शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

अखेर जीवनदायी आरोग्य योजनेसाठीची अट रद्द

By admin | Updated: July 1, 2014 01:02 IST

पाटोदा: राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे ओळखपत्र देण्यासाठी केवळ २०१३ पूर्वीच्या स्वस्त धान्याच्या शिधापत्रिका असणारेच लाभार्थी पात्र असतील, अशी अप्रत्यक्ष अट येथील प्रशासनाने घातली होती.

पाटोदा: राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे ओळखपत्र देण्यासाठी केवळ २०१३ पूर्वीच्या स्वस्त धान्याच्या शिधापत्रिका असणारेच लाभार्थी पात्र असतील, अशी अप्रत्यक्ष अट येथील प्रशासनाने घातली होती. तसेच सामान्यांसह रूग्णांचे हाल होत होते. या संदर्भात ‘लोकमत’ने वृत्तही प्रकाशित केले होते. एकंदरच याची दखल घेऊन ही अट आता रद्द करण्यात आली आहे.सामान्य व गरीब कुटुंबातील सदस्यांना आरोग्य सुविधांचा लाभ माफक दरात घेता यावा, त्यांच्या आरोग्याची हेळसांड होऊ नये तसेच योग्य उपचाराअभावी जीवितास धोका होऊ नये यासाठी सरकारने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू केलेली आहे. या योजनेचा महाराष्ट्रात प्राधान्याने लाभ घेतला जात आहे. ज्या कुटुंबियांकडे बीपीएल शिधापत्रिका, एपीएल, अन्नपूर्णा आणि अन्त्योदय योजनेखालील शिधापत्रिका आहेत. त्यांना या योजनेचा लाभ दिला जातो. या योजनेखालील लाभार्थ्यांना आरोग्यपत्र देण्यात येते. आरोग्यपत्र वितरणासाठी पुरवठा विभागाने वितरित केलेल्या शिधापत्रिकांची यादी उपयोगात आणली जाते. असे असले तरी ज्यांची शिधापत्रिका नवीन आहे किंवा ज्यांच्या शिधापत्रिकांची डाटा एन्ट्री झाली नाही अशांना या योजनेपासून वंचित ठेवले जात होते. शिवाय ज्यांना आरोग्यपत्र दिले त्यांनाही ३१ आॅक्टोबर २०१३ पूर्वीची शिधापत्रिका असल्याचे प्रमाणपत्र तहसीलमधून काढण्यास सांगितले जात होते. यामुळे नागरिकांना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागत होते. यामुळे ही अट रद्द करण्याची मागणी नागरिकांमधून होत होती. या संदर्भात ‘लोकमत’ने वृत्तही प्रकाशित केले होते. एकंदरच या सर्वाची दखल घेऊन लादलेली ही अट आता दूर केली आहे. यामुळे या योजनेचा लाभ घेणे सोयीस्कर ठरत आहे. या संदर्भात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गणेश लोखंडे म्हणाले, अट नसल्याबाबत आम्हाला सूचना आल्या आहेत. तसेच पुरवठा विभागाने त्यांच्याकडील डाटा एन्ट्री दुरूस्त केल्यास सर्वांना आरोग्य पत्र देऊ.(वार्ताहर)