जलमय झाला. नाल्यांमधील प्रचंड अतिक्रमणांमुळे घरांमध्ये पाणी शिरले होते. जिकडे तिकडे हाहाकार उडाला होता. त्यानंतर पालकमंत्री, जिल्हाधिका-यांनी पाहणी केली व नाल्यावर असलेली १३८ अतिक्रमणे हटवून पाण्याचा प्रवाह मोकळा करण्याचे आदेश मनपा प्रशासनाला दिले होते.

मनपाने अगोदर पावसाळा व नंतर दसरा, दिवाळीचा सण असल्यामुळे कारवाई पुढे ढकलली होती. बुधवारी सकाळी पदनिर्देशित अधिकारी सी. एम. अभंग यांच्यासह प्रभाकर पाठक, इमारत निरीक्षक गंगाधर भांगे, पोपटराव तिवटने यांचे पथक जयभवानीनगरातील जिजामाता कॉलनी भागात पोहोचले. पोलीस, जेसीबीसह दाखल झालेले पथक पाहून नागरिकांमध्ये खळबळ उडाली. नागरिकांनी यावेळी कडाडून विरोध केला. दुपारनंतर प्रत्यक्षात कारवाईला सुरुवात करण्यात आली. सायंकाळपर्यंत चार अतिक्रमणे हटविण्यात आल्याचे मनपा अधिका-यांनी सांगितले. 

पोलिसाचे अतिक्रमणजिजामाता कॉलनीच्या पुढे सिडकोची घरे असून, सिडकोने नाल्याला संरक्षक भिंत बांधली आहे. या संरक्षक भिंतीवरच एका पोलीस उपनिरीक्षकाने भिंत बांधून अतिक्रमण केले होते. मनपाच्या पथकाने हे अतिक्रमण जमीनदोस्त केले. तसेच नाल्यावर बांधण्यात आलेले एक घर व इतर बाधित अतिक्रमणे हटविण्यात आल्याचे सी. एम. अभंग यांनी सांगितले.