शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

अखेर मनपाकडून जयभवानीनगर येथील नाल्यावरील अतिक्रमण पाडण्यास सुरुवात  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 14:26 IST

जयभवानीनगर येथील नाल्यातील अतिक्रमणांचा मुद्या महापालिकेत मागील एक वर्षापासून गाजत आहे. कालपर्यंत महापालिकेने या विषयात अंग काढून घेण्याचीच भूमिका घेतली होती.

ठळक मुद्दे महापालिकेने या विषयात अंग काढून घेण्याचीच भूमिका घेतली होती. शेवटी दबावानंतर प्रशासनाने बुधवारी सकाळी कारवाईचा बडगा उगारला.जिल्हाधिका-यांनी पाहणी केली व नाल्यावर असलेली १३८ अतिक्रमणे हटवून पाण्याचा प्रवाह मोकळा करण्याचे आदेश मनपा प्रशासनाला दिले होते.

औरंगाबाद : जयभवानीनगर येथील नाल्यातील अतिक्रमणांचा मुद्या महापालिकेत मागील एक वर्षापासून गाजत आहे. कालपर्यंत महापालिकेने या विषयात अंग काढून घेण्याचीच भूमिका घेतली होती. शेवटी दबावानंतर प्रशासनाने बुधवारी सकाळी कारवाईचा बडगा उगारला.

प्रारंभी या भागातील नागरिकांनी अतिक्रमणे वाचविण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र यश मिळत नसल्याचे पाहून त्यांनीही माघार घेतली. दिवसभरात मनपाच्या पथकाने नाल्यातील चार इमारती जमीनदोस्त केल्या. या भागातील १३८ इमारती पाडण्यात येणार आहेत. मनपाच्या प्रत्येक सभेत नगरसेविका मनीषा मुंडे अतिक्रमणांचा मुद्या लावून धरीत असत. त्याला भाजपचे नगरसेवकही साथ देत असत. सप्टेंबर महिन्यात ढगफुटीनंतर जयभवानीनगर परिसर जलमय झाला. नाल्यांमधील प्रचंड अतिक्रमणांमुळे घरांमध्ये पाणी शिरले होते. जिकडे तिकडे हाहाकार उडाला होता. त्यानंतर पालकमंत्री, जिल्हाधिका-यांनी पाहणी केली व नाल्यावर असलेली १३८ अतिक्रमणे हटवून पाण्याचा प्रवाह मोकळा करण्याचे आदेश मनपा प्रशासनाला दिले होते.

मनपाने अगोदर पावसाळा व नंतर दसरा, दिवाळीचा सण असल्यामुळे कारवाई पुढे ढकलली होती. बुधवारी सकाळी पदनिर्देशित अधिकारी सी. एम. अभंग यांच्यासह प्रभाकर पाठक, इमारत निरीक्षक गंगाधर भांगे, पोपटराव तिवटने यांचे पथक जयभवानीनगरातील जिजामाता कॉलनी भागात पोहोचले. पोलीस, जेसीबीसह दाखल झालेले पथक पाहून नागरिकांमध्ये खळबळ उडाली. नागरिकांनी यावेळी कडाडून विरोध केला. दुपारनंतर प्रत्यक्षात कारवाईला सुरुवात करण्यात आली. सायंकाळपर्यंत चार अतिक्रमणे हटविण्यात आल्याचे मनपा अधिका-यांनी सांगितले. 

पोलिसाचे अतिक्रमणजिजामाता कॉलनीच्या पुढे सिडकोची घरे असून, सिडकोने नाल्याला संरक्षक भिंत बांधली आहे. या संरक्षक भिंतीवरच एका पोलीस उपनिरीक्षकाने भिंत बांधून अतिक्रमण केले होते. मनपाच्या पथकाने हे अतिक्रमण जमीनदोस्त केले. तसेच नाल्यावर बांधण्यात आलेले एक घर व इतर बाधित अतिक्रमणे हटविण्यात आल्याचे सी. एम. अभंग यांनी सांगितले.