शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

दुपारच्या आनंदावर संध्याकाळी विरजण; लॉकडाऊन ‘जैसेे थे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:04 IST

औरंगाबाद : राज्यातील १८ जिल्ह्यातील कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह दर कमी असल्यामुळे सर्व काही अनलॉक करण्याचा निर्णय मदत व पुनर्वसन ...

औरंगाबाद : राज्यातील १८ जिल्ह्यातील कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह दर कमी असल्यामुळे सर्व काही अनलॉक करण्याचा निर्णय मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जाहीर करताच दुपारनंतर औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात सगळ्या बाजारपेठेत आनंदाला उधाण आले. त्यांच्या घोषणेचा टर्न संध्याकाळी यु-टर्नच्या रुपात बदलल्यानंतर व्यापारी, हॉटेल, रेस्टॉरंट चालकांसह जनसामान्यांच्या आनंदावर विरजण पडले.

सर्वसामान्यांपासून सर्व व्यावसायिकांना सरकारी विसंवादाने बुचकळ्यात पाडल्यामुळे नेमका हा काय प्रकार यासाठी एकमेकांना फोन करून व्यापाऱ्यांनी सत्य काय आहे हे विचारले. प्रशासकीय वर्तुळात कनिष्ठांपासून वरिष्ठ ते सनदी अधिकाऱ्यांपर्यंतच्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले. प्रत्येकाने मुख्यमंत्री कार्यालयाकडे बोट दाखवून हात वर केले.

दुपारी अनलॉकची बातमी येताच सर्व क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले होते. हॉटेल चालकांनी तातडीने साफसफाई करण्यास सुरूवात केली. तर शहरातील सर्व मॉलच्या आवारात व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन शासन निर्णयाबाबत उत्सुकतेने विचारणा केली. जिल्ह्यात सध्या सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सर्व व्यापारास मुभा दिलेली आहे. बहुतांश जणांनी जिल्हा आणि महापालिका प्रशासनाला संपर्क करून जिल्ह्यात सर्व काही उघडणार आहे काय, याची माहिती घेतली. मात्र सायंकाळी अनेकांची निराशाच झाली.

चौकट...

३४५८ पैकी २ हजार ऑक्सिजन खाटा

जिल्ह्यात सर्व मिळून ३ हजार ४५८ पैकी अंदाजे २ हजार ऑक्सिजन खाटा रिक्त असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अनलॉकच्या घोषणेनंतर प्रशासनाने ऑक्सिजन खाटांची उपलब्धता किती आहे, याची माहिती संकलित करण्यास सुरूवात केली आहे.

पॉझिटिव्हिटी रेटमध्ये घट

एप्रिल महिन्याच्या अखेरीस शहराचा पॉझिटिव्हिटी रेट हा ११.४४ टक्के एवढा होता. तो मागील महिनाभरात कमी कमी होत ३१ मे रोजी २.८३ वर आला. सध्या २.२६ टक्के आहे.

लॉकडाऊन जैसे थे राहील- जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले, जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर ५ टक्क्यांच्या खाली आहे. ऑक्सिजन बेड्सच्या उपलब्धतेची माहिती संकलित केली जात आहे. वरिष्ठ पातळीवर विचारणा केल्याशिवाय काहीही सांगता येणार नाही. औरंगाबादमध्ये लॉकडाऊन ‘जैसे थे’ राहील, याबाबत सीएमओ कार्यालयाकडून सूचना आल्यानंतर काही माहिती देता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

कभी खुशी कभी गम

जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी सांगितले, अनलॉकचा निर्णय येताच आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु त्यानंतर पुन्हा निर्णय बदलण्याबाबतची माहिती समोर आली. त्यामुळे ‘कभी खुशी तर कभी गम’ असा अनुभव आम्ही घेतला. सर्व अनलॉक झाले असते तर आनंदच झाला असता.

या निर्णयामुळे काळजी वाढली होती

एकदम अनलॉक म्हटले असते तर नागरिकांचा भडका उडाला असता. शिवाय हॉटेलमध्ये स्टाफ देखील नाही, पूर्ण सेवा देण्यासाठी. अनलॉकची पूर्वकल्पना दिली तर तयारी करता येईल, असे औरंगाबाद जिल्हा हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी सांगितले.

कॅप्शन...

अनलॉक केल्याचे दुपारी जाहीर झाल्यानंतर पद्मपुरा परिसरातील एका हॉटेलमध्ये साफसफाई सुरु झाली.